शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

अतिक्रमण कारवाईमुळे नागपुरातील माटे चौकात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:23 IST

माटे चौकाजवळील मौजा परसोडी भागात गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईच्या वेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देरहिवाशांकडून नासुप्र कारवाईचा विरोध : पोलिसांनी घटनास्थळाजवळ जाण्यापासून नागरिकांना रोखले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माटे चौकाजवळील मौजा परसोडी भागात गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईच्या वेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. रहिवाशांनी नासुप्रच्या कारवाईला जोरदार विरोध केला तर पोलिसांनी घटनास्थळाजवळ जाण्यापासून नागरिकांना रोखले होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, परसोडीच्या खसरा क्रमांक ३०/१, ३१/१, ३७/२ आणि ३०/३ स्थित कैसाल गृह निर्माण सहकारी संस्थेतून निघणाऱ्या मार्गाच्या ९ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे. परंतु यात काही घरे येत होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. हे अतिक्रमण हटविण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. सकाळी १०.३० वाजता कार्यकारी अभियंता (पश्चिम) देवेंद्र गौर, विभागीय अधिकारी (पश्चिम) अविनाश बडगे यांच्या नेतृत्वात पथक प्रमुख वसंत कन्हेरे व पथक कारवाईसाठी पोहोचले. कारवाईला होणारा विरोध लक्षात घेता प्रतापनगर पोलीस ठाण्यातील ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पथकाने कारवाई सुरू करताच काही महिलांनी विरोध सुरू केला. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी विरोध करणाºया दोन तरुणींनाच ताब्यात घेतले. दुपारपर्यंत तेथील तीन घरे जमीनदोस्त करण्यात आली.घर रिकामे करण्यास वेळ का दिला नाही, ठाकरे संतप्त 
दरम्यान, ही कारवाई होत असताना आमदार विकास ठाकरे यांना स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली. ते घटनास्थळी पोहोचले. रहिवाशांनी आपले गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले. घरातील सामान हटविण्यासाठीदेखील वेळ न देता कारवाई करण्यात आली. अगोदर कल्पना दिली असती तर कमीतकमी भाड्याचे घर तरी शोधता आले असते, असा आक्रोश महिलांनी केला. विकास ठाकरे यांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करता येणार नाही. परंतु घर रिकामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी रहिवाशांना वेळ द्यायला हवा होता. एरवी मोठमोठ्या प्रतिष्ठानांवर कारवाईसाठी हात आखडता घेतला जातो. परंतु गरिबांच्या घरांवर बुलडोझर तत्परतेने चालविला जातो. माणुसकी दाखविली का गेली नाही, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर