शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात थाळीनाद

By admin | Updated: October 28, 2015 03:24 IST

केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन येणार, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक : डाळींचे भाव कमी करानागपूर : केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन येणार, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहे. तूर डाळ प्रति किलो २०० रुपयावर गेली आहे. महागाईमुळे गरीब माणूस उद्ध्वस्त झाला आहे.नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. राज्यातील युती सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंगळवारी केला.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी आकाशवाणी चौकात ‘थाळीनाद’आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री व शहर अध्यक्ष अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दिवाळीचा सण जवळ आला असताना डाळी व खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडले आहे. केंद्रात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत असताना तूर डाळीचे भाव ९० रुपयावर गेले होते. परंतु भाववाढ कमी करण्यासाठी एक लाख मेट्रिक टन तूरडाळ आयात क रून सवलतीच्या दरात ५५ रुपये किलो भावाने राज्यातील रेशन दुकानातून उपलब्ध केली होती. असा ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच शेतकरी अडचणीत असल्याने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी महिलांनी थाळीनाद करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत असून महागाई आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. आघाडी सरकारच्या काळात लोकांना ५५ रुपये किलो दराने डाळ उपलब्ध केली होती. परंतु भाववाढीला आळा घालण्यासाठी युती सरकार कोणतेही निर्णय घेत नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला.आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार दीनानाथ पडोळे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुटे, ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख, माजी अध्यक्ष अजय पाटील, वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, बंडू उमरकर, राजु नागुलवार, प्रगती पाटील, दुनेश्वर पेठे,राजेश कुंभलकर, रमन ठवकर, मुन्ना तिवारी, तनुज चौबे, नूतन रेवतकर, शब्बीर विद्रोही, विशाल खांडेकर, बजरंगसिंग परिहार, माधुरी कुसुंबे, कामिल अंसारी,अशोक राऊ त, अशोक काटले, ज्ञानबा मसके, मिलिंद मानापुरे, राजू जैन, ईश्वर बाळबुधे, सुरेश धनवानी, तारामती रहागुडे, कल्पना मानकरआदी उपस्थित होते.चित्रा वाघ व अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन दिले.(प्रतिनिधी)