शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

अपहरणकर्त्यांसोबत निरागस जिवाचा प्रदीर्घ संघर्ष !

By नरेश डोंगरे | Updated: June 12, 2024 19:36 IST

गुन्हेगारांच्या स्पर्शातून झाली असावी, कलुषित मनसुब्याची जाणीव !

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :  सहा महिन्यांचा निरागस, निष्पाप जीव. ज्याला काहीच कळत नाही, तो गुन्हेगारांशी संघर्ष करू शकतो का..., हा प्रश्न कुणी केला तर ऐकणारी मंडळी प्रश्न करणाऱ्याच्या बुद्धीमत्तेवर संशय घेईल अन् शंभर पैकी शंभर जणांचे एकसाथ उत्तर असेल, नाही...! मात्र, ही एक अशी सत्यघटना आहे की, या घटनेतील अवघ्या सहा महिन्याच्या निरागस चिमुकल्याने त्याचे अपहरण करणारांशी प्रदीर्घ संघर्ष केला. आपण सुरक्षित हातात पोहचलो, अशी जाणीव झाल्यानंतरच त्या निरागस जिवाचा संघर्ष थांबला. अचंबित करणारे हे प्रकरण नागपुरातील आहे.

जगाच्या रहाटगाडग्यापासून अनभिज्ञ, स्वर्गीय सुखाचा आनंद घेत तो त्याच्या आईच्या कुशित निजून होता. त्याचे वय अवघे सहा महिने, दुनियादारी काय ते कळण्याचा प्रश्नच नाही. आईची कुशी अन् पित्याची छाती, हीच त्याची दुनिया. मात्र,  तेलंगणात नेऊन विकण्याच्या प्रयत्नात ६ जूनला येथील रेल्वे स्थानकावरून या निष्पाप जीवाचे अपहरण करण्यात आले होते. गुन्हेगारांनी जेव्हा त्याला त्याच्या आईवडीलांपासून दूर करून, वाईट हेतूने जवळ घेतले. तेव्हा त्या निरागस जिवाला गुन्हेगारांच्या कलुषित मनसुब्याची कदाचित स्पर्षातून जाणीव झाली असावी. त्यामुळे तो सारखे आक्रंदन करू लागला. तो विरोध करू शकत नव्हता मात्र त्याचे अपहरण करून त्याला विकण्याचा घाट घालणाऱ्या गुन्हेगारांसोबत त्याने एक अनोखी संघर्षाची भूमीका घेतली. तो त्यांच्या हातचे पाणीही प्यायला नाही. रडून रडून थकायचे अन् झोपी जायचे. पुन्हा जाग आली की रडायचे, असेच त्याचे सुरू होते. अखेर त्या निष्पाप जिवाचा संघर्ष फळाला आला अन् त्याच्या मदतीला पोलिसांच्या रुपातील देवदूत धावून आले. आरोपींना बेड्या ठोकल्या अन् त्यांच्या तावडीतून चिमुकल्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याला दूध पाजले, पाणी पाजले अन् परत त्याच्या आईच्या पदरातही आणून घातले. 

या घटनेची  रेल्वे पोलिसांना तातडीने तक्रार मिळाल्यानेच तपासाचे चक्र गतीमान झाले अन् प्रकरणाचा शेवट गोड झाला. चिमुकला त्याच्या आईच्या कुशित पोहचला. तर, सर्व आरोपी मंगळवारी तुरूंगात पोहचले. मात्र, तपासातून पुढे आलेले तीन वेगवेगळे पैलू या प्रकरणाला आणखीनच हृदयस्पर्षी बनवून गेले.-----------------------

((१))'ती'चीही माया ओतप्रोतच !भिक्षा मागून खाणारी असली तरी तिची ममता ईतर 'आई - माई' सारखीच ओतप्रोत होती. कुशित पहुडलेल बाळ दिसत नसल्यापासून तो ते परत कुशित येईपर्यंत ती सैरभैर होती. खाणे-पिणे सगळेच हराम झाले होते, त्या मातेसाठी. दुरावलेला चिमुकला एकदाचा २०-२२ तासानंतर तिच्या कुशित आला. तिने त्याला पदराआड घेऊन दुधाचा घोट दिला, तेव्हाच तिची तहानभूक जागृत झाली. ------------

((२))गुन्हेगारांना संवेदना नसतातगुन्हेगारांना भाव-भावना, संवेदना नसते. आपण त्याच्या जनमदात्यांपासून हिरावून आणलेला चिमुकला १२ -१४ तास सारखा रडतो, आक्रंदन करतो. त्याला काही खाता येत नाही, दुधच काय पाणीही पीत नाही.  हे लक्षात येऊनही अपहरणकर्ते आरोपी 'सुनील-माया'वर कसलाच फरक पडला नव्हता. प्रवासात त्यांना मात्र जेव्हा भूक लागली, ईच्छा झाली तेव्हा ते खायचे, प्यायचे. एवढेच काय, पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून नागपूरला परत येईपर्यंत आरोपी पोलिसांच्या वाहनात मस्तपैकी घोरत पडलेले (झोपून) होते. -------------

((३))कर्तव्यकठोर, मात्र दयावानही !खाकी कर्तव्यकठोर असली आणि गुन्हेगारांशी ती काहीशी कठोर वागत असली तरी वेळप्रसंगी ती द्रवतेच. वेळप्रसंगी पोलीस दयावान बनतोच. त्याचाही प्रत्यय या प्रकरणात आला. आरोपी आणि त्यांच्या तावडीतील बाळ परत घेऊन नागपूरकडे येताना बाळाची प्रकृती ठिक आहे की नाही, याची पोलिसांनी आधी शहानिशा करून घेतली. आईवडीलांपासून दूर असल्याने प्रवासात त्याला काय दिले पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, त्याची सर्व माहिती त्यांनी तेथील डॉक्टरकडून घेतली. प्रवासात मध्ये-मध्ये जेव्हा तो चिमुकला रडायचा, तेव्हा प्रत्येकच पोलीस त्याला आलटून पालटून जवळ घेऊन, मायेची उब देऊन निजवण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :nagpurनागपूर