शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपूर ग्रामीण भागातील टँकर जीपीएसने कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:02 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत्यारीत कंट्रोलरुम तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबीडीओंच्या अखत्यारित कंट्रोल रुम : बोगस फेऱ्यांना बसणार चाप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत्यारीत कंट्रोलरुम तयार करण्यात आली आहे.त्यामुळे खासगी टँकरमालकांना पाण्याची चोरी अथवा अतिरिक्त फेऱ्या शासन दप्तरी दाखविता येणार नाही़ यामध्ये कामठी तालुक्यात ९, हिंगणा १२ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यामध्ये २८ टँकर गावकऱ्यांची तहान भागवित आहे़ या सर्व टँकरवर जीपीएस सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली़ प्रत्येक पंचायत समितीच्या बीडीओंकडे या टँकरच्या हालचालींची नोंद जीपीएस सिस्टीमच्या माध्यमातून उपलब्ध आहे़ विशेष कक्षही पंचायत समितीस्तरावर उभारण्यात आला़ पाण्याचे टँकर मागणीस्थळी पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती होती़ तशा आशयाच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त होत्या़ त्यावर गंभीर पाऊल म्हणून टँकरला जीपीएस सिस्टीमने जोडण्यात आले़ त्यामुळे आता बनावट फेऱ्या दाखवून बिले काढण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. जिल्ह्यात १४८ टँकरची मागणीहिंगणा, कामठी आणि नागपूर या अर्बन पेरियर गावांमध्ये टँकरच्या फेऱ्या सुरू आहे़ जिल्ह्यात १४८ टँकरची मागणी आहे़ परंतु आतापर्यंत ३५ गावांत ४८ टँकर धावताहेत़ हिंगणा तालुक्यातील सीताखैरी, नीलडोह, कवडस, डीगडोह, तांडा, डेगमा आदी भागात दीड महिन्यापासून टँकर सुरू आहे़ जलसंधारणाची कामे प्रामाणिकपणे न झाल्यास ही संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकnagpurनागपूर