शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

भयावह घटना टळली; उपमुख्यमंत्री उठून गेले अन् व्हीव्हीआयपी लाऊंजमध्ये शॉर्ट सर्किट झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2023 21:24 IST

Nagpur News महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) ने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात आज सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसून होते, ते मंचावर गेल्याच्या काही मिनिटांनंतरच तेथे शॉर्ट सर्किटमुळे मोठा थरार निर्माण झाला.

नरेश डोंगरे नागपूर : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) ने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात आज सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसून होते, ते मंचावर गेल्याच्या काही मिनिटांनंतरच तेथे शॉर्ट सर्किटमुळे मोठा थरार निर्माण झाला. वेळीच उपाययोजना करून संभाव्य दुर्घटना रोखण्यात आली. अजनीच्या रेल्वे मेन्स स्कूलजवळ शनिवारी सकाळी महारेलतर्फे आयोजित कार्यक्रमात हा गंभीर प्रकार घडला. यामुळे महारेलच्या अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.

महारेलच्या वतिने शनिवारी सकाळी ९ वाजता ठिकठिकाणच्या सहा विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि अजनी रेल्वे पुलासह सहा ठिकाणच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भव्य-दिव्य शामियाना अन् साजेसा मंच उभारण्यात आला होता. पाहुण्यांसाठी मंचाच्या उजव्या बाजूला तात्पुरते व्हीव्हीआयपी लाऊंज तयार करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी आजी-माजी खासदार, आमदारांनी ९ वाजता पासूनच हजेरी लावणे सुरू केले. ९: ३० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी आले. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यायला उशिर होता. त्यामुळे उपस्थितांना नमस्कार करत करत फडणवीस व्हीव्हीआयपी लाऊंजमध्ये गेले. तेथे ते निवडक सहकाऱ्यांसह बराच वेळ बसले. काही वेळेनंतर गडकरी यांचे आगमन झाल्याने फडणवीस लाऊंजमधून उठून मंचावर गेले. त्याच्या वीसएक मिनिटानंतर (१०:१५ वाजता) व्हीआयपी लाऊंजमधून वेगळाच कडकडाट ऐकू येऊ लागला. 'शॉर्ट सर्किट'मुळे ठिणग्या उडाल्या अन् एकच धावपळ माजली. साधारणत: एक ते दोन मिनिटे ठिणग्यांचा थरथराट सुरू होता. परिणामी तेथे गोंधळ निर्माण झाला. सुरक्षा रक्षक, रेल्वेचे अधिकारी धावले. अग्निशमन उपकरणाचा वापर झाला अन् पुन्हा जैसे थे' स्थिती झाली. तासाभरानंतर कार्यक्रम संपला मात्र एवढ्या चांगल्या कार्यक्रमस्थळी घडलेली ही घटना महारेलच्या अधिकाऱ्यांना धडकी भरविणारी ठरली.

... तर काय गहजब झाला असता ?

उपमुख्यमंत्री फडणवीस ज्यावेळी तेथे बसून होते, त्यावेळी ही घटना घडली असती तर काय गहजब झाला असता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यावर आता चर्चाही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, वरकरणी हा प्रकार किरकोळ वाटत असला तरी त्याची गंभीर दखल घेतली गेल्यास कार्यक्रम आयोजनाशी संबंधित असलेल्या काहींना मोठी किंमत चुकवावी लागू शकते, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :fireआगAccidentअपघात