शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

राजीनाम्याबाबत २२ ला बोलणार : आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 21:27 IST

शेतकरी आणि विदर्भाच्या प्रश्नावरून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्याने टीका करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये राहणार की नाही, याबाबत ते २२ सप्टेंबरला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीही सरकारवर टीका करीत नागपूरला झालेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी आणि विदर्भाच्या प्रश्नावरून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्याने टीका करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये राहणार की नाही, याबाबत ते २२ सप्टेंबरला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीही सरकारवर टीका करीत नागपूरला झालेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.काटोल फेस्टिव्हलबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. गेल्या १५ ते २० दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कापूस, धान व संत्रा पिकांचे नुकसान झाले असून वातावरणातील बदलामुळे या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून अनेकांनी पिकांवर ट्रॅक्टर फिरविले आहे. अशी बिकट स्थिती असतानाही अद्यापपर्यंत कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतला नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली नाही. पावसाअभावी विविध भागातील धरणात पाणी नाही. पेंचसह बहुतेक जलाशय कोरडे पडले असून सिंचनाचेच नाही तर पिण्याच्या पाण्याचेही संकट ओढवणार आहे. जलसंकटाच्या नियोजनासाठी सरकारकडून कुठलीही पावले उचलली गेली नसल्याची टीका त्यांनी केली. एकतर राज्यात पूर्णवेळ कृषिमंत्री नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडे घेऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.येत्या २२ ला काटोलमध्ये विदर्भ युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या अराजकीय मंचचे शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह आम आदमी पक्षाचे संजय सिंग व प्रीती मेनन हे नेतेही या संसदेत सहभागी होणार आहेत. याबाबत विचारले असताख, या संसदेतच राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार, असे त्यांनी जाहीर केले.

 

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखMLAआमदार