शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी लागला पेरणीच्या कामाला; पावसाची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2023 22:13 IST

Nagpur News दोन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची चौफेर रिमझिम सुरू आहे. कुठे कमी-जास्त तर कुठे समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तर, काही शेतकरी अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

नागपूर : गत दोन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची चौफेर रिमझिम सुरू आहे. कुठे कमी-जास्त तर कुठे समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तर, काही शेतकरी अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. रिमझिम सुरू असलेला पाऊस पेरणीपश्चात हुलकावणी तर देणार नाही ना, अशी भीती त्यांना सतावत आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असताना मान्सून लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. अशातच शनिवारी (दि. २४) तालुक्यात काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारला काहीशी उसंत घेत, पुन्हा सोमवारपासून बुधवारला (दि. २८) दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे काही गावांत गत दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला हात लावला आहे. तालुक्यात पाच महसूल मंडळे आहेत. यातील भिवापूर मंडळात मंगळवार व बुधवार अनुक्रमे ७५ व ३५ मिमी पाऊस पडला. तर कारगाव मंडळात अनुक्रमे ४७ व २७ मिमी, नांद मंडळात अनुक्रमे २० व ७.२० मिमी, मालेवाडा अनुक्रमे १२ व ५ मिमी तर जवळी मंडळात ८ व ५ मिमी पाऊस पडला. तालुक्यात ३२.८० मिमी व १५.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी खरिपाच्या हंगामात पेरणीसाठी घरगुती दर्जेदार बियाण्यांचा वापर वाढला आहे. कंपन्यांच्या बियाण्यांच्या किमती दिवसागणिक वाढत असून बियाण्यांची बोगसबाजी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाकडून सतत प्रयत्न होत असतात. याचाच एक भाग म्हणजे गत काही वर्षांपासून कृषी विभाग शेतकऱ्यांना खरिपासाठी घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला देत आहे.

यावर्षी तालुक्यात जवळपास ९० टक्के शेतकरी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत आहेत. सोयाबीन स्वपरागीत असल्याने त्याचे संकरित वाण नाही. त्यामुळे प्रमाणित बियाणे पुढील तीन वर्षे वापरता येते. उत्पन्नात कोणतीही घट येत नाही. तालुक्यात ‘सोयाबीन राखीव बियाणे मोहीम’ युद्धपातळीवर राबविण्यात आली. गावागावांत सभा व बैठकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुयोग्य पद्धतीने बियाणे साठवणुकीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

 

तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. मात्र, ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. खासगी कंपनीचे बियाणे वापरताना पिशवीचे लेबल जपून ठेवावे. निविष्ठाचे पक्के बिल घ्यावे. बिलावर लॉट नंबर, साठा, किंमत व स्वाक्षरी नमूद असावी. कुठे काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.

-राजेश जारोंडे, तालुका कृषी अधिकारी, भिवापूर

टॅग्स :Farmerशेतकरी