शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात थाळीनाद

By admin | Updated: October 28, 2015 03:24 IST

केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन येणार, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक : डाळींचे भाव कमी करानागपूर : केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन येणार, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहे. तूर डाळ प्रति किलो २०० रुपयावर गेली आहे. महागाईमुळे गरीब माणूस उद्ध्वस्त झाला आहे.नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. राज्यातील युती सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंगळवारी केला.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी आकाशवाणी चौकात ‘थाळीनाद’आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री व शहर अध्यक्ष अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दिवाळीचा सण जवळ आला असताना डाळी व खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडले आहे. केंद्रात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत असताना तूर डाळीचे भाव ९० रुपयावर गेले होते. परंतु भाववाढ कमी करण्यासाठी एक लाख मेट्रिक टन तूरडाळ आयात क रून सवलतीच्या दरात ५५ रुपये किलो भावाने राज्यातील रेशन दुकानातून उपलब्ध केली होती. असा ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच शेतकरी अडचणीत असल्याने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी महिलांनी थाळीनाद करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत असून महागाई आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. आघाडी सरकारच्या काळात लोकांना ५५ रुपये किलो दराने डाळ उपलब्ध केली होती. परंतु भाववाढीला आळा घालण्यासाठी युती सरकार कोणतेही निर्णय घेत नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला.आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार दीनानाथ पडोळे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुटे, ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख, माजी अध्यक्ष अजय पाटील, वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, बंडू उमरकर, राजु नागुलवार, प्रगती पाटील, दुनेश्वर पेठे,राजेश कुंभलकर, रमन ठवकर, मुन्ना तिवारी, तनुज चौबे, नूतन रेवतकर, शब्बीर विद्रोही, विशाल खांडेकर, बजरंगसिंग परिहार, माधुरी कुसुंबे, कामिल अंसारी,अशोक राऊ त, अशोक काटले, ज्ञानबा मसके, मिलिंद मानापुरे, राजू जैन, ईश्वर बाळबुधे, सुरेश धनवानी, तारामती रहागुडे, कल्पना मानकरआदी उपस्थित होते.चित्रा वाघ व अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन दिले.(प्रतिनिधी)