शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिं क ले ! सर्वत्र शांतता एकोप्याचे दर्शन

By admin | Updated: July 31, 2015 02:34 IST

१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता.

राहुल अवसरे नागपूर१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता. जखमी होऊन शेकडो माणसांच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले होते. या क्रूर घटनेचा सूत्रधार मानवतेचा संहारक याकूब मेमनला तब्बल २२ वर्षांनंतर गुरुवारी भल्या सकाळी देशाच्या ‘झिरो माईल्स’ शहरात नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर देण्यात आले. जे मारल्या गेले त्यात साऱ्याच समुदायाचे लोक होते. निष्पाप, निष्कलंक होते. त्यामुळे याकूब मानवतेचा अपराधी होता. न्यायसंस्थेनेच त्याला अपराधी ठरवले होते. नागपूर मिश्र समुदायांचे शहर आहे. शांती आणि सौख्य येथे नांदत असते. जातीय वैमनस्याला येथे थारा नाहीच. कधी काळी अशा वैमनस्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत. पण त्याला फारशी हवा मिळाली नाही. नामांतर, बाबरी, रमाबाई आंबेडकरनगर, खैरलांजीवरून हिंसक घटना घडल्या पण अधिक काळ तगल्या नाहीत. येथील नागरिकांनी १९६५ चे धगधगते नागपूर पाहिले आहे. दूरदर्शनवर अलिकडे अन्य राज्यांमध्ये घडलेल्या दंगलीही पाहिल्या आहेत. त्यामुळे नको हा हिंसाचार म्हणत साध्या पुतळा विटंबनेची घटना घडूनही या शहराने शांती स्वीकारली आहे. तरीही याकूबच्या फाशीनंतर येथे काही तरी मोठे घडेल असे वाटले होते. तीन-चार दिवसांपूर्वीपासून येथील जनजीवन विलक्षण तणावात वावरत असल्याचा अभास निर्माण झाला होता. गुप्तचर यंत्रणांनी तशा शंकाही व्यक्त केल्या होत्या. शांतता बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा सूचना पोलीस मोबाईल आणि टी.व्ही.च्या माध्यमातून प्रसिद्ध करीत होते. मित्रमंडळ व्हॉटस्अपवरून एकदुसऱ्यांना सूचना देत होते. जागोजागी नाकेबंदी, झडत्या सुरू करण्यात आल्या होत्या. क्विक रिस्पॉन्स कमांडो पथके सतत फिरत होती. त्यामुळे सामान्य जनजीवनावरचा ताण आणखी वाढत होता. प्रत्यक्षात जनमानसावरील भयाचे वातावरण नाहीसे करण्यासाठी पोलिसांची ही साथ होती. अभूतपूर्व बंदोबस्त होता. शहरभर फिरणारे कमांडोज आणि नाकेबंदी करणारे पोलीस जवान शांततेसाठीच झटत होते. फाशीची घटका आली. काही वेळाने फाशीही देण्यात आली. पण नागपूरकरांनी संयम दाखवला. संयम दाखवल्यानेच भयाचे वातावरणही संपुष्टात आले. कोणतीही गैर प्रतिक्रया उमटली नाही. मुलांनी आपापल्या शाळांची वाट धरली. दुकानदारांनी दुकाने सुरू केली. बाजारांमधील गर्दी आणि बसगाड्या कालच्याच गतीने धावल्या, प्रार्थनास्थळांवरील वातावरण नेहमीप्रमाणे होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ईदच्या वेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना दिलेली आलिंगने, तेवढीच मजबूत व घट्ट होती. आम्ही समाजविघातक शक्तींच्या कुठल्याही अपप्रचाराला, चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडत नाही, भीक घालत नाही. सर्वधर्मीयांमधील एकोप्याचे नाते अबाधित आहे, हे नागपूरकरांनी दाखवून दिले, म्हणूनच नागपूर आज जिंकले.