शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
5
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
6
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
7
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
8
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
9
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
10
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
11
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
12
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
13
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
14
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
15
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
16
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
17
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
18
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
19
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
20
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

नागपूर जिं क ले ! सर्वत्र शांतता एकोप्याचे दर्शन

By admin | Updated: July 31, 2015 02:34 IST

१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता.

राहुल अवसरे नागपूर१९९३ च्या मुंबई येथील विध्वंसक बॉम्बस्फोट मालिकांनी मृत्यू थरारला होता. २५७ जीवांचा तडफडून मृत्यू झाला होता. जखमी होऊन शेकडो माणसांच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले होते. या क्रूर घटनेचा सूत्रधार मानवतेचा संहारक याकूब मेमनला तब्बल २२ वर्षांनंतर गुरुवारी भल्या सकाळी देशाच्या ‘झिरो माईल्स’ शहरात नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर देण्यात आले. जे मारल्या गेले त्यात साऱ्याच समुदायाचे लोक होते. निष्पाप, निष्कलंक होते. त्यामुळे याकूब मानवतेचा अपराधी होता. न्यायसंस्थेनेच त्याला अपराधी ठरवले होते. नागपूर मिश्र समुदायांचे शहर आहे. शांती आणि सौख्य येथे नांदत असते. जातीय वैमनस्याला येथे थारा नाहीच. कधी काळी अशा वैमनस्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत. पण त्याला फारशी हवा मिळाली नाही. नामांतर, बाबरी, रमाबाई आंबेडकरनगर, खैरलांजीवरून हिंसक घटना घडल्या पण अधिक काळ तगल्या नाहीत. येथील नागरिकांनी १९६५ चे धगधगते नागपूर पाहिले आहे. दूरदर्शनवर अलिकडे अन्य राज्यांमध्ये घडलेल्या दंगलीही पाहिल्या आहेत. त्यामुळे नको हा हिंसाचार म्हणत साध्या पुतळा विटंबनेची घटना घडूनही या शहराने शांती स्वीकारली आहे. तरीही याकूबच्या फाशीनंतर येथे काही तरी मोठे घडेल असे वाटले होते. तीन-चार दिवसांपूर्वीपासून येथील जनजीवन विलक्षण तणावात वावरत असल्याचा अभास निर्माण झाला होता. गुप्तचर यंत्रणांनी तशा शंकाही व्यक्त केल्या होत्या. शांतता बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा सूचना पोलीस मोबाईल आणि टी.व्ही.च्या माध्यमातून प्रसिद्ध करीत होते. मित्रमंडळ व्हॉटस्अपवरून एकदुसऱ्यांना सूचना देत होते. जागोजागी नाकेबंदी, झडत्या सुरू करण्यात आल्या होत्या. क्विक रिस्पॉन्स कमांडो पथके सतत फिरत होती. त्यामुळे सामान्य जनजीवनावरचा ताण आणखी वाढत होता. प्रत्यक्षात जनमानसावरील भयाचे वातावरण नाहीसे करण्यासाठी पोलिसांची ही साथ होती. अभूतपूर्व बंदोबस्त होता. शहरभर फिरणारे कमांडोज आणि नाकेबंदी करणारे पोलीस जवान शांततेसाठीच झटत होते. फाशीची घटका आली. काही वेळाने फाशीही देण्यात आली. पण नागपूरकरांनी संयम दाखवला. संयम दाखवल्यानेच भयाचे वातावरणही संपुष्टात आले. कोणतीही गैर प्रतिक्रया उमटली नाही. मुलांनी आपापल्या शाळांची वाट धरली. दुकानदारांनी दुकाने सुरू केली. बाजारांमधील गर्दी आणि बसगाड्या कालच्याच गतीने धावल्या, प्रार्थनास्थळांवरील वातावरण नेहमीप्रमाणे होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ईदच्या वेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना दिलेली आलिंगने, तेवढीच मजबूत व घट्ट होती. आम्ही समाजविघातक शक्तींच्या कुठल्याही अपप्रचाराला, चिथावणीखोर वक्तव्यांना बळी पडत नाही, भीक घालत नाही. सर्वधर्मीयांमधील एकोप्याचे नाते अबाधित आहे, हे नागपूरकरांनी दाखवून दिले, म्हणूनच नागपूर आज जिंकले.