शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

दिरंगाईच्या घोड्यांनीच पिले गोसीखुर्दच्या सिंचनाचे पाणी!

By निशांत वानखेडे | Updated: August 28, 2023 10:48 IST

३० हजार कोटींवर गेला ३७२ कोटींचा प्रकल्प

निशांत वानखेडे

नागपूर : एखादा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर जनतेला त्याचा लाभ मिळतो; पण रखडला तर त्याचा भुर्दंडही जनतेलाच भोगावा लागतो. गोसीखुर्द प्रकल्पाला १९८३ साली प्रशासकीय मान्यता मिळाली व ऑक्टोबर १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाया रचला. २२ एप्रिल १९८८ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून सरकारी अनास्था, प्रशासकीय चालढकल करीत प्रकल्पाचे काम सुरू असून या प्रकल्पामुळे विस्थापित झालेली एक पिढी गतप्राण झाली तरी प्रकल्प काही पूर्ण होत नाही.

प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेले धरणाचे बांधकाम तेवढे २००८ मध्ये पूर्ण झाले. डावा कालवा, उजवा कालव्यांची पुनबांधणी, अस्तरीकरणाची कामे, शाखा कालवे, उपकालवे, शेतापर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या वितरिकांची कामेही अपूर्ण आहेत. आतापर्यंत १ लाख ५२ हजार ७४३ हेक्टर शेती सिंचनाखाली आल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक परिस्थिती याहून वेगळी आहे. आता जून २०२५ पर्यंत हा प्रकल्प १०० टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, सरकारकडून मिळणारा निधी पाहता हेही दिवास्वप्नच वाटते आहे.

भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचेही तेच झाले आहे. ३५ वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाचा बजेट ३७२ कोटींवरून आता ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकवर गेला आहे. धरण पूर्ण झाले असे म्हणता प येते; पण सिंचनाचा लाभ काही लोकांपर्यंत पोहोचला नाही.

प्रकल्पाचे स्वरूप

  • वैनगंगा नदीवरील मुख्य धरण ६५३ मीटर लांब, ९२ मीटर उंच.
  • भंडारा जिल्हा १०४ व नागपूर जिल्ह्यात ८५ गावांचे विस्थापन. २४९ गावांचे पुनर्वसन.
  • सिंचन क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टर. यात भंडारा जिल्हा ८९,८५६ हेक्टर. नागपूर १९,४८१ हेक्टर व चंद्रपूर जिल्हा १ लाख ४१ हजार ४६३ हेक्टर.
  • डावा कालवा २३ किमी. उजवा कालवा ९९.५३ किमी.
  • डावा कालवा: पवनी ४६ व लाखांदूर तालुक्यात ४४ अशा ९० गावांत ३१,५७७ हेक्टरचे सिंचन

 

१.६० कोटी खर्च दररोज वाढला

  • गोसीखुर्द प्रकल्प हा १९८३ साली ३७२ कोटी रुपयांचा होता २०१३-१४ च्या प्रस्तावित किमतीनुसार त्यावर १८,११०.०८ कोटी इतका खर्च दाखविण्यात आला.
  • आता २०२३ पर्यंत हा खर्च ३० हजार कोटींवर गेल्याचे सांगण्यात •येत आहे. हा खर्च पाहता गोसी खुर्द प्रकल्पाचा खर्च दरदिवशी १ कोटी ६० लाख रुपये इतका वाढला आहे.

 

प्रकल्पातून सिंचन स्थिती

  • डावा कालवा २३ किमी - अस्तरीकरण व पुनबांधणीचे काम ७५ टक्के पूर्ण. शाखा कालवे १०० टक्के पूर्ण.
  • वितरिका ७१.४५ किमी व लघू कालवे २२५,६० किमी ७५ टक्के पूर्ण.
  • ४५,३३६ हेक्टर सिंचन क्षमता. एप्रिल २०२३ पर्यंत ३१,५४६ हेक्टर झाल्याचा दावा, १४,०३३ हेक्टर प्रत्यक्ष सिंचन.
  • उजवा कालवा : ६४,३६२ हेक्टर सिंचन क्षमता. अस्तरीकरण व पुर्नबांधणी ८० टक्के पूर्ण, १ ते ३० किमीतील वितरिका ८० टक्के पूर्ण, ३१ ते ९९.५३ किमीतील वितरिकांची कामे ५० टक्के अपूर्ण. सिंचन क्षमता ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पWaterपाणीbhandara-acभंडारा