शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नागपुरातील  टेकडी गणेश मंदिरासाठी आता सरळ मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:09 IST

टेकडीच्या मंदिरासमोर झालेल्या उड्डाण पुलामुळे रस्ता वनवे झाला आहे. त्यातच टेकडी समोरील रेल्वेस्टेशन, मध्य प्रदेश परिवहन विभागाचे बसस्टॅण्ड, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे विभागीय कार्यालय असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा त्रास लवकरच कमी होणार आहे. मानस चौकातील सुभाष पुतळ्याच्या मागून थेट मंदिरापर्यंत २० मीटर रुंदीचा रस्ता बणनार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसंरक्षण मंत्रालयाने दिली १ एकर जागा : सुभाष पुतळ्याच्या मागून बनणार २० मीटरचा रोड

लोकमत विशेषनागपूर : टेकडीच्या मंदिरासमोर झालेल्या उड्डाण पुलामुळे रस्ता वनवे झाला आहे. त्यातच टेकडी समोरील रेल्वेस्टेशन, मध्य प्रदेश परिवहन विभागाचे बसस्टॅण्ड, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे विभागीय कार्यालय असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा त्रास लवकरच कमी होणार आहे. मानस चौकातील सुभाष पुतळ्याच्या मागून थेट मंदिरापर्यंत २० मीटर रुंदीचा रस्ता बणनार आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे.शिवाय मंदिरात वाहनांच्या पार्किंगची जागा सुद्धा अपुरी असल्याने खास मंदिराच्या पार्र्किंगसाठी एक एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. मंदिराचे संचालन करणारी ‘द अ‍ॅडव्हायजरी सोसायटी ऑफ गणेश टेम्पल’ ची गेल्या १० वर्षापासूनची ही मागणी होती. ३१ जानेवारी २०१५ ला यासंदर्भातील प्रस्ताव तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले होते. तेव्हापासून समितीचा पाठपुरावा सुरू होता. विद्यमान संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी टेकडी गणेश मंदिराचा मार्ग सुकर केला आहे. संरक्षण मंत्रालय ही जागा मनपाच्या स्वाधीन करणार आहे. मनपा जागेचे हस्तांतरण टेकडी गणेश मंदिराला करणार आहे.विशेष म्हणजे सणांच्या काळात गणेश मंदिरासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. मंदिरात येणारा ८५ टक्के भाविक हा मानस चौकाकडून येतो. भाविकाला उड्डाण पुलाला वळण देऊन, रेल्वेस्थानकासमोरून यावे लागते. या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असल्याने भाविकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. मंदिराकडे असलेली पार्किंगची जागा सुद्धा अपुरी असल्याने, मंदिरासमोरील शाळेत पार्किंगची सोय करण्यात येते. काही लोक रस्त्यावरच वाहने पार्किंग करतात. हा त्रास लवकरच संपणार असल्याचे समितीचे म्हणणे आहे. खरे श्रेय गडकरींचेसंरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याचे खरे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाते. त्यांनी १७ मे २०१५ रोजी मनोहर पर्रीकर यांना मंदिरात आणले होते. नागपूरकरांसाठी मंदिर किती श्रद्धेय आहे, याची प्रचिती करून दिली होती. पर्रीकर यांच्यानंतर निर्मला सीतारामण यांच्याकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मंदिरासाठी पुलाच्या समांतर असा २० मीटर रुंद व १९० मीटर लांबीचा रस्ता बनणार आहे. भाविकांसाठी पार्किंगची सुद्धा सोय होणार आहे.श्रीरंग कुळकर्णी, सचिव, द अ‍ॅडव्हायजरी सोसायटी ऑफ गणेश टेम्पल

टॅग्स :Tekdi Ganesh Mandirटेकडी गणेश मंदिरnagpurनागपूर