शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

टाटांच्या धरणांनी महाराराष्ट्राला दुष्काळात लोटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 22:17 IST

टाटांनी १०० वर्षापूर्वी मुंबईची विजेची गरज लक्षात घेऊन पश्चिम घाटातील नद्यांचा प्रवाह रोखून जलविद्युत प्रकल्प सुरू केला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ही त्यांची दूरदृष्टी समजली जाऊ शकते. मात्र या धरणांनी मराठवाडा व आसपासच्या भागाला दुष्काळाच्या खाईत लोटले आहे. वर्तमान काळात पाण्याची गरज लक्षात घेता टाटांचा करार राज्य हितासाठी घातक आहे. मात्र टाटांच्या विरोधात जाऊन हा करार रद्द करण्याचे धाडस राज्यकर्त्यांमध्ये नाही, असे परखड मत टाटा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल कदमांचा दावा : राज्यकर्त्यात धाडस नसल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाटांनी १०० वर्षापूर्वी मुंबईची विजेची गरज लक्षात घेऊन पश्चिम घाटातील नद्यांचा प्रवाह रोखून जलविद्युत प्रकल्प सुरू केला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ही त्यांची दूरदृष्टी समजली जाऊ शकते. मात्र या धरणांनी मराठवाडा व आसपासच्या भागाला दुष्काळाच्या खाईत लोटले आहे. वर्तमान काळात पाण्याची गरज लक्षात घेता टाटांचा करार राज्य हितासाठी घातक आहे. मात्र टाटांच्या विरोधात जाऊन हा करार रद्द करण्याचे धाडस राज्यकर्त्यांमध्ये नाही, असे परखड मत टाटा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केले.वनराई फाऊंडेशनच्यावतीने ‘टाटांची धरणे, राज्याचा दुष्काळ व नागपूरचा निर्णय’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात या प्रकल्पामुळे झालेल्या परिणामांची वस्तुस्थिती मांडली. स्वातंत्र्यपूर्व काळात १९१९, १९२१ व १९३६ मध्ये टाटांनी ब्रिटिशांशी करार करून हायड्रोपॉवर प्रकल्प अमलात आणला. याअंतर्गत त्यांनी इंद्रायणीच्या उगमाचा प्रवाह रोखून ते पाणी स्वत:च्या प्रकल्पाकडे वळविले. त्यासाठी त्यांनी लोणावळा, वळवण, शिरवण, सोनवाडी, ठेकरवाडी व मुळशी येथे सहा धरणे बांधली. हा प्रकल्प उभारताना परिसरातील शेतकऱ्यांचेही विचार घेतले नाही. त्यावेळी प्रकल्पाला विरोधही झाला व गांधीजींनी टाटांना या प्रकल्पाविरोधात भावनिक आवाहन केले. असे असूनही स्वातंत्र्यानंतर प्रकल्पाचा करार रद्द होऊ शकला नाही.या जलविद्युत प्रकल्पामुळे ४४७ मेगावॅट वीजनिर्मिती करून मुंबईची गरज भागविली जात आहे. याअंतर्गत सर्व सोपस्कर पूर्ण झाले असून टाटा कंपनी ४.५० लाख ग्राहकांना ही वीज विकून प्रचंड लाभ घेत आहे. त्या काळात विजेची व पाण्याची इतकी आवश्यकता नसल्याने हा प्रक ल्प योग्य असेल, मात्र नद्यांचा प्रवाहच रोखल्याने मराठवाडा व आसपासच्या सहा जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. टाटांचा करार रद्द करून किंवा प्रकल्पाचे राष्ट्रीयीकरण  करून नैसर्गिक प्रवाह सुरू केल्यास महाराष्ट्रातील १४ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणता येते आणि दरवर्षी २० ते २५ हजार कोटींचे उत्पादन घेतले जाऊ शकते, असा दावा कदम यांनी केला. याशिवाय महाराष्ट्रातील १०५ उपसा प्रकल्पांचे दरवर्षीचे ३०० कोटींचे वीज बिल टाटांकडून वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली. टाटा कंपनी केवळ व्यवसाय करीत आहे. करारानुसार पाण्यासाठी दर युनिटसाठी पाच पैसे रॉयल्टी शासनाकडे भरणे आवश्यक होते.

टाटांच्या धरणांचे राष्ट्रीयीकरण  करा...मात्र गेल्या १०० वर्षात टाटांनी रॉयल्टीचा एक रुपयाही भरला नसल्याचा दावा कदम यांनी केला. या देशात टाटांचे योगदान मोठे असले तरी हा प्रक ल्प राज्य हिताचा नाही. आमचा टाटांना नाही तर शोषणाला विरोध आहे. टाटांचा प्रकल्प राज्याच्या व देशाच्या जलनीतीच्या विरोधात, इलेक्ट्रीसिटी अ‍ॅक्टच्या विरोधात आणि पर्यावरणाच्या विरोधात आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करून नद्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरू करावा व दुष्काळी भागाचा प्रश्न मिटवावा अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व आरएसएसचे मुख्यालय नागपूरला असल्याने याची अंमलबजावणी नागपुरातून व्हावी, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी अध्यक्ष स्थानावरून वनराईचे गिरीश गांधी यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी वनराईचे कार्याध्यक्ष समीर सराफ, नीलेश सराफ, निमिष लद्धड, अजय पाटील आदी उपस्थित होते. संचालन अजय पाटील व आभार नीलेश खांडेकर यांनी मानले. जलयुक्तने दुष्काळ मिटणार नाहीजलयुक्त शिवार योजना चांगली असली तरी कायमस्वरुपी दुष्काळ मिटविण्यासाठी लाभदायक नाही. पाऊस आला तर पाणी संग्रह होईल. पण एखाद्या वर्षी पाऊसच पडला नाही तर पाणी कसे संग्रहित होणार, असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Vanraiवनराईnagpurनागपूर