शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:52 IST

यावर्षी शेतकऱ्यांना कांदा लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच अल्प आहे. चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा शेतातून बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांना त्यांचे पारिश्रमिक मिळावे, असे मत कांदा-बटाटा बाजार अडतिया वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि ओम ट्रेडिंग कंपनीचे संचालक अमोल गुलवाडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देआवक वाढली, भाव कमी : खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी शेतकऱ्यांना कांदा लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच अल्प आहे. चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा शेतातून बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांना त्यांचे पारिश्रमिक मिळावे, असे मत कांदा-बटाटा बाजार अडतिया वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि ओम ट्रेडिंग कंपनीचे संचालक अमोल गुलवाडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.१०० किलोमागे १२५ रुपये भाडे, दररोज २० ते २५ ट्रकची आवकयावर्षी महाराष्ट्रासह अन्य राज्यातही कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांदा मोफत वाटल्याचे आणि भाववाढीसाठी आंदोलन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण कांद्याचे उत्पादन मुबलक झाल्यामुळे त्यांना भाव मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्या कळमन्यात औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नाशिक या भागातून पांढरे आणि लाल कांदे विक्रीस येत आहेत. दररोज २० ते २५ ट्रकची आवक आहे. त्यातच पांढऱ्या कांद्याची आवक कमी असल्यामुळे कळमन्यात भाव दर्जानुसार प्रति किलो ७ ते १२ रुपये आहेत. तसेच लाल कांद्याची आवक वाढली असून भाव ५ ते ९ रुपये आहेत. मोठ्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. खराब कांद्याला ३ ते ५ रुपये भाव आहे. दररोज २० ते २५ ट्रकची आवक आहे.भाडेखर्चामुळे नगर, औरंगाबाद, नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदे नागपुरात आणणे शक्य नाही. स्थानिक बाजारात कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची ओरड आहे. मालवाहतुकीचा खर्च क्विंटलमागे १२५ रुपये येतो. नागपुरात प्रति क्विंटल ७०० रुपये भाव असलेल्या कांद्याला नगर, औरंगाबाद येथे ३०० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. भाव हजार ते १५०० रुपये मिळाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, असे गुलवाडे यांनी स्पष्ट केले. ठोकमध्ये भाव कमी असतानाही किरकोळ बाजारात जास्त भावात विक्री होत आहे.नागपुरात येताहेत जुने बटाटेउत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे नवीन पीक निघाले आहे. पण कोल्ड स्टोरेजमधील जुने बटाटे कळमन्यात विक्रीस येत आहे. भाव ६०० ते ८०० रुपये क्विंटल आहेत. तिन्ही राज्यातून कळमन्यात बटाटे आणण्यासाठी क्विंटलमागे २०० रुपये खर्च येतो. त्यामुळे बटाटे कळमन्यात आणणे शेतकऱ्यांना परवडत नाही. पण जास्त उत्पादनामुळे कळमन्यात आवक वाढली आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी