शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:20 IST

देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देसुधीर सावंत यांचे मत : काश्मिरी नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले.हा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती आयोजन समितीच्यावतीने शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, शिवाजी उद्योजक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार शिंदे, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया, अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभेचे राष्ट्रीय महासचिव आर. एस. कनौजिया, विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. नीरज खांदेवाले, जनमंच संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे, आम आदमी पार्टीचे पूर्व विदर्भ संघटक देवेंद्र वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सध्या काश्मीरमधील नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे दहशतवादी अधिक सक्रिय झाले आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या सुरक्षाविषयक धोरणामध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. देशाचे संरक्षण मंत्रालय सेनेशी संबंधित व्यक्तीना चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. परंतु, सत्तेच्या लालसेपोटी कुणालाही संरक्षण मंत्री केले जाते, असे सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले. याशिवाय त्यांनी ‘डब्ल्यूटीओ’चा कडाडून विरोध केला व शेतकऱ्यांना झिरो बजेट शेती करण्याचे आवाहन केले.अ‍ॅड. अणे यांनी ‘जागतिक आर्थिक धोरण व राजकारणामुळे राज्यघटनेला धोका’ या विषयावर मार्गदर्शन केले. सरकारने केवळ व्यापारी दृष्टिकोन ठेवल्यास देशात अराजकता माजेल. सरकारचे धोरण नेहमी जनतेच्या भल्याचे असले पाहिजे. ‘डब्ल्यूटीओ’च्या धोरणाचा भारतीय नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशाची कल्याणकारी राज्य ही संकल्पना धोक्यात आली आहे. सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे, असे त्यांनी सांगितले.पवार यांनी ‘कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम’ या विषयावर प्रकाश टाकला. शेती व शेतकऱ्यांचे कल्याण केल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. विजयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक, अरुण वनकर यांनी संचालन तर, रविशंकर मांडवकर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजnagpurनागपूर