शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

‘ऑफलाईन’ बदल्यांवर गुरुजी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:14 IST

ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे३१ जुलैपूर्वी बदल्या करण्याचे शासनाचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.विशेष म्हणजे यंदा १५ टक्के मर्यादा राखूनच बदल्या होणार आहे. नागपूर जिल्ह्यात जि.प.चे ४ हजार ६०० वर शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांच्या स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या बदल्या नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यामुळेच २०१८ पासून मंत्रायलस्तरावरुन ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यावर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे वित्त विभागाने बदल्यांना स्थगिती दिली होती. पण सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्याही बदल्या करण्याचा निर्णय घेतला. बदल्यांच्या धास्तीने शिक्षकांची धाकधूक वाढली होती. यात जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन व आंतरजिल्हा बदल्या या स्थानिक पातळीवरुनच ऑफलाईन होणार आहे.नागपूर जिप मध्ये २०१९ मध्ये झालेल्या बदल्यांचे आदेश प्रलंबित आहेत. २०१८ च्या बदल्यांमध्ये रँडम व विस्थापित झालेल्या शिक्षकांबाबत शासन निर्णयाची नागपूर जिप मध्ये अंमलबजावणी नाही. वित्त विभागाने यंदा बदल्यांना स्थगिती दिली होती. राज्यातील एकाही संघटनेने ऑनलाईन बदलीला विरोध केला नसताना ऑफलाईन बदल्यांची शिफारस कुणी केली, असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, मनसे शिक्षक व शिक्षकेतर सेनाशिक्षण क्षेत्र गोंधळात असताना बदल्या का?कोरोनामुळे अख्खे शिक्षण क्षेत्र गोंधळात आहे. शाळा सुरू होईल का नाही, याबाबत साशंकता आहे. गुरुजींच्या उपस्थितीबद्दल अजूनही प्रश्न सुटलेला नाही. हा संपूर्ण गोंधळ सुरू असताना, शासन गुरुजींच्या बदल्या करीत आहे. या बदल्यांच्या प्रक्रियेतही गोंधळ उडणार आहे. कारण ऑफलाईन बदल्यांसाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो तर ऑनलाईनच्या निकषानुसार बदल्या केल्यास गोंधळ उडणार आहे.परसराम गोंडाणे, मुख्य संघटन सचिव, कास्ट्राईब शिक्षक संघटना

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली