शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

 किती वेळा फोडून घ्यावे नाक? दोन डोस झाल्यानंतरही आरटीपीसीआर कशाला? शिक्षकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 12:14 IST

Nagpur News लसीकरणाचे दोन डोस झाल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणीला काय अर्थ आणि कितीदा चाचणी करताना आम्ही नाक फोडून घ्यावे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागातील शाळा गुरुवारी सुरू झाल्या. पण प्रशासनाने शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. लसीकरणाचे दोन डोस झाल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणीला काय अर्थ आणि कितीदा चाचणी करताना आम्ही नाक फोडून घ्यावे, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने प्रशासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्या. पण, त्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक करण्यात आली. शिवाय शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेचे सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, जागोजागी सूचनांचे फलक शाळांना लावण्यास सांगितले. त्यातच पुन्हा शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली. शिक्षण विभागाने पंचायत समितीच्या माध्यमातून मुख्याध्यापकांना शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करायला लावली. त्यासंदर्भात शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की, ९९ टक्के शिक्षकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहे, तर पुन्हा आरटीपीसीआर कशासाठी?

      -पहिल्या दिवशी ९२ शाळाच होऊ शकल्या सुरू

जिल्ह्यात ८ ते १२ च्या ७५४ शाळा आहेत. परंतु, शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक आहेत. परंतु, जिल्ह्यातील ६९ शाळांनाच ग्रामपंचायतीने परवानगी दिली. मात्र, काही शाळांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करून परवानगीची वाट न बघता स्वत:हून शाळा सुरू केली. अनेक शाळांना ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही. त्यामुळे १५ जुलैला ९२ शाळा सुरू होऊ शकल्या; पण विद्यार्थ्यांची संख्या १८३० एवढीच नोंदविण्यात आली.

- गेल्या वर्षभरात शिक्षकांनी किमान पाच ते सहा वेळा आरटीपीसीआर टेस्ट केल्या आहेत. त्याचे अहवाल आम्ही वारंवार विभागाला पाठविले आहे. त्या उपरही सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे. तरीही पुन्हा आरटीपीसीआरचा तगादा का लावला जातोय. आम्ही शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. सॅनिटायझेशनपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवत आहे. जागोजागी सूचना लावल्या आहेत. इतक्या प्रशासकीय प्रेशरमध्ये काम करणे अवघड होतेय.

राजश्री उखरे, प्राचार्य

- प्रत्येक वेळी आरटीपीसीआर शिक्षकांना करायला लावतात. मग लसीकरणाचा अर्थ काय. खरं तर शाळा सुरू करणे म्हणजे कसरतच आहे. पालकांचे संमतीपत्र गोळा करणे, शाळा व्यवस्थापन समिती बैठक घेणे, ग्रामपंचायतीची परवानगी घेणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे, दररोज शाळा सुरू होताच फोन येतो, किती विद्यार्थी उपस्थित आहेत. वारंवार आढावे घेतले जातात. सूचना दिल्या जातात, माहिती मागितली जाते. हे सर्व करताना अध्यापन करणे अवघड जात आहे.

मिलिंद वानखेडे, मुख्याध्यापक

 शासनाचे निर्देश आहे

शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाचे जे परिपत्रक आले आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही करतो आहे. त्यात आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांनी ते करावी, ही अपेक्षा आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस