शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

सी ६० चा टेरर; नक्षली फसले चक्रव्यूहमध्ये, आणखी दोन दलम संपले; संदीप पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 07:14 IST

सी ६० पथकाची नक्षल्यामंध्ये दहशत असल्याचे मत नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केले आहे.

राजेश शेगाेकार

नागपूर : माओवाद्यांशी चकमकीवेळी सुरक्षा जवानांना सुरक्षित बाहेर काढून नक्षल्यांना ठेचण्याचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण काैशल्य ‘चक्रव्यूह’ याेजनेद्वारे साधले असून, गेल्या चार वर्षांपासून ते यशस्वी ठरत आहे. परिणामी, सी ६० पथकाची नक्षल्यामंध्ये दहशत असल्याचे मत नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केले आहे.

या मोहिमेविषयी बोलताना श्री पाटील म्हणाले, की नक्षलविरोधी अभियानाच्या या यशामुळे गडचिरोलीतील सामान्य आदिवासींमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून, गडचिराेलीत तैनात पाेलिसांचे मनाेबल उंचावले आहे. गेल्या चार वर्षांत जेवढ्या चकमकी झाल्यात त्यामध्ये ‘चक्रव्यूह’ची याेजना महत्त्वाची ठरली. नक्षलवादी काेणत्याही जागी चार तासांहून अधिक वेळ थांबत नाहीत त्यामुळे आम्हाला माहिती मिळताच आम्ही अवघ्या

दाेन तासांत नक्षल्यांना घेरताे व अजिबात जीवितहानी होऊ न देता नक्षल्यांचा खात्मा केला जातो. सर्व अधिकारी, जवान यांच्या एकत्रित टीमवर्कचे हे यश आहे, असेही पाटील म्हणाले.

संधी, वेळ अन् नियाेजन हे ‘चक्रव्यूह’चे यश

नक्षल्यांची खबर मिळताच त्या संधीला आव्हान म्हणून स्वीकारण्याची वृत्ती व चढाईचे नियाेजन, पथकांमधील जवान अन् अधिकाऱ्यांमध्ये समन्वय हे चक्रव्यूहचे यश आहे, असे पाटील म्हणाले.

अवघ्या दाेन तासांत घटनास्थळ गाठल्या जाते, ‘पहिल्या फळीतील जवान नक्षल्यांना हल्ला करण्याची संधीही देत नाहीत. या जवानांच्या पाठीशी दुसरी फळी ‘बॅकॲप’ म्हणून सज्ज असते.

दोन दलमचा खात्मा

१३ मे २०२४ रोजी पेरमिली दलममधील तीन नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. यामुळे पेरमिली दलम संपुष्टात आले. कोरची-टिपागड, चातगाव- कसनसूर, अहेरी, गट्टा, भामरागड व कंपनी क्र. १० हे सहाच दलम सक्रिय होते. त्यात ८७ सदस्य होते. दि. १७ जुलै रोजीच्या चकमकीत यातील १२ नक्षली ठार झाल्याने दोन्ही दलम संपुष्टात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस