शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

वर्षभरात घ्या फक्त चारच ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 21:37 IST

राज्याच्या ग्रामविकास विभागाने वारंवार होणाऱ्या ग्रामसभांना चाप लावत २६ जानेवारीव्यतिरिक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षातून केवळ चार ग्रामसभा होणार आहेत. तसा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देग्रामविकास विभागाची नवी नियमावली : जिल्हा परिषदेला अध्यादेश प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने वारंवार होणाऱ्या ग्रामसभांना चाप लावत २६ जानेवारीव्यतिरिक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षातून केवळ चार ग्रामसभा होणार आहेत. तसा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे.ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार वर्षातून चारवेळा ग्रामसभा घेणे अपेक्षित आहे. मात्र राज्य शासनाच्या इतर प्रशासकीय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून विशेष ग्रामसभा घेण्याबाबतचे निर्देश आयत्या वेळी किंवा अल्प कालावधीत जिल्हा परिषदांना देण्यात येतात. त्यामुळे अशा अचानक होणाऱ्या ग्रामसभांमुळे वर्षभरातील ग्रामसभांची सरासरी संख्या वाढत जाते. सतत ग्रामसभा घेतल्याने ग्रामस्थांचा त्यांना अल्प प्रतिसाद मिळतो व त्यांच्या आयोजनाचा हेतूही साध्य होत नाही. तसेच ग्रामसभेतील विषयावर सुयोग्य चर्चा न होता काही विपरीत घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, आता ग्रामविकास विभागाने नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वित्तीय वर्षातील चारपैकी पहिली ग्रामसभा ही वित्तीय वर्षातील पहिल्या दोन महिन्यातच झाली पाहिजे आणि दुसरी सभा दरवर्षी नोव्हेंबरमध्येच घ्यावी लागेल. याशिवाय आॅगस्टमध्ये एक आणि २६ जानेवारी रोजी दुसरी अशा ग्रामसभा घ्याव्यात. शासनाच्या ज्या विभागांना ग्रामसभेत योजनांची माहिती द्यावयाची आहे, त्या दिवशी त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आगाऊ सूचना कळवावी लागणार आहे. या चारव्यतिरिक्त एखादी ग्रामसभा कोणत्याही शासकीय विभागास आयोजित करण्याची असेल तर, त्यासाठी ग्रामविकास विभागाकडे तसा प्रस्ताव द्यावा लागणार आहे. दरम्यान, ग्रामसभा या राष्ट्रीय सणाच्या दिवशी घेण्यात येत होत्या. या ग्रामसभेत गावातील गट-तट एकमेकांची उणी-दुणी काढत होती. त्यामुळे या ग्रामसभा प्रत्येक वेळी वादळी होत होत्या. काही वेळा तर ग्रामसभेमध्ये मारामारी व वादावादीचे प्रकार घडत असल्याने, काही ठिकाणी तर पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा घ्याव्या लागत होत्या. त्यामुळे या ग्रामसभा म्हणजे गावच्या राजकीय आखाडाच बनल्या होत्या. परंतु याचा ग्रामसेवकांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याने, या सभा राष्ट्रीय सणाच्या दिवशी न घेण्याची मागणी राज्य ग्रामसेवक युनियनने राज्य शासनाकडे केली होती, ती मागणी शासनाने मान्य केली.प्रबोधनासाठी ग्रामविकासची परवानगीग्रामविकास विभागाने काढलेल्या जीआरमध्ये २६ जानेवारी वगळता इतर राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या तारखेला नियमित ग्रामसभा आयोजित करण्यात येणार नाही. मात्र अशा तारखेला ध्वजवंदन, सांस्कृतिक कार्यक्रम, राज्य शासनाचे काही संदेश किंवा प्रबोधन द्यायचे असल्यास, अशा संदेशाचे वाचन व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र असे संदेश ग्रामसभेमार्फत द्यायचे असल्यास संबंधित इतर प्रशासकीय विभागांनी ते ग्रामविकास विभागाकडे पाठवायचे आहेत. त्यानंतर ग्रामविकास विभागाकडून तशा सूचना जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहेत.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर