शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

मंत्र्यांच्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:24 IST

भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे आव्हान : फडणवीस सरकारची कजमार्फ फसवी असल्याची टीका

आॅनलाईन लोकमतनागपूर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. बोंडअळीमुळे व ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी. यासाठी विरोधकांनी केलेल्या हल्लाबोल आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी डल्लामार आंदोलन अशी टीका केली. पण भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अ‍ॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडताना केली.भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण गेल्या तीन वर्षात राज्यात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सातबारा कोरा झाला नाही. सातबारावरून शेतकऱ्यांनाच बाद केले. शेतकरी संपावर केले, संघर्ष यात्रा काढल्यानंतर सरकारला जाग आली. अखेर कर्जमाफीचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. पण फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.कर्जमाफीच्या आकड्यात हेराफेरी आहे. ज्यांच्याकडे शेती अशा प्रज्ज्वल जाधव या विद्यार्थ्यांला त्याच्या खात्यात १० हजाराची रक्कम जमा झाल्याचा बँकेने मेसेस पाठविला आहे. काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथील सुरेश राठोड यांच्या बँक खात्यात जमा केलेल्या कापूस चुकाऱ्याच्या रकमेतून कर्जाची वसुली केली. कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली असती तर कर्ज वसुली करावी लागली नसती. तज्ज्ञांनी आधीच बोंडअळीचा इशारा दिला होता. याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वेळीच दखल घेतली असती तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती. बीटी कॉटन कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे बोंडअळीचे संकट भाजप-शिवसेना युतीनेच आणले. शेतपीक विमा योजनेचा शेतकºयांना लाभ होत नाही. विमा कंपन्यांनाच याचा लाभ होत असल्याची टीका मुंडे यांनी केली.सामनातून सरकारच्या कर्जमाफीवर टीका करायची व कर्जमाफीचा विषय आला की, उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना ठगवायचं, याची जाणीव आता शेतकऱ्यांना झाली आहे. वादळग्रस्त शेतकरी तसेच बोंंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार, धान उत्पादकांना १० हजारांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.१० लाख शेतकऱ्यांची खाती बोगस कशीडिजिटल जाहिरातीवर ३००७ कोटी खर्च करण्यात आले. इनोव्हेव कंपनीचे आर्थिक संबंध जपण्यासाठी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आली. ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांकडे आधारकार्ड नाही. त्यांना कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यातही घोळ आहे. कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊ न कर्जमाफीचा अर्ज भरताना शेतकऱ्यांना त्यांची जात विचारली जात आहे. आॅनलाईन अर्ज केलेल्या १० लाख शेतकऱ्यांची खाती बोगस कशी झाली, असा सवाल करून मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले.

 

 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर