कंत्राटी कामगारांना प्रकल्पात घ्याचंद्रशेखर बावनकुळे : महाराष्ट्र दिनानिमित्त रोजंदारी संघटनेतर्फे कार्यक्रमनागपूर : नवीन वीज प्रकल्प काही महिन्यातच सुरू होणार असल्याने या प्रकल्पात जुन्या वीज केंद्रातील सर्व कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.कोल इंडिया रोजंदारी कामगार युनियनच्यावतीने कामगार आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वीज केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ हा कार्यक्रम झाला. राज्याला वीजपुरवठा करण्यात कोराडी वीज केंद्रातील कामगारांचा मोठा वाटा आहे. असे असताना कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात महानिर्मिती अपयशी ठरली आहे. वसाहतीच्या जागेवर महानिर्मिती आपला अधिकार दाखवून कामगारांना बेघर करण्याचे प्रयत्न करीत आहे. आपण हे कदापि सहन करणार नाही. कामगारांनीही संघटित व्हावे, कामगारांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता एस. एस. जाधव, भारतीय कामगार महासंघाटाचे कार्याध्यक्ष राजेश रंगारी, नगरसेवक रत्नदीप रंगारी, इंटकचे उपाध्यक्ष प्रकाश भालेराव, सुरक्षा अधिकारी माने, कल्याण अधिकारी भालचंद्र गायकवाड, विनोद बोरकर, अरुण उजवणे, संजय भोंगाडे, चंदू टेकाम यांची प्रमुख उपस्थिती होती. गौतम जवारे, श्यामराव लांजेवार, श्रीराम कामटकर, साहेबराव करडभाजने, कुणाल देवगिरीकर, गोपाल नेवारे, रसिद रवींद्रत, राजू सोनेकर, अनिल पवार, प्रवीण कामटकर, अजय वाघमारे, राजू रॉय, वीरेंद्र चोखांद्रे, देवाजी लाडसे, संगम जांभुळकर, सचिन बंड, पुरुषोत्तम जीवतोडे, भीमराव मेश्राम, राजू चव्हाण, आत्माराम सोमवंशी, हरिश्चंद्र भटेरो, मोहन देशमुख, देवचंद गजभिये कार्यक्रमाला उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कंत्राटी कामगारांना प्रकल्पात घ्या
By admin | Updated: May 3, 2014 16:40 IST