शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

निवडणूक आचारसंहीता असताना शिक्षक समायोजन; प्रक्रिया स्थगित करण्याची संघटनांची मागणी

By गणेश हुड | Updated: October 21, 2023 15:27 IST

१६ ऑक्टोबर पासून सबंधीत ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श निवडणूक आचारसंहीता लागू

नागपूर : कोणतीही निवडणूक आचारसंहिता लागू असताना कोणत्याही कर्मचा-यांच्या बदल्या करता येत नाही , परंतु जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असताना नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ३० ऑक्टोबरला शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही प्रक्रिया  निवडणूक आदर्श आचार असंहितेचा भंग करणारी असून सदर प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी शिक्षक व शिक्षक संघटनांकडून होवू लागली आहे.

राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच नागपूर जिल्ह्यात सुद्धा ५ नोव्हेंबर रोजी अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत, त्यामुळे १६ ऑक्टोबर पासून सबंधीत ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श निवडणूक आचारसंहीता लागू झाली आहे. ती ७ नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे .

कोणत्याही निवडणूकीची आचारसंहीता सुरू असताना कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना बदलता येत नाही. शिवाय ज्या शासन निर्णयाचा संदर्भ देत जि.प.च्या शिक्षण विभागाकडून समायोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्याच शासन निर्णयात समायोजनकरताना कोणत्याही प्रकारे निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. असे असताना जि.प. प्रशासनाकडून कुठल्या आधारावर शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

समायोजन प्रक्रीयेत शिक्षकांच्या पदस्थापना बदलणार असून ते शिक्षक  निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या ग्राम पंचायत क्षेत्रातील सुद्धा असू शकतात अथवा त्यांनी ज्या गावाची निवड केली त्या गावात सुद्धा निवडणूक आचारसंहिता लागू असू शकते असे झाल्यास ही बाब निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरू शकते, त्यामुळे शिक्षक समायोजन प्रक्रिया  स्थगित करावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. ३० सप्टेंबर २०२३ उलटल्यानंतरही व मागील सत्रात बदली प्रक्रिया पार पडल्या नंतरही३० सप्टेंबर २०२२ च्या संच मान्यतेवर कुठल्या आधारे शिक्षक समायोजन केल्या जात आहे याबाबत शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

१९ ऑक्टोबर रोजी समायोजन प्रक्रीयेबाबत जि प. स्तरावरून  निर्गमित करण्यात आलेल्या पत्रात तारखांचा घोळ असून समायोजनाबाबतच्या वेळापत्रकात २०२२ व  २०२१ च्या तारखा दर्शविण्यात आलेल्या आहे ही बाब प्राथमिक शिक्षण विभागाचा गलथानपणा  कारभार दर्शविणारी आहे.समायोजन प्रक्रिया स्थगित करावी

नागपूर जिल्ह्यात सध्या ग्राम पंचायत निवडणूक आचारसंहीता लागू असल्याने व समायोजन प्रक्रीयेबाबतच्या १२ मे २०११ च्या शासन निर्णयात तशी तरतुद असल्याने शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करण्थात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून करण्यात येत आहे.

- लीलाधर ठाकरे , जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,नागपूर

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतTeacherशिक्षकElectionनिवडणूकzpजिल्हा परिषद