शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

नागपूर जिं क ले ! सर्वत्र शांतता एकोप्याचे दर्शन

By admin | Updated: July 31, 2015 02:34 IST

१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता.

राहुल अवसरे नागपूर१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता. जखमी होऊन शेकडो माणसांच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले होते. या क्रूर घटनेचा सूत्रधार मानवतेचा संहारक याकूब मेमनला तब्बल २२ वर्षांनंतर गुरुवारी भल्या सकाळी देशाच्या ‘झिरो माईल्स’ शहरात नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर देण्यात आले. जे मारल्या गेले त्यात साऱ्याच समुदायाचे लोक होते. निष्पाप, निष्कलंक होते. त्यामुळे याकूब मानवतेचा अपराधी होता. न्यायसंस्थेनेच त्याला अपराधी ठरवले होते. नागपूर मिश्र समुदायांचे शहर आहे. शांती आणि सौख्य येथे नांदत असते. जातीय वैमनस्याला येथे थारा नाहीच. कधी काळी अशा वैमनस्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत. पण त्याला फारशी हवा मिळाली नाही. नामांतर, बाबरी, रमाबाई आंबेडकरनगर, खैरलांजीवरून हिंसक घटना घडल्या पण अधिक काळ तगल्या नाहीत. येथील नागरिकांनी १९६५ चे धगधगते नागपूर पाहिले आहे. दूरदर्शनवर अलिकडे अन्य राज्यांमध्ये घडलेल्या दंगलीही पाहिल्या आहेत. त्यामुळे नको हा हिंसाचार म्हणत साध्या पुतळा विटंबनेची घटना घडूनही या शहराने शांती स्वीकारली आहे. तरीही याकूबच्या फाशीनंतर येथे काही तरी मोठे घडेल असे वाटले होते. तीन-चार दिवसांपूर्वीपासून येथील जनजीवन विलक्षण तणावात वावरत असल्याचा अभास निर्माण झाला होता. गुप्तचर यंत्रणांनी तशा शंकाही व्यक्त केल्या होत्या. शांतता बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा सूचना पोलीस मोबाईल आणि टी.व्ही.च्या माध्यमातून प्रसिद्ध करीत होते. मित्रमंडळ व्हॉटस्अपवरून एकदुसऱ्यांना सूचना देत होते. जागोजागी नाकेबंदी, झडत्या सुरू करण्यात आल्या होत्या. क्विक रिस्पॉन्स कमांडो पथके सतत फिरत होती. त्यामुळे सामान्य जनजीवनावरचा ताण आणखी वाढत होता. प्रत्यक्षात जनमानसावरील भयाचे वातावरण नाहीसे करण्यासाठी पोलिसांची ही साथ होती. अभूतपूर्व बंदोबस्त होता. शहरभर फिरणारे कमांडोज आणि नाकेबंदी करणारे पोलीस जवान शांततेसाठीच झटत होते. फाशीची घटका आली. काही वेळाने फाशीही देण्यात आली. पण नागपूरकरांनी संयम दाखवला. संयम दाखवल्यानेच भयाचे वातावरणही संपुष्टात आले. कोणतीही गैर प्रतिक्रया उमटली नाही. मुलांनी आपापल्या शाळांची वाट धरली. दुकानदारांनी दुकाने सुरू केली. बाजारांमधील गर्दी आणि बसगाड्या कालच्याच गतीने धावल्या, प्रार्थनास्थळांवरील वातावरण नेहमीप्रमाणे होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ईदच्या वेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना दिलेली आलिंगने, तेवढीच मजबूत व घट्ट होती. आम्ही समाजविघातक शक्तींच्या कुठल्याही अपप्रचाराला, चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडत नाही, भीक घालत नाही. सर्वधर्मीयांमधील एकोप्याचे नाते अबाधित आहे, हे नागपूरकरांनी दाखवून दिले, म्हणूनच नागपूर आज जिंकले.