शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

'म्हणून' हे सरकार टिकणार नाही, नितीन गडकरींनी साधला शिवसेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 14:51 IST

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या विचारांत ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार टिकणार नाही

नागपूर - भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर टीका केली. नागरिकत्व दूरुस्ती कायद्याला शिवसेनेने दर्शवलेलं समर्थन पाठिमागे घेतल्यावरुन गडकरी यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. राज्यातील सत्तांतरावर बोलताना, तिन्ही पक्ष आमच्या विरोधात एकवटले याचा अर्थ आम्ही बलवान आहोत. या सरकारमध्ये ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार टिकणार नाही, असे भाकितही गडकरींनी केले आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या विचारांत ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार टिकणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर नितीन गडकरींनी हल्लाबोल केला. त्यानंतर, शिवसेनेलाही टार्गेट केलं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते बांग्लादेशींना मुंबईतून हाकला. मात्र, आता शिवसेना यासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. हिंदुत्व, मराठी माणुस हे सगळे मुद्दे त्यांनी सोडून दिले. त्यामुळे हिंदुत्ववादी आणि मराठी माणूस शिवसेनेवर नाराज आहे. सावरकरांना शिवसेना मानते. पण, काँग्रेस त्यांच्याविरोधात वक्तव्य देते. सत्तेसाठी त्यांना दुर्बलता व लाचारी पत्करावी लागत आहे, स्वतःचे विचार सोडावे लागत आहेत.  

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आजपासून भाजपातर्फे जनसंपर्क अभियान सुरू करण्यात येत आहे. देशभरात हे अभियान सुरू होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.  

टॅग्स :nagpurनागपूरShiv SenaशिवसेनाNitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्री