शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:52 IST

यावर्षी शेतकऱ्यांना कांदा लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच अल्प आहे. चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा शेतातून बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांना त्यांचे पारिश्रमिक मिळावे, असे मत कांदा-बटाटा बाजार अडतिया वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि ओम ट्रेडिंग कंपनीचे संचालक अमोल गुलवाडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देआवक वाढली, भाव कमी : खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी शेतकऱ्यांना कांदा लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच अल्प आहे. चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा शेतातून बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांना त्यांचे पारिश्रमिक मिळावे, असे मत कांदा-बटाटा बाजार अडतिया वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि ओम ट्रेडिंग कंपनीचे संचालक अमोल गुलवाडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.१०० किलोमागे १२५ रुपये भाडे, दररोज २० ते २५ ट्रकची आवकयावर्षी महाराष्ट्रासह अन्य राज्यातही कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांदा मोफत वाटल्याचे आणि भाववाढीसाठी आंदोलन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण कांद्याचे उत्पादन मुबलक झाल्यामुळे त्यांना भाव मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्या कळमन्यात औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नाशिक या भागातून पांढरे आणि लाल कांदे विक्रीस येत आहेत. दररोज २० ते २५ ट्रकची आवक आहे. त्यातच पांढऱ्या कांद्याची आवक कमी असल्यामुळे कळमन्यात भाव दर्जानुसार प्रति किलो ७ ते १२ रुपये आहेत. तसेच लाल कांद्याची आवक वाढली असून भाव ५ ते ९ रुपये आहेत. मोठ्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. खराब कांद्याला ३ ते ५ रुपये भाव आहे. दररोज २० ते २५ ट्रकची आवक आहे.भाडेखर्चामुळे नगर, औरंगाबाद, नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदे नागपुरात आणणे शक्य नाही. स्थानिक बाजारात कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची ओरड आहे. मालवाहतुकीचा खर्च क्विंटलमागे १२५ रुपये येतो. नागपुरात प्रति क्विंटल ७०० रुपये भाव असलेल्या कांद्याला नगर, औरंगाबाद येथे ३०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. भाव हजार ते १५०० रुपये मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, असे गुलवाडे यांनी स्पष्ट केले. ठोकमध्ये भाव कमी असतानाही किरकोळ बाजारात जास्त भावात विक्री होत आहे.नागपुरात येताहेत जुने बटाटेउत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे नवीन पीक निघाले आहे. पण कोल्ड स्टोरेजमधील जुने बटाटे कळमन्यात विक्रीस येत आहे. भाव ६०० ते ८०० रुपये क्विंटल आहेत. तिन्ही राज्यातून कळमन्यात बटाटे आणण्यासाठी क्विंटलमागे २०० रुपये खर्च येतो. त्यामुळे बटाटे कळमन्यात आणणे शेतकऱ्यांना परवडत नाही. पण जास्त उत्पादनामुळे कळमन्यात आवक वाढली आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी