शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राजीनाम्याबाबत २२ ला बोलणार : आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 21:27 IST

शेतकरी आणि विदर्भाच्या प्रश्नावरून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्याने टीका करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये राहणार की नाही, याबाबत ते २२ सप्टेंबरला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीही सरकारवर टीका करीत नागपूरला झालेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी आणि विदर्भाच्या प्रश्नावरून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्याने टीका करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये राहणार की नाही, याबाबत ते २२ सप्टेंबरला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीही सरकारवर टीका करीत नागपूरला झालेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.काटोल फेस्टिव्हलबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. गेल्या १५ ते २० दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कापूस, धान व संत्रा पिकांचे नुकसान झाले असून वातावरणातील बदलामुळे या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून अनेकांनी पिकांवर ट्रॅक्टर फिरविले आहे. अशी बिकट स्थिती असतानाही अद्यापपर्यंत कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतला नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली नाही. पावसाअभावी विविध भागातील धरणात पाणी नाही. पेंचसह बहुतेक जलाशय कोरडे पडले असून सिंचनाचेच नाही तर पिण्याच्या पाण्याचेही संकट ओढवणार आहे. जलसंकटाच्या नियोजनासाठी सरकारकडून कुठलीही पावले उचलली गेली नसल्याची टीका त्यांनी केली. एकतर राज्यात पूर्णवेळ कृषिमंत्री नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडे घेऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.येत्या २२ ला काटोलमध्ये विदर्भ युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या अराजकीय मंचचे शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह आम आदमी पक्षाचे संजय सिंग व प्रीती मेनन हे नेतेही या संसदेत सहभागी होणार आहेत. याबाबत विचारले असताख, या संसदेतच राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार, असे त्यांनी जाहीर केले.

 

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखMLAआमदार