शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी सीमावाद संपविण्यासाठी दिल्ली दरबारी नवस करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 19:16 IST

Nagpur News महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमावादाच्या मुद्द्यावर केव्हा नवस करणार, असा रोखठोक सवाल शिवसेना पक्ष प्रमुख व विधान परिषद सदस्य उद्धव ठाकरे यांनी सभागृहाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

ठळक मुद्देकेवळ निकालाची प्रतीक्षा, एक इंचही जमीन देणार नाही, ठाकरेंचा इशारा

नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्व मानणारे आहेत. ते नेहमी देवदर्शनाला दिल्लीला जात असतात. आजचा दिवस गेला म्हणून नवस फेडण्यासाठी, तर उद्याचा दिवस नीट जावा म्हणून नवस करण्यासाठी ते दिल्लीला जातात. राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. ते सीमावादाच्या मुद्द्यावर केव्हा नवस करणार, असा रोखठोक सवाल शिवसेना पक्ष प्रमुख व विधान परिषद सदस्य उद्धव ठाकरे यांनी सभागृहाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

कानडी लोकांकडून मराठी भाषिक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. त्याविरोधात सरकार बोलायला तयार नाहीत. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट बघत आहोत, तो निकाल आल्यानंतर एक इंचही जमीन आम्ही कर्नाटकाला देणार नाही, असा दमही त्यांनी यावेळी भरला. हिवाळी अधिवेशनात मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घातल्यामुळे अधिवेशनाचे दिवस वाया गेल्याचे ते म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिल्याची प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.

- बॉम्बला फक्त पेटवायचा अवकाश आहे

आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत. वातीही बाहेर काढून ठेवल्या आहेत. आता फक्त पेटवायचा अवकाश आहे, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे