शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या ‘कॅम्पेनिंग’वर संघ असमाधानी

By admin | Updated: May 20, 2015 02:46 IST

भूसंपादन विधेयकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दर्शविला असला तरी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर संघ पूर्णपणे समाधानी नाही.

योगेश पांडे  नागपूरभूसंपादन विधेयकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दर्शविला असला तरी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर संघ पूर्णपणे समाधानी नाही. या विधेयकाचा ज्या पद्धतीने तळागाळात प्रचार व प्रसार करणे आवश्यक होते तो त्या पद्धतीने झाला नसल्याचे संघ पदाधिकाऱ्यांचे मत आहे. महत्त्वाचे म्हणजे या विधेयकातील मुद्दे व्यापक प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून गैरसमज दूर करण्याचा सल्ला संघाकडूनच अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान देण्यात आला होता. शिवाय या विधेयकाबाबत कुठलेही ‘कॅम्पेनिंग’ करण्यात येणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.भूसंपादन विधेयकावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील काही संस्था विरोधात असल्याचे जगजाहीर आहे. या विधेयकाला संघप्रणित संघटनांचादेखील विरोध होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली. सरकार्यवाह भय्याजी जोशी व सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी संशोधनानंतर हे विधेयक शेतकरीविरोधी नसल्याचे जाहीर विधानदेखील केले होते. शिवाय भारतीय मजदूर संघ व भारतीय किसान संघ यांसारख्या संघटनांनी रस्त्यावर उतरण्याअगोदर आमचा सल्ला घ्यावा असेदेखील संघाकडून स्पष्ट करण्यात आले.परंतु मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर संघ पूर्णपणे समाधानी नाही. मार्च महिन्यात नागपूरमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान या विधेयकातील मुद्दे शेतकरीविरोधी नाहीत हे जनतेपर्यंत नेण्यासाठी मोदी सरकारने ‘कॅम्पेन’ करावे, अशी सूचना संघाकडून देण्यात आली होती. नितीन गडकरी यांच्यासमवेत मोदी सरकारमधील काही मंत्र्यांनी पुढाकार घेऊन याबाबतीत देशभर दौरेदेखील केले. परंतु गडकरी व बोटावर मोजण्याइतके नेते वगळता प्रत्यक्ष तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन इतरांना प्रभावी संवाद साधता आला नाही. काही नेत्यांच्या सभांना तर शेतकरी कमी अन् कार्यकर्तेच जास्त अशी स्थिती होती. ज्या ‘सोशल मीडिया’चा निवडणूकांमध्ये प्रचार केला, त्याचादेखील या विधेयकाच्या ‘कॅम्पेनिंग’साठी हवा तसा उपयोग करण्यात आलेला नाही. दुसरीकडे कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांकडून मात्र केंद्र शासनावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. या विधेयकावरून केंद्र व पर्यायाने संघ परिवाराच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का बसतो आहे, असे संघाच्या काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे. (प्रतिनिधी)ही संघाची नव्हे सरकारची जबाबदारीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केंद्र शासनाच्या कुठल्याही कारभारात हस्तक्षेप करण्यात येत नाही. भूसंपादन विधेयकाबाबत संघ परिवारातील संस्थांची विविध मते आहेत. या विधेयकातील तरतुदी या शेतकऱ्यांसाठी आहेत व त्या त्यांच्या विरोधात कशा नाहीत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. यातील मुद्दे प्रभावी पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवेत. या विधेयकाबाबत जनमानसात संघाकडून कुठलेही ‘कॅम्पेनिंग’ करण्यात येणार नाही. जर कुठल्या संघटनेला यात सहभागी व्हायचे असेल तर त्यांचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत.-डॉ.मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचारप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ