शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीसाठी सज्ज असल्याचा मध्य रेल्वेचा दावा सात तासातच पावसाने वाहून नेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2023 22:40 IST

Nagpur News मान्सूनमुळे होणाऱ्या सर्व संभाव्य घटनांना टाळण्यासाठी मध्य रेल्वेने आधुनिक उपकरणांसह तयारी पूर्ण केली आहे, असा दावा आज सकाळी मध्य रेल्वेने केला. आश्चर्य म्हणजे, काही तासातच जोरदार पावसाने मध्य रेल्वेचा हा दावा पोकळ ठरवत पुरता वाहून नेला.

 

नरेश डोंगरे

नागपूर : दरड कोसळणे, ट्रॅक वाहून जाणे, यासारख्या मान्सूनमुळे होणाऱ्या सर्व संभाव्य घटनांना टाळण्यासाठी मध्य रेल्वेने आधुनिक उपकरणांसह तयारी पूर्ण केली आहे, असा दावा आज सकाळी मध्य रेल्वेने केला. आश्चर्य म्हणजे, काही तासातच जोरदार पावसाने मध्य रेल्वेचा हा दावा पोकळ ठरवत पुरता वाहून नेला. नागपूर - मुंबई रेल्वे मार्गावरील मुर्तीजापूर माना दरम्यान रेल्वे ट्रॅकच पावसाच्या पाण्याने पोखरून काढला. त्यामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ निर्माण झाली असून सर्वत्र उलट सुलट चर्चेचा बाजार गरम केला आहे.

मध्य रेल्वेने आज सोमवारी सकाळी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले. त्यात मध्य रेल्वेच्या क्षेत्रातील घाट विभाग, उंच कटिंग्ज, बोगदे, तीव्र उतार, वक्रता यातून जाणाऱ्या मार्गावरच्या रुळांवर दगड, दरड पडण्याची पावसाळ्यात शक्यता असते. सरसरी ५ हजार मिलिमिटर पाऊस पडतो. त्यामुळे भूस्खलन होते, खड्डे पडणे, ट्रॅक तुटणे, वाहून जाणे आदींची भीती असते. ते होऊ नये म्हणून आवश्यक ती सर्व कामे करण्यात आल्याचा दावा मध्य रेल्वेने केला. मात्र, हा दावा सार्वजनिक होऊन अवघे सात ते आठ तास होत नाही तोच विदर्भात काही भागात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकखालून जोरदार प्रवाहाने पाणी वाहून जात असल्याने नागपूर - मुंबई रेल्वे मार्गावरील मुर्तीजापूर माना दरम्यानचा ट्रॅकच धोकादायक स्थितीत आला. पुलाच्या खालून पुराचे पाणी वाहून जावे, तशी स्थिती या घटनास्थळी निर्माण झाली. प्रारंभी त्या भागातील शेतकरी, गावकरी आणि रेल्वे ट्रॅकची गस्त करणाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. हा भाग विदर्भात जरी येत असला तरी तो भुसावळ रेल्वे डिव्हीजनमध्ये येतो. त्यामुळे तिकडे कर्मचाऱ्यांसोबतच भुसावळ डिव्हीजनचे वरिष्ठ रेल्वे अधिकारीही पोहचले. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गाने धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आहे, त्याच ठिकाणी थांबविण्यात आल्या. काही रेल्वे गाड्यांचे मार्गही वळविण्यात आले. 

मोठा अनर्थ टळलाहा प्रकार लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. कारण काही वेळेतच या ठिकाणच्या ट्रॅकवरून अमरावती, बडनेरा, नागपूर -पुणे तसेच हावडा एलटीटी एक्सप्रेस जाणार होती. सायंकाळची वेळ आणि निर्जन ठिकाणी ट्रॅक खाली बोगदा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. अशात या ट्रॅकवरून रेल्वेगाडी गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवाने तसे काही झाले नाही.

घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात रेल्वे कर्मचारी पोहचले आहेत. आवश्यक ते काम करून हा ट्रॅक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे.जीवन चाैधरी

मध्य रेल्वे अधिकारी, भुसावळ डिव्हीजन.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेRainपाऊस