शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिरंगाईच्या घोड्यांनीच पिले गोसीखुर्दच्या सिंचनाचे पाणी!

By निशांत वानखेडे | Updated: August 28, 2023 10:48 IST

३० हजार कोटींवर गेला ३७२ कोटींचा प्रकल्प

निशांत वानखेडे

नागपूर : एखादा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर जनतेला त्याचा लाभ मिळतो; पण रखडला तर त्याचा भुर्दंडही जनतेलाच भोगावा लागतो. गोसीखुर्द प्रकल्पाला १९८३ साली प्रशासकीय मान्यता मिळाली व ऑक्टोबर १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाया रचला. २२ एप्रिल १९८८ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून सरकारी अनास्था, प्रशासकीय चालढकल करीत प्रकल्पाचे काम सुरू असून या प्रकल्पामुळे विस्थापित झालेली एक पिढी गतप्राण झाली तरी प्रकल्प काही पूर्ण होत नाही.

प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेले धरणाचे बांधकाम तेवढे २००८ मध्ये पूर्ण झाले. डावा कालवा, उजवा कालव्यांची पुनबांधणी, अस्तरीकरणाची कामे, शाखा कालवे, उपकालवे, शेतापर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या वितरिकांची कामेही अपूर्ण आहेत. आतापर्यंत १ लाख ५२ हजार ७४३ हेक्टर शेती सिंचनाखाली आल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक परिस्थिती याहून वेगळी आहे. आता जून २०२५ पर्यंत हा प्रकल्प १०० टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, सरकारकडून मिळणारा निधी पाहता हेही दिवास्वप्नच वाटते आहे.

भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचेही तेच झाले आहे. ३५ वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाचा बजेट ३७२ कोटींवरून आता ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकवर गेला आहे. धरण पूर्ण झाले असे म्हणता प येते; पण सिंचनाचा लाभ काही लोकांपर्यंत पोहोचला नाही.

प्रकल्पाचे स्वरूप

  • वैनगंगा नदीवरील मुख्य धरण ६५३ मीटर लांब, ९२ मीटर उंच.
  • भंडारा जिल्हा १०४ व नागपूर जिल्ह्यात ८५ गावांचे विस्थापन. २४९ गावांचे पुनर्वसन.
  • सिंचन क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टर. यात भंडारा जिल्हा ८९,८५६ हेक्टर. नागपूर १९,४८१ हेक्टर व चंद्रपूर जिल्हा १ लाख ४१ हजार ४६३ हेक्टर.
  • डावा कालवा २३ किमी. उजवा कालवा ९९.५३ किमी.
  • डावा कालवा: पवनी ४६ व लाखांदूर तालुक्यात ४४ अशा ९० गावांत ३१,५७७ हेक्टरचे सिंचन

 

१.६० कोटी खर्च दररोज वाढला

  • गोसीखुर्द प्रकल्प हा १९८३ साली ३७२ कोटी रुपयांचा होता २०१३-१४ च्या प्रस्तावित किमतीनुसार त्यावर १८,११०.०८ कोटी इतका खर्च दाखविण्यात आला.
  • आता २०२३ पर्यंत हा खर्च ३० हजार कोटींवर गेल्याचे सांगण्यात •येत आहे. हा खर्च पाहता गोसी खुर्द प्रकल्पाचा खर्च दरदिवशी १ कोटी ६० लाख रुपये इतका वाढला आहे.

 

प्रकल्पातून सिंचन स्थिती

  • डावा कालवा २३ किमी - अस्तरीकरण व पुनबांधणीचे काम ७५ टक्के पूर्ण. शाखा कालवे १०० टक्के पूर्ण.
  • वितरिका ७१.४५ किमी व लघू कालवे २२५,६० किमी ७५ टक्के पूर्ण.
  • ४५,३३६ हेक्टर सिंचन क्षमता. एप्रिल २०२३ पर्यंत ३१,५४६ हेक्टर झाल्याचा दावा, १४,०३३ हेक्टर प्रत्यक्ष सिंचन.
  • उजवा कालवा : ६४,३६२ हेक्टर सिंचन क्षमता. अस्तरीकरण व पुर्नबांधणी ८० टक्के पूर्ण, १ ते ३० किमीतील वितरिका ८० टक्के पूर्ण, ३१ ते ९९.५३ किमीतील वितरिकांची कामे ५० टक्के अपूर्ण. सिंचन क्षमता ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पWaterपाणीbhandara-acभंडारा