शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मंत्र्यांच्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:24 IST

भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे आव्हान : फडणवीस सरकारची कजमार्फ फसवी असल्याची टीका

आॅनलाईन लोकमतनागपूर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. बोंडअळीमुळे व ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी. यासाठी विरोधकांनी केलेल्या हल्लाबोल आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी डल्लामार आंदोलन अशी टीका केली. पण भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडताना केली.भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण गेल्या तीन वर्षात राज्यात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सातबारा कोरा झाला नाही. सातबारावरून शेतकऱ्यांनाच बाद केले. शेतकरी संपावर केले, संघर्ष यात्रा काढल्यानंतर सरकारला जाग आली. अखेर कर्जमाफीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. पण फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.कर्जमाफीच्या आकड्यात हेराफेरी आहे. ज्यांच्याकडे शेती अशा प्रज्ज्वल जाधव या विद्यार्थ्यांला त्याच्या खात्यात १० हजाराची रक्कम जमा झाल्याचा बँकेने मेसेस पाठविला आहे. काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथील सुरेश राठोड यांच्या बँक खात्यात जमा केलेल्या कापूस चुकाऱ्याच्या रकमेतून कर्जाची वसुली केली. कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली असती तर कर्ज वसुली करावी लागली नसती. तज्ज्ञांनी आधीच बोंडअळीचा इशारा दिला होता. याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वेळीच दखल घेतली असती तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती. बीटी कॉटन कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बोंडअळीचे संकट भाजप-शिवसेना युतीनेच आणले. शेतपीक विमा योजनेचा शेतकºयांना लाभ होत नाही. विमा कंपन्यांनाच याचा लाभ होत असल्याची टीका मुंडे यांनी केली.सामनातून सरकारच्या कर्जमाफीवर टीका करायची व कर्जमाफीचा विषय आला की, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना ठगवायचं, याची जाणीव आता शेतकऱ्यांना झाली आहे. वादळग्रस्त शेतकरी तसेच बोंंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार, धान उत्पादकांना १० हजारांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.१० लाख शेतकऱ्यांची खाती बोगस कशीडिजिटल जाहिरातीवर ३००७ कोटी खर्च करण्यात आले. इनोव्हेव कंपनीचे आर्थिक संबंध जपण्यासाठी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आली. ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांकडे आधारकार्ड नाही. त्यांना कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यातही घोळ आहे. कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊ न कर्जमाफीचा अर्ज भरताना शेतकऱ्यांना त्यांची जात विचारली जात आहे. आॅनलाईन अर्ज केलेल्या १० लाख शेतकऱ्यांची खाती बोगस कशी झाली, असा सवाल करून मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले.

 

 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर