शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

शेतकरी लागला पेरणीच्या कामाला; पावसाची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2023 22:13 IST

Nagpur News दोन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची चौफेर रिमझिम सुरू आहे. कुठे कमी-जास्त तर कुठे समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तर, काही शेतकरी अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

नागपूर : गत दोन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची चौफेर रिमझिम सुरू आहे. कुठे कमी-जास्त तर कुठे समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तर, काही शेतकरी अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. रिमझिम सुरू असलेला पाऊस पेरणीपश्चात हुलकावणी तर देणार नाही ना, अशी भीती त्यांना सतावत आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असताना मान्सून लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. अशातच शनिवारी (दि. २४) तालुक्यात काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारला काहीशी उसंत घेत, पुन्हा सोमवारपासून बुधवारला (दि. २८) दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे काही गावांत गत दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला हात लावला आहे. तालुक्यात पाच महसूल मंडळे आहेत. यातील भिवापूर मंडळात मंगळवार व बुधवार अनुक्रमे ७५ व ३५ मिमी पाऊस पडला. तर कारगाव मंडळात अनुक्रमे ४७ व २७ मिमी, नांद मंडळात अनुक्रमे २० व ७.२० मिमी, मालेवाडा अनुक्रमे १२ व ५ मिमी तर जवळी मंडळात ८ व ५ मिमी पाऊस पडला. तालुक्यात ३२.८० मिमी व १५.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी खरिपाच्या हंगामात पेरणीसाठी घरगुती दर्जेदार बियाण्यांचा वापर वाढला आहे. कंपन्यांच्या बियाण्यांच्या किमती दिवसागणिक वाढत असून बियाण्यांची बोगसबाजी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाकडून सतत प्रयत्न होत असतात. याचाच एक भाग म्हणजे गत काही वर्षांपासून कृषी विभाग शेतकऱ्यांना खरिपासाठी घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला देत आहे.

यावर्षी तालुक्यात जवळपास ९० टक्के शेतकरी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत आहेत. सोयाबीन स्वपरागीत असल्याने त्याचे संकरित वाण नाही. त्यामुळे प्रमाणित बियाणे पुढील तीन वर्षे वापरता येते. उत्पन्नात कोणतीही घट येत नाही. तालुक्यात ‘सोयाबीन राखीव बियाणे मोहीम’ युद्धपातळीवर राबविण्यात आली. गावागावांत सभा व बैठकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुयोग्य पद्धतीने बियाणे साठवणुकीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

 

तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. मात्र, ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. खासगी कंपनीचे बियाणे वापरताना पिशवीचे लेबल जपून ठेवावे. निविष्ठाचे पक्के बिल घ्यावे. बिलावर लॉट नंबर, साठा, किंमत व स्वाक्षरी नमूद असावी. कुठे काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.

-राजेश जारोंडे, तालुका कृषी अधिकारी, भिवापूर

टॅग्स :Farmerशेतकरी