शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

शिक्षकदिन विशेष; लिंबाचे झाड ते अमेरिकेपर्यंतचा प्रवास जोशी सरांमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 11:26 IST

ती लिंबाखालची शाळा ते पुढे अमेरिकेपर्र्यंत झालेला शिक्षणाच्या प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून आशीर्वादाच्या रूपामध्ये जोशीसर सदैव सोबत राहिले, अशी भावना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव म्हणतात, गुरूमुळे मिळाली करिअरची दिशा देशसेवेइतकेच पवित्र शिक्षकांचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सांगली जिल्ह्यातील कडेपूर या छोट्याशा गावी माझे बालपण गेले. खोडकर असल्याने शिक्षणाबद्दल फार रुची नव्हती. पण या वयात जोशीसरांसारखे गुरुजी मिळाले. जोशीसरांची शाळा एका लिंबाच्या झाडाखाली भरत होती. मी शाळेत नियमित आलो पाहिजे, अभ्यास केला पाहिजे म्हणून जोशीसर दररोज संत्र्याच्या गोळ्या मला द्यायचे. कधी खांद्यावर उचलून शाळेत घेऊन यायचे. जोशीसरांनी लावलेली माया, माझ्याबद्दलची त्यांची आपुलकीमुळे मला शिक्षणाची जाणीव झाली. पुढे अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, मुंबई असा शिक्षणाचा प्रवास झाला. प्रत्येक वळणावरही चांगलेच शिक्षक मिळाले, पण शिक्षणाचा खरा गंध हा जोशीसरांमुळेच लाभला. ती लिंबाखालची शाळा ते पुढे अमेरिकेपर्र्यंत झालेला शिक्षणाच्या प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून आशीर्वादाच्या रूपामध्ये जोशीसर सदैव सोबत राहिले, अशी भावना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केली.पुढे यवतमाळच्या विवेकानंद हायस्कूलमध्ये फडणवीससरांचे सुद्धा संस्कार माझ्यावर झाले. त्यांनी मला शिस्त शिकविली. जशीजशी करिअरची दिशा गवसत गेली, तसतसे लाभलेले गुरू हे त्यांच्यापातळीवर उत्तमच होते. पण गुरूशिवाय आयुष्यात काहीच नाही. आयुष्याला महत्त्वाची दिशा देण्याचे कार्य हे केवळ गुरूमुळेच घडू शकते. गुरु ही अशी शक्ती आहे, जी प्रत्येक मुलांमध्ये असलेला कल लक्षात घेऊन त्याला त्याच्या प्रगतीच्या दिशेने मार्गस्त करते. आज पाच हजार शिक्षक माझ्यासोबत काम करतात. या शिक्षकांशी संवाद साधताना मी सदैव जोशीसरांचे उदाहरण देतो. कारण त्यांच्या शिक्षणाप्रती असलेल्या प्रामाणिकतेमुळे आज आम्ही घडलो.

शिक्षक हा सेवाव्रती असायला पाहिजेचांगले शिक्षक असणे ही काळाची गरज आहे. मूल्यवर्धनाचे खरे कार्य शिक्षकच करू शकतात. मला माझ्या आयुष्यात लाभलेले शिक्षक हे सेवा म्हणून कार्य करीत होते. मुळात शिक्षक हा सेवाव्रती आहे. तो देश आणि समाज घडविण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्याचे कार्य देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसारखेच पवित्र आहे. तन, मन, धन अर्पण करून शिक्षकांनी आपले कार्य केले पाहिजे. आज शिक्षकांपुढे अनेक अडचणी आहेत. पण शिक्षकांनी शिक्षणाचा घेतलेला वसा जोपासला पाहिजे.आज पाच हजारावर शिक्षक माझ्यासोबत काम करतात. काही शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे सेवा देत आहे. दुर्गम भागात ज्ञानाचा मळा फुलवित आहे. त्यांनी भावी पिढी घडविण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांच्या करिअरला दिशा देण्यासाठी कर्तव्यरत असायला हवे. आज भरपूर प्रमाणात सोयी सुविधा पोहचल्या आहे. पूर्वीसारखे अध्यापनाचे काम अवघड राहिलेले नाही. फक्त शिक्षकांनी आपले ध्येय बाळगून कर्तव्य केल्यास चांगले अधिकारी, पुढारी या समाजातून घडू शकतात. हीच खरी शिक्षकांच्या सेवेची पावती ठरेल, असे मला वाटते.

शिक्षकांमुळेच नागपूर जिल्हा ठरतोय पायोनियरग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ग्राफ थोडा घसरलेला होता. हा ग्राफ वाढविण्यासाठी आम्ही अध्ययन निश्चिती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. यात शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहिले. प्रथम आणि असर संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चिती केली. त्यावर पुढे विशेष मेहनत घेतली. वर्षभरात त्याचे परिणाम दिसायला लागले. यात विभागीय आयुक्तांनी विशेष पुढाकार घेतला. हा कार्यक्रम यावर्षी संपूर्ण विभागात राबविण्यात येत आहे. शिक्षकांमुळे हा कार्यक्रम जिल्ह्यासाठी पायोनियर ठरतो आहे.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन