शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

चेन्नईकरांच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक

By admin | Updated: December 4, 2015 03:05 IST

तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नई व उत्तर तामिळनाडूमध्ये अक्षरश: आणीबाणी निर्माण झाली आहे.

सेवा भारतीचा पुढाकार : देशभरातून मदतीचे आवाहनयोगेश पांडे नागपूर तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नई व उत्तर तामिळनाडूमध्ये अक्षरश: आणीबाणी निर्माण झाली आहे. शासकीय पातळीवर येथे नागरिकांना मदत केली जात असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनीदेखील तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. सेवा भारती या संघ परिवारातील संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचे काम सुरू झाले असून देशभरातील अनेक स्वयंसेवक अन्न, औषधे व कपडे घेऊन चेन्नईकडे रवाना झाले आहेत. दोन दिवस झालेल्या अभूतपूर्व पावसाने चेन्नईतील जनजीवन कल्पनातीत पद्धतीने विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज, मोबाईल नेटवर्क, एटीएम, बँकसेवा बंद असून असून पिण्याचे पाणी व अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत तातडीने संघाचे स्वयंसेवक धावून गेले असल्याची माहिती संघ मुख्यालयातील सूत्रांनी दिली आहे. साचलेल्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्न, पाणी तसेच औषधांची पाकिटे पोहोचविली जात आहेत. शिवाय तामिळनाडूच्या निरनिराळ्या भागांत हजारांहून अधिक स्वयंसेवक निरनिराळे गट पाडून पडेल ती कामे करीत आहेत. स्वयंसेवकांनी घरातून पाणी बाजूला सारण्यापासून ते तात्पुरते निवारे उभारण्यापर्यंतची कामे प्रारंभ केली आहेत. शिवाय पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याची निगा राखण्याचे कार्यदेखील हाती घेतले आहे. देशभरातून स्वयंसेवकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पूरग्रस्त नागरिकांच्या खाण्यापिण्याची आणि निवासाची योग्य व्यवस्था होईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तेथे कार्य करीत राहणार आहेत, अशी माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.ग्रामीण भागांतदेखील पूरग्रस्तांना हातचेन्नईच्या जवळपासच्या ग्रामीण परिसरात प्रशासकीय कर्मचाऱ्यांसोबत संघाचे स्वयंसेवकदेखील मदत व पुनर्वसन कार्यात लागले आहेत. कांचीपुरम, तिरवल्लूर व कुड्डलूर जिल्ह्यांमध्येही पावसाने कहर केला आहे. गुरुवारी कुडुलूरमध्ये तीन हजार, मडिपक्कम येथे हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत अन्नाची पाकिटे पोहोचविण्यात आली. याशिवाय वेल्लोर जिल्ह्यातून ग्रामीण भागासाठी मदतीचे ट्रक रवाना झाले आहेत. चेन्नईत १५ हजारांहून अधिक नागरिकांना अन्न, पाणी व औषधांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.