शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सी ६० चा टेरर; नक्षली फसले चक्रव्यूहमध्ये, आणखी दोन दलम संपले; संदीप पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 07:14 IST

सी ६० पथकाची नक्षल्यामंध्ये दहशत असल्याचे मत नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केले आहे.

राजेश शेगाेकार

नागपूर : माओवाद्यांशी चकमकीवेळी सुरक्षा जवानांना सुरक्षित बाहेर काढून नक्षल्यांना ठेचण्याचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण काैशल्य ‘चक्रव्यूह’ याेजनेद्वारे साधले असून, गेल्या चार वर्षांपासून ते यशस्वी ठरत आहे. परिणामी, सी ६० पथकाची नक्षल्यामंध्ये दहशत असल्याचे मत नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केले आहे.

या मोहिमेविषयी बोलताना श्री पाटील म्हणाले, की नक्षलविरोधी अभियानाच्या या यशामुळे गडचिरोलीतील सामान्य आदिवासींमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून, गडचिराेलीत तैनात पाेलिसांचे मनाेबल उंचावले आहे. गेल्या चार वर्षांत जेवढ्या चकमकी झाल्यात त्यामध्ये ‘चक्रव्यूह’ची याेजना महत्त्वाची ठरली. नक्षलवादी काेणत्याही जागी चार तासांहून अधिक वेळ थांबत नाहीत त्यामुळे आम्हाला माहिती मिळताच आम्ही अवघ्या

दाेन तासांत नक्षल्यांना घेरताे व अजिबात जीवितहानी होऊ न देता नक्षल्यांचा खात्मा केला जातो. सर्व अधिकारी, जवान यांच्या एकत्रित टीमवर्कचे हे यश आहे, असेही पाटील म्हणाले.

संधी, वेळ अन् नियाेजन हे ‘चक्रव्यूह’चे यश

नक्षल्यांची खबर मिळताच त्या संधीला आव्हान म्हणून स्वीकारण्याची वृत्ती व चढाईचे नियाेजन, पथकांमधील जवान अन् अधिकाऱ्यांमध्ये समन्वय हे चक्रव्यूहचे यश आहे, असे पाटील म्हणाले.

अवघ्या दाेन तासांत घटनास्थळ गाठल्या जाते, ‘पहिल्या फळीतील जवान नक्षल्यांना हल्ला करण्याची संधीही देत नाहीत. या जवानांच्या पाठीशी दुसरी फळी ‘बॅकॲप’ म्हणून सज्ज असते.

दोन दलमचा खात्मा

१३ मे २०२४ रोजी पेरमिली दलममधील तीन नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. यामुळे पेरमिली दलम संपुष्टात आले. कोरची-टिपागड, चातगाव- कसनसूर, अहेरी, गट्टा, भामरागड व कंपनी क्र. १० हे सहाच दलम सक्रिय होते. त्यात ८७ सदस्य होते. दि. १७ जुलै रोजीच्या चकमकीत यातील १२ नक्षली ठार झाल्याने दोन्ही दलम संपुष्टात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस