शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिं क ले ! सर्वत्र शांतता एकोप्याचे दर्शन

By admin | Updated: July 31, 2015 02:34 IST

१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता.

राहुल अवसरे नागपूर१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता. जखमी होऊन शेकडो माणसांच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले होते. या क्रूर घटनेचा सूत्रधार मानवतेचा संहारक याकूब मेमनला तब्बल २२ वर्षांनंतर गुरुवारी भल्या सकाळी देशाच्या ‘झिरो माईल्स’ शहरात नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर देण्यात आले. जे मारल्या गेले त्यात साऱ्याच समुदायाचे लोक होते. निष्पाप, निष्कलंक होते. त्यामुळे याकूब मानवतेचा अपराधी होता. न्यायसंस्थेनेच त्याला अपराधी ठरवले होते. नागपूर मिश्र समुदायांचे शहर आहे. शांती आणि सौख्य येथे नांदत असते. जातीय वैमनस्याला येथे थारा नाहीच. कधी काळी अशा वैमनस्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत. पण त्याला फारशी हवा मिळाली नाही. नामांतर, बाबरी, रमाबाई आंबेडकरनगर, खैरलांजीवरून हिंसक घटना घडल्या पण अधिक काळ तगल्या नाहीत. येथील नागरिकांनी १९६५ चे धगधगते नागपूर पाहिले आहे. दूरदर्शनवर अलिकडे अन्य राज्यांमध्ये घडलेल्या दंगलीही पाहिल्या आहेत. त्यामुळे नको हा हिंसाचार म्हणत साध्या पुतळा विटंबनेची घटना घडूनही या शहराने शांती स्वीकारली आहे. तरीही याकूबच्या फाशीनंतर येथे काही तरी मोठे घडेल असे वाटले होते. तीन-चार दिवसांपूर्वीपासून येथील जनजीवन विलक्षण तणावात वावरत असल्याचा अभास निर्माण झाला होता. गुप्तचर यंत्रणांनी तशा शंकाही व्यक्त केल्या होत्या. शांतता बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा सूचना पोलीस मोबाईल आणि टी.व्ही.च्या माध्यमातून प्रसिद्ध करीत होते. मित्रमंडळ व्हॉटस्अपवरून एकदुसऱ्यांना सूचना देत होते. जागोजागी नाकेबंदी, झडत्या सुरू करण्यात आल्या होत्या. क्विक रिस्पॉन्स कमांडो पथके सतत फिरत होती. त्यामुळे सामान्य जनजीवनावरचा ताण आणखी वाढत होता. प्रत्यक्षात जनमानसावरील भयाचे वातावरण नाहीसे करण्यासाठी पोलिसांची ही साथ होती. अभूतपूर्व बंदोबस्त होता. शहरभर फिरणारे कमांडोज आणि नाकेबंदी करणारे पोलीस जवान शांततेसाठीच झटत होते. फाशीची घटका आली. काही वेळाने फाशीही देण्यात आली. पण नागपूरकरांनी संयम दाखवला. संयम दाखवल्यानेच भयाचे वातावरणही संपुष्टात आले. कोणतीही गैर प्रतिक्रया उमटली नाही. मुलांनी आपापल्या शाळांची वाट धरली. दुकानदारांनी दुकाने सुरू केली. बाजारांमधील गर्दी आणि बसगाड्या कालच्याच गतीने धावल्या, प्रार्थनास्थळांवरील वातावरण नेहमीप्रमाणे होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ईदच्या वेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना दिलेली आलिंगने, तेवढीच मजबूत व घट्ट होती. आम्ही समाजविघातक शक्तींच्या कुठल्याही अपप्रचाराला, चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडत नाही, भीक घालत नाही. सर्वधर्मीयांमधील एकोप्याचे नाते अबाधित आहे, हे नागपूरकरांनी दाखवून दिले, म्हणूनच नागपूर आज जिंकले.