शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शिक्षकांच्या बदल्या : पती-पत्नीतील अंतर झाले २१२ किमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:47 IST

शिक्षकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन केल्या. बदल्यांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप झाला नसल्याने ह्या बदल्या पारदर्शक झाल्याचे शासन सांगते. परंतु या बदल्यामुळे अनेक शिक्षकांच्या तक्रारी वाढल्या आहे. पतीपत्नी एकत्रीकरणाच्या निकषात अनेक दाम्पत्यांचे विभक्तीकरण झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार शिक्षक बदली शाळेत रुजू झाले आहे. परंतु शिक्षकांची मानसिकता गोठावली आहे. खरचं या बदल्या पारदर्शक की अन्यायकारक असा सवाल आता शिक्षकांकडून होत आहे.

ठळक मुद्देबदल्या पारदर्शक की अन्यायकारक ? शिक्षकांचा सवालकुहीचा शिक्षक नरखेडमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन केल्या. बदल्यांमध्ये कुणाचाही हस्तक्षेप झाला नसल्याने ह्या बदल्या पारदर्शक झाल्याचे शासन सांगते. परंतु या बदल्यामुळे अनेक शिक्षकांच्या तक्रारी वाढल्या आहे. पतीपत्नी एकत्रीकरणाच्या निकषात अनेक दाम्पत्यांचे विभक्तीकरण झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार शिक्षक बदली शाळेत रुजू झाले आहे. परंतु शिक्षकांची मानसिकता गोठावली आहे. खरचं या बदल्या पारदर्शक की अन्यायकारक असा सवाल आता शिक्षकांकडून होत आहे.जि.प.चे शिक्षक शुद्धोधन सोनटक्के व त्यांची पत्नी वैशाली हे दोघेही शिक्षक आहे. बदलीपूर्वी वैशाली ह्या कळमेश्वर जि.प. शाळेत तर शुद्धोधन हे सावनेर येथील खिल्लोरी शाळेत कार्यरत होते. तेव्हा दोघांमधील अंतर हे १२ कि.मी. होते. आता यांची आॅनलाईन बदली आहे. शुद्धोधन यांना रामटेक तालुक्यातील खुर्सापार अवघड क्षेत्रात तर वैशाली यांची नरखेड तालुक्यातील गुमगाव येथे बदली केली आहे. या दोन्हीतील अंतर २१२ कि.मी. आहे. शाळा जर सकाळच्या वेळेत असेल तर पहाटे ५ वाजतापासून त्यांना निघावे लागले. गुमगाव मध्ये जाण्यायेण्याचे साधन नाही. जंगल परिसर आहे. पावसाळ्यात तर गुमगावला जावू शकत नाही अशी अवस्था असते. घरी मुलगा ७ वर्षाचा आहे आणि तोही आजारी असतो. वृद्ध वडील आहे. त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे हे पतीपत्नी या बदल्यांमुळे चांगलेच हतबल झाले आहे. अशीच काहीशी अवस्था चंद्रकांत मेश्राम व कविता मेश्राम, कश्यप सावरकर व शुभांगी सावरकर, संजय धाडसे व विजया धाडसे या शिक्षक दाम्पत्यांची बदलीनंतर झाली आहे. विस्थापित झालेल्या दाम्पत्यांचे असे शेकडो उदाहरण आहे. त्याचबरोबर एकल शिक्षकाच्या बदलीतही अन्याय झाल्याचे दिसते आहे. कुहीचा शिक्षक नरखेडला पाठविणे म्हणजे सर्कस करण्यासारखेच आहे.झालेल्या बदल्यातून शिथिलता मिळावी म्हणून शिक्षकांनी शिक्षणाधिकारी, सीईओं यांच्याकडे निवेदन सादर केले. परंतु कुणीही जबाबदारी स्विकारायला तयार नाही. ही परिस्थिती केवळ नागपूर जिल्ह्याची नाही, राज्यभरात बदल्यांवरून संताप व्यक्त होत आहे. यवतमाळमध्ये शिक्षकांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये सुद्धा संताप वाढतो आहे. बदल्यांमुळे शिक्षकांची शिकविण्याची मानसिकता राहिली नाही, असा सूर शिक्षकांमध्ये उमटतो आहे.मुलांना शिकवायचे कसे?ग्रामीण भागात वाहतुकीच्या सोयी अपुऱ्या आहे. पावसाळ्यात तर शाळेत जाणे कठीण होते. बहुतांश शिक्षक हे नागपूर शहरात वास्तव्यास आहे. त्यामुळे जाण्यायेण्यात त्यांचा वेळ खर्ची जाणार आहे. मुलांना शिकवायचे कसे असा सवाल शिक्षकांनी केला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली