शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

मोदी सरकारच्या ‘कॅम्पेनिंग’वर संघ असमाधानी

By admin | Updated: May 20, 2015 02:46 IST

भूसंपादन विधेयकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दर्शविला असला तरी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर संघ पूर्णपणे समाधानी नाही.

योगेश पांडे  नागपूरभूसंपादन विधेयकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दर्शविला असला तरी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर संघ पूर्णपणे समाधानी नाही. या विधेयकाचा ज्या पद्धतीने तळागाळात प्रचार व प्रसार करणे आवश्यक होते तो त्या पद्धतीने झाला नसल्याचे संघ पदाधिकाऱ्यांचे मत आहे. महत्त्वाचे म्हणजे या विधेयकातील मुद्दे व्यापक प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून गैरसमज दूर करण्याचा सल्ला संघाकडूनच अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान देण्यात आला होता. शिवाय या विधेयकाबाबत कुठलेही ‘कॅम्पेनिंग’ करण्यात येणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.भूसंपादन विधेयकावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील काही संस्था विरोधात असल्याचे जगजाहीर आहे. या विधेयकाला संघप्रणित संघटनांचादेखील विरोध होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली. सरकार्यवाह भय्याजी जोशी व सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी संशोधनानंतर हे विधेयक शेतकरीविरोधी नसल्याचे जाहीर विधानदेखील केले होते. शिवाय भारतीय मजदूर संघ व भारतीय किसान संघ यांसारख्या संघटनांनी रस्त्यावर उतरण्याअगोदर आमचा सल्ला घ्यावा असेदेखील संघाकडून स्पष्ट करण्यात आले.परंतु मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर संघ पूर्णपणे समाधानी नाही. मार्च महिन्यात नागपूरमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान या विधेयकातील मुद्दे शेतकरीविरोधी नाहीत हे जनतेपर्यंत नेण्यासाठी मोदी सरकारने ‘कॅम्पेन’ करावे, अशी सूचना संघाकडून देण्यात आली होती. नितीन गडकरी यांच्यासमवेत मोदी सरकारमधील काही मंत्र्यांनी पुढाकार घेऊन याबाबतीत देशभर दौरेदेखील केले. परंतु गडकरी व बोटावर मोजण्याइतके नेते वगळता प्रत्यक्ष तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन इतरांना प्रभावी संवाद साधता आला नाही. काही नेत्यांच्या सभांना तर शेतकरी कमी अन् कार्यकर्तेच जास्त अशी स्थिती होती. ज्या ‘सोशल मीडिया’चा निवडणूकांमध्ये प्रचार केला, त्याचादेखील या विधेयकाच्या ‘कॅम्पेनिंग’साठी हवा तसा उपयोग करण्यात आलेला नाही. दुसरीकडे कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांकडून मात्र केंद्र शासनावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. या विधेयकावरून केंद्र व पर्यायाने संघ परिवाराच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का बसतो आहे, असे संघाच्या काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे. (प्रतिनिधी)ही संघाची नव्हे सरकारची जबाबदारीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केंद्र शासनाच्या कुठल्याही कारभारात हस्तक्षेप करण्यात येत नाही. भूसंपादन विधेयकाबाबत संघ परिवारातील संस्थांची विविध मते आहेत. या विधेयकातील तरतुदी या शेतकऱ्यांसाठी आहेत व त्या त्यांच्या विरोधात कशा नाहीत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. यातील मुद्दे प्रभावी पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवेत. या विधेयकाबाबत जनमानसात संघाकडून कुठलेही ‘कॅम्पेनिंग’ करण्यात येणार नाही. जर कुठल्या संघटनेला यात सहभागी व्हायचे असेल तर त्यांचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत.-डॉ.मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचारप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ