शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मंत्र्यांच्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:24 IST

भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे आव्हान : फडणवीस सरकारची कजमार्फ फसवी असल्याची टीका

आॅनलाईन लोकमतनागपूर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. बोंडअळीमुळे व ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी. यासाठी विरोधकांनी केलेल्या हल्लाबोल आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी डल्लामार आंदोलन अशी टीका केली. पण भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडताना केली.भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण गेल्या तीन वर्षात राज्यात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सातबारा कोरा झाला नाही. सातबारावरून शेतकऱ्यांनाच बाद केले. शेतकरी संपावर केले, संघर्ष यात्रा काढल्यानंतर सरकारला जाग आली. अखेर कर्जमाफीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. पण फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.कर्जमाफीच्या आकड्यात हेराफेरी आहे. ज्यांच्याकडे शेती अशा प्रज्ज्वल जाधव या विद्यार्थ्यांला त्याच्या खात्यात १० हजाराची रक्कम जमा झाल्याचा बँकेने मेसेस पाठविला आहे. काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथील सुरेश राठोड यांच्या बँक खात्यात जमा केलेल्या कापूस चुकाऱ्याच्या रकमेतून कर्जाची वसुली केली. कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली असती तर कर्ज वसुली करावी लागली नसती. तज्ज्ञांनी आधीच बोंडअळीचा इशारा दिला होता. याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वेळीच दखल घेतली असती तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती. बीटी कॉटन कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बोंडअळीचे संकट भाजप-शिवसेना युतीनेच आणले. शेतपीक विमा योजनेचा शेतकºयांना लाभ होत नाही. विमा कंपन्यांनाच याचा लाभ होत असल्याची टीका मुंडे यांनी केली.सामनातून सरकारच्या कर्जमाफीवर टीका करायची व कर्जमाफीचा विषय आला की, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना ठगवायचं, याची जाणीव आता शेतकऱ्यांना झाली आहे. वादळग्रस्त शेतकरी तसेच बोंंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार, धान उत्पादकांना १० हजारांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.१० लाख शेतकऱ्यांची खाती बोगस कशीडिजिटल जाहिरातीवर ३००७ कोटी खर्च करण्यात आले. इनोव्हेव कंपनीचे आर्थिक संबंध जपण्यासाठी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आली. ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांकडे आधारकार्ड नाही. त्यांना कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यातही घोळ आहे. कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊ न कर्जमाफीचा अर्ज भरताना शेतकऱ्यांना त्यांची जात विचारली जात आहे. आॅनलाईन अर्ज केलेल्या १० लाख शेतकऱ्यांची खाती बोगस कशी झाली, असा सवाल करून मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले.

 

 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर