शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणकर्त्यांसोबत निरागस जिवाचा प्रदीर्घ संघर्ष !

By नरेश डोंगरे | Updated: June 12, 2024 19:36 IST

गुन्हेगारांच्या स्पर्शातून झाली असावी, कलुषित मनसुब्याची जाणीव !

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :  सहा महिन्यांचा निरागस, निष्पाप जीव. ज्याला काहीच कळत नाही, तो गुन्हेगारांशी संघर्ष करू शकतो का..., हा प्रश्न कुणी केला तर ऐकणारी मंडळी प्रश्न करणाऱ्याच्या बुद्धीमत्तेवर संशय घेईल अन् शंभर पैकी शंभर जणांचे एकसाथ उत्तर असेल, नाही...! मात्र, ही एक अशी सत्यघटना आहे की, या घटनेतील अवघ्या सहा महिन्याच्या निरागस चिमुकल्याने त्याचे अपहरण करणारांशी प्रदीर्घ संघर्ष केला. आपण सुरक्षित हातात पोहचलो, अशी जाणीव झाल्यानंतरच त्या निरागस जिवाचा संघर्ष थांबला. अचंबित करणारे हे प्रकरण नागपुरातील आहे.

जगाच्या रहाटगाडग्यापासून अनभिज्ञ, स्वर्गीय सुखाचा आनंद घेत तो त्याच्या आईच्या कुशित निजून होता. त्याचे वय अवघे सहा महिने, दुनियादारी काय ते कळण्याचा प्रश्नच नाही. आईची कुशी अन् पित्याची छाती, हीच त्याची दुनिया. मात्र,  तेलंगणात नेऊन विकण्याच्या प्रयत्नात ६ जूनला येथील रेल्वे स्थानकावरून या निष्पाप जीवाचे अपहरण करण्यात आले होते. गुन्हेगारांनी जेव्हा त्याला त्याच्या आईवडीलांपासून दूर करून, वाईट हेतूने जवळ घेतले. तेव्हा त्या निरागस जिवाला गुन्हेगारांच्या कलुषित मनसुब्याची कदाचित स्पर्षातून जाणीव झाली असावी. त्यामुळे तो सारखे आक्रंदन करू लागला. तो विरोध करू शकत नव्हता मात्र त्याचे अपहरण करून त्याला विकण्याचा घाट घालणाऱ्या गुन्हेगारांसोबत त्याने एक अनोखी संघर्षाची भूमीका घेतली. तो त्यांच्या हातचे पाणीही प्यायला नाही. रडून रडून थकायचे अन् झोपी जायचे. पुन्हा जाग आली की रडायचे, असेच त्याचे सुरू होते. अखेर त्या निष्पाप जिवाचा संघर्ष फळाला आला अन् त्याच्या मदतीला पोलिसांच्या रुपातील देवदूत धावून आले. आरोपींना बेड्या ठोकल्या अन् त्यांच्या तावडीतून चिमुकल्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याला दूध पाजले, पाणी पाजले अन् परत त्याच्या आईच्या पदरातही आणून घातले. 

या घटनेची  रेल्वे पोलिसांना तातडीने तक्रार मिळाल्यानेच तपासाचे चक्र गतीमान झाले अन् प्रकरणाचा शेवट गोड झाला. चिमुकला त्याच्या आईच्या कुशित पोहचला. तर, सर्व आरोपी मंगळवारी तुरूंगात पोहचले. मात्र, तपासातून पुढे आलेले तीन वेगवेगळे पैलू या प्रकरणाला आणखीनच हृदयस्पर्षी बनवून गेले.-----------------------

((१))'ती'चीही माया ओतप्रोतच !भिक्षा मागून खाणारी असली तरी तिची ममता ईतर 'आई - माई' सारखीच ओतप्रोत होती. कुशित पहुडलेल बाळ दिसत नसल्यापासून तो ते परत कुशित येईपर्यंत ती सैरभैर होती. खाणे-पिणे सगळेच हराम झाले होते, त्या मातेसाठी. दुरावलेला चिमुकला एकदाचा २०-२२ तासानंतर तिच्या कुशित आला. तिने त्याला पदराआड घेऊन दुधाचा घोट दिला, तेव्हाच तिची तहानभूक जागृत झाली. ------------

((२))गुन्हेगारांना संवेदना नसतातगुन्हेगारांना भाव-भावना, संवेदना नसते. आपण त्याच्या जनमदात्यांपासून हिरावून आणलेला चिमुकला १२ -१४ तास सारखा रडतो, आक्रंदन करतो. त्याला काही खाता येत नाही, दुधच काय पाणीही पीत नाही.  हे लक्षात येऊनही अपहरणकर्ते आरोपी 'सुनील-माया'वर कसलाच फरक पडला नव्हता. प्रवासात त्यांना मात्र जेव्हा भूक लागली, ईच्छा झाली तेव्हा ते खायचे, प्यायचे. एवढेच काय, पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून नागपूरला परत येईपर्यंत आरोपी पोलिसांच्या वाहनात मस्तपैकी घोरत पडलेले (झोपून) होते. -------------

((३))कर्तव्यकठोर, मात्र दयावानही !खाकी कर्तव्यकठोर असली आणि गुन्हेगारांशी ती काहीशी कठोर वागत असली तरी वेळप्रसंगी ती द्रवतेच. वेळप्रसंगी पोलीस दयावान बनतोच. त्याचाही प्रत्यय या प्रकरणात आला. आरोपी आणि त्यांच्या तावडीतील बाळ परत घेऊन नागपूरकडे येताना बाळाची प्रकृती ठिक आहे की नाही, याची पोलिसांनी आधी शहानिशा करून घेतली. आईवडीलांपासून दूर असल्याने प्रवासात त्याला काय दिले पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, त्याची सर्व माहिती त्यांनी तेथील डॉक्टरकडून घेतली. प्रवासात मध्ये-मध्ये जेव्हा तो चिमुकला रडायचा, तेव्हा प्रत्येकच पोलीस त्याला आलटून पालटून जवळ घेऊन, मायेची उब देऊन निजवण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :nagpurनागपूर