शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

नागपूर जिल्ह्यातील महालक्ष्मी जगदंबेचा गाभारा सोन्याचांदीने मढवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:17 IST

अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने भक्तांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

ठळक मुद्देकोराडी देवी मंदिर ९ पासून सुरू पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाळत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने भक्तांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. संस्थानने सुवर्ण मुखवटा व चांदीच्या आयुधासहीत तयार करून जगदंबेला चढविला आहे. आता तर मातेची मूर्ती असलेला संपूर्ण गाभारा सोन्याचांदीत मढवला जात आहे. पोलीस बंदोबस्त चोख राहणार असून हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.प्रमुख मार्गदर्शक व विश्वस्त तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आणि अन्य विश्वस्तांच्या प्रयत्नांनी मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे. कोराडी देवी मंदिर विकास प्रकल्पाचा मूळ आराखडा १८४ कोटींचा होता. आता सुधारित आराखडा २०१ कोटींचा झाला आहे. तसेच टप्पा २ चा आराखडा ९८ कोटींचा आहे. या आराखड्यातून म्युझियम, सभामंडप, रस्ते, बसस्टॉप, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पार्किंग, कॅनॉलवर स्लॅब टाकून भाविकांसाठ़ी रस्ता, या रस्त्याच्या शेजारी सोलर पॅनेल उभे करून मंदिराचा परिसरात सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहे. याशिवाय मंदिराशेजारी असलेल्या भव्य तलावातील गाळ काढून या पाण्यावरून सी प्लेन उडविण्यात येणार आहे. अशी विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे भक्तांना दिसते. या विकास कामांमुळे कोराडी देवी मंदिराचे रूपच पालटणार आहे. पर्यटन आणि तीर्थक्षेत्र अशी संकल्पना येथे राबविण्यात आली आहे. यामुळे सुरक्षित पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राहणार आहे.सध्या कोराडी मंदिर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कार्ये आणि जीर्णोध्दार सुरू आहे. मंदिर व्यवस्थापनाने आपले सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन निराधार वृध्दांसाठी एक सर्व सुविधायुक्त वृध्दाश्रम निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला आणि पुरुषांसाठ़ी स्वतंत्रपणे निर्माण होणऱ्या वृध्दाश्रमात एकूण ७० वृध्दांची व्यवस्था होईल. तसेच मंदिर परिसरात दिव्यांगांसाठी अपंग पुनर्वसन केंद्राचे निर्माण केले जात आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी यावेळी संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.मुकेश शर्मा, सचिव केशवराव फुलझेले, विश्वस्त प्रेमलाल पटेल, बाबूराव भोयर, दत्त समरितकर, दयाराम तडसरकर आदी उपस्थित होते.

दररोज ५०० लोकांना अल्प दरात भोजनमानवसेवा म्हणून श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानने दररोज ५०० लोकांना अत्यंत कमी किमतीत पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याच निर्णय घेतला आहे. समाजातील अनाथ मुलांना आधार मिळावा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने सर्व सुविधायुक्त अनाथालयाचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री