शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शिक्षक करताहेत शेतमजुरी, फुड डिलेव्हरी : सात वर्षांपासून वेतनवंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 19:22 IST

ज्ञानेश्वर निनावे हे बीए बीएड् आहेत. नंदनवन येथील महालक्ष्मी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून २०११ ला रुजू झाले. मात्र अजूनही त्यांना वेतन मिळालेले नाही. नरखेड येथील अमित राठोड हे एमए बीएड् आहे. गुरुमहाराज आदिवासी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शिक्षकांना पगारच नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी शाळा सुटल्यावर त्यांना ‘फुड डिलेव्हरी’चे, शेतीवर किंवा इतरही कामे करावी लागत आहेत. ज्ञानेश्वर किंवा अमित यांच्यासारखे शेकडो अपंग समावेशीत विशेष शिक्षकांच्या या अवस्थेला शासन दोषी ठरत आहे. २००९ पासून शासनाने या शिक्षकांना रुजू केले. मात्र वेतनच दिले नाही.

ठळक मुद्देअपंग समावेशित विशेष शिक्षकांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्ञानेश्वर निनावे हे बीए बीएड् आहेत. नंदनवन येथील महालक्ष्मी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून २०११ ला रुजू झाले. मात्र अजूनही त्यांना वेतन मिळालेले नाही. नरखेड येथील अमित राठोड हे एमए बीएड् आहे. गुरुमहाराज आदिवासी विद्यालयात ते विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या शिक्षकांना पगारच नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी शाळा सुटल्यावर त्यांना ‘फुड डिलेव्हरी’चे, शेतीवर किंवा इतरही कामे करावी लागत आहेत. ज्ञानेश्वर किंवा अमित यांच्यासारखे शेकडो अपंग समावेशीत विशेष शिक्षकांच्या या अवस्थेला शासन दोषी ठरत आहे. २००९ पासून शासनाने या शिक्षकांना रुजू केले. मात्र वेतनच दिले नाही.सामान्य शाळांंमध्ये शिक्षणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी शासनाने अपंग समावेशित शिक्षण योजनेत राज्यात १३५८ शिक्षकांची नियुक्ती केली. सामान्य शाळेतील अप्रगत मुलांना हे शिक्षक विशेष वर्ग घेऊन अध्यापनाचे कार्य करीत होते. या शिक्षकांना सामान्य माध्यमिक शिक्षकाच्या सर्व सेवा शर्ती आणि वेतन श्रेणी लागू आहे. २००९ ते २०१५ पर्यंत हे विशेष शिक्षक वेतन मिळत नसतानाही नियमित कार्यरत होते. पण २०१५ मध्ये शासनाने या शिक्षकांची सेवासमाप्त करण्याचे आदेश दिले. याविरुद्ध अपंग समावेशीत विशेष शिक्षक कृती समितीने औरंगाबाद खंडपीठात शासनाकडून झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागितली. न्यायालयाने शासनाचे सेवासमाप्तीचे आदेश रद्द करून, शिक्षकांची सेवा पुनर्स्थापित करण्याचे निर्देश दिले.न्यायालयाच्या निर्देशान्वये शासनाने २०१७ मध्ये विशेष शिक्षकांना पुन्हा स्थापित केले. पण त्यांचे समायोजन आणि वेतनासंदर्भात कुठलीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे गेल्या ४० दिवसांपासून हे विशेष शिक्षक संविधान चौकात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बसलेले आहेत. यादरम्यान त्यांच्या तीन भेटी मुख्यमंत्र्यांशी झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण आयुक्तांना समायोजनाचे आदेश दिले. शिक्षकांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास सांगितले. पण आयुक्ती मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून, विशेष शिक्षकांची तपासणी सुरू केली. पुन्हा या शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा आयुक्तांना आदेश दिले. पण शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे पाठ दाखवित असल्याचा आरोप शिक्षक कृती समितीने केला आहे.आजपर्यंत या शिक्षकांनी ५० वर आंदोलन केले आहे. दरम्यान ११ शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत.

 

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर