शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शेतकरी लागला पेरणीच्या कामाला; पावसाची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2023 22:13 IST

Nagpur News दोन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची चौफेर रिमझिम सुरू आहे. कुठे कमी-जास्त तर कुठे समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तर, काही शेतकरी अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

नागपूर : गत दोन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची चौफेर रिमझिम सुरू आहे. कुठे कमी-जास्त तर कुठे समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तर, काही शेतकरी अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. रिमझिम सुरू असलेला पाऊस पेरणीपश्चात हुलकावणी तर देणार नाही ना, अशी भीती त्यांना सतावत आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असताना मान्सून लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. अशातच शनिवारी (दि. २४) तालुक्यात काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारला काहीशी उसंत घेत, पुन्हा सोमवारपासून बुधवारला (दि. २८) दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे काही गावांत गत दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला हात लावला आहे. तालुक्यात पाच महसूल मंडळे आहेत. यातील भिवापूर मंडळात मंगळवार व बुधवार अनुक्रमे ७५ व ३५ मिमी पाऊस पडला. तर कारगाव मंडळात अनुक्रमे ४७ व २७ मिमी, नांद मंडळात अनुक्रमे २० व ७.२० मिमी, मालेवाडा अनुक्रमे १२ व ५ मिमी तर जवळी मंडळात ८ व ५ मिमी पाऊस पडला. तालुक्यात ३२.८० मिमी व १५.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी खरिपाच्या हंगामात पेरणीसाठी घरगुती दर्जेदार बियाण्यांचा वापर वाढला आहे. कंपन्यांच्या बियाण्यांच्या किमती दिवसागणिक वाढत असून बियाण्यांची बोगसबाजी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाकडून सतत प्रयत्न होत असतात. याचाच एक भाग म्हणजे गत काही वर्षांपासून कृषी विभाग शेतकऱ्यांना खरिपासाठी घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला देत आहे.

यावर्षी तालुक्यात जवळपास ९० टक्के शेतकरी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत आहेत. सोयाबीन स्वपरागीत असल्याने त्याचे संकरित वाण नाही. त्यामुळे प्रमाणित बियाणे पुढील तीन वर्षे वापरता येते. उत्पन्नात कोणतीही घट येत नाही. तालुक्यात ‘सोयाबीन राखीव बियाणे मोहीम’ युद्धपातळीवर राबविण्यात आली. गावागावांत सभा व बैठकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुयोग्य पद्धतीने बियाणे साठवणुकीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

 

तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. मात्र, ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. खासगी कंपनीचे बियाणे वापरताना पिशवीचे लेबल जपून ठेवावे. निविष्ठाचे पक्के बिल घ्यावे. बिलावर लॉट नंबर, साठा, किंमत व स्वाक्षरी नमूद असावी. कुठे काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.

-राजेश जारोंडे, तालुका कृषी अधिकारी, भिवापूर

टॅग्स :Farmerशेतकरी