शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:20 IST

देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देसुधीर सावंत यांचे मत : काश्मिरी नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले.हा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती आयोजन समितीच्यावतीने शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, शिवाजी उद्योजक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार शिंदे, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया, अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभेचे राष्ट्रीय महासचिव आर. एस. कनौजिया, विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. नीरज खांदेवाले, जनमंच संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे, आम आदमी पार्टीचे पूर्व विदर्भ संघटक देवेंद्र वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सध्या काश्मीरमधील नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे दहशतवादी अधिक सक्रिय झाले आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या सुरक्षाविषयक धोरणामध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. देशाचे संरक्षण मंत्रालय सेनेशी संबंधित व्यक्तीना चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. परंतु, सत्तेच्या लालसेपोटी कुणालाही संरक्षण मंत्री केले जाते, असे सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले. याशिवाय त्यांनी ‘डब्ल्यूटीओ’चा कडाडून विरोध केला व शेतकऱ्यांना झिरो बजेट शेती करण्याचे आवाहन केले.अ‍ॅड. अणे यांनी ‘जागतिक आर्थिक धोरण व राजकारणामुळे राज्यघटनेला धोका’ या विषयावर मार्गदर्शन केले. सरकारने केवळ व्यापारी दृष्टिकोन ठेवल्यास देशात अराजकता माजेल. सरकारचे धोरण नेहमी जनतेच्या भल्याचे असले पाहिजे. ‘डब्ल्यूटीओ’च्या धोरणाचा भारतीय नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशाची कल्याणकारी राज्य ही संकल्पना धोक्यात आली आहे. सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे, असे त्यांनी सांगितले.पवार यांनी ‘कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम’ या विषयावर प्रकाश टाकला. शेती व शेतकऱ्यांचे कल्याण केल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. विजयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक, अरुण वनकर यांनी संचालन तर, रविशंकर मांडवकर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnagpurनागपूर