शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दाभोळकर-पानसरेंचे मारेकरी मोकाट राहणार; गांधी पुन्हा पुन्हा मारले जाणार- सुरेश द्वादशिवार

By प्रविण खापरे | Updated: October 12, 2022 20:52 IST

सर्व राजकीय पक्ष जातींच्याच उभ्या राहिल्या. त्यामुळे, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बोलणेच मुर्खपणाचे आहे. 

नागपूर : जिथे विचारांचे नाही तर धर्म व जातीचे राजकारण असेल तिथे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्यासारख्या विचारकांचे मारेकरी कधीच सापडणार नाहीत आणि महात्मा गांधी वारंवार मारले जातील, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशिवार यांनी आज येथे केले.

बुधवारी दक्षिणायन, महाराष्ट्रच्या वतीने हिस्लॉप कॉलेजच्या शॅलोम सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रा. प्रमोद मुनघाटे संपादित ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर पार पडलेल्या ‘अभिव्यक्ती आणि वास्तव’ या विषयावरील परिचर्चेत द्वादशिवार अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. बबन तायवाडे, रणजित मेश्राम, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ उपस्थित होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तर सर्वप्रथम निर्बंध घातले ते धर्मसत्तेने आणि जातींनी. लिहायचे तर धर्म-जातींना पोषक, अनुकुल असे लिहा, एवढेच स्वातंत्र्य दिले. या देशात विचारांची सत्ता, राजकीय पक्ष कधी उभ्या झाल्या नाहीत. सर्व राजकीय पक्ष जातींच्याच उभ्या राहिल्या. त्यामुळे, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बोलणेच मुर्खपणाचे आहे. त्यामुळेच दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्यासारख्या विचारकांच्या हत्या होतात आणि त्यांचे मारेकरी कधीच सापडत नाहीत.

महात्मा गांधी सातत्याने मारले जातात. महात्मा गांधींना महाष्ट्रातील ललित लेखकांनी कायम विरोध केला आणि साने गुरुजींच्या सारख्या खऱ्या लेखकांना गांधींचे प्रचारक म्हटले गेले.  मार्क्सवादी, समाजवादी, आंबेडकरवादी यांना गांधी कधीच पटले नाहीत आणि गांधीवाद्यांनी गांधींचा चरखा व सुत वगळता गांधीविचार कधीच बाळगला नाही, अशी टिका सुरेश द्वादशिवार यांनी यावेळी केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन अरुणा सबाणे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर