शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

तहसील कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: October 5, 2016 03:17 IST

मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यातील पारशिवनी तहसील कार्यालयात गतिमान प्रशासनाचे वाभाडे काढले जात असल्याचे वास्तव आहे.

पारशिवनीवासीयांत संताप : लेटलतिफ अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्तविजय भुते पारशिवनीमुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यातील पारशिवनी तहसील कार्यालयात गतिमान प्रशासनाचे वाभाडे काढले जात असल्याचे वास्तव आहे. येथील तहसील कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकांना हेलपाटे मारावे लागतात. सोमवारी आठवडी बाजाराचा दिवस असतानादेखील ११.३० वाजेपर्यंत कुणीही अधिकारी कार्यालयात दाखल नव्हते. त्यामुळे हे तहसील कार्यालय वाऱ्यावर असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी ११.२५ वाजता तहसील कार्यालय गाठून तेथील भयावह वास्तव कॅमेऱ्यात कैद केले आहे. ११.३० वाजेपर्यंत मंडळ अधिकारी कार्यालय कुलूप बंद होते. त्यामुळे शेतीसंबंधीच्या कामानिमित्त आलेले अनेक शेतकरी निराश दिसून आले. मंडळ अधिकाऱ्यांचा शोध कुठे घ्यावा, असा प्रश्न अनेक जण शिपायांना करीत होते. दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी-१ या कार्यालयात सकाळी ११.३० वाजता सर्वत्र शुकशुकाट होता. एकही अधिकारी अथवा कर्मचारी तेथे नव्हता. याउलट याच कार्यालयात डिस्पूट शेतीच्या संबंधातील मिटिंग व सेटिंग सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याचे नजरेस पडते. तालुक्यातील आदिवासी भागातील मॅक्सवर्थ कंपनीच्या जमिनी विक्रीचा व रजिस्ट्रीचा गोरखधंदा याच कार्यालयात जोरात चालतो, हे येथे उल्लेखनीय.निवडणूक विभागाचे कार्यालयदेखील ११.३० वाजता कुलूप लावलेले होते. मनरेगा विभाग, प्रस्तुतकार विभाग, नझूल विभाग येथेही अधिकाऱ्यांचा शुकशुकाट होता.येथील तहसील कार्यालयात कन्हान ते सालेघाट या आदिवासीबहुल भागातील ग्रामस्थ आणि पालीउमरी ते सालई मोकासा अशा चारही दिशेकडून ग्रामस्थ आपल्या कामांसाठी येतात. परंतु लेटलतिफ अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे ग्रामस्थांची निराशा होते. एकाच कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने सर्वसामान्यांत कमालीचा संताप आहे. त्यातच तहसील कार्यालयातील काही विभागात दलाल सक्रिय झाले असून अनेक कर्मचारी वसुली अधिकारी बनले आहेत. परिणामी या कार्यालयात सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंडही सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पदतहसील कार्यालयात अवैध रेती व मुरूम उत्खनन, शासकीय आबादी, प्लॉट वाटप, भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर, शासकीय जागा हडपणे व ग्रामस्थांचे अतिक्रमण, वीटभट्टी मालकांद्वारे मातीचे अवैध उत्खनन व अतिक्रमण, कोरडवाहू शेती ओलित दाखविणे, शेतीची रजिस्ट्री लावताना शेतीच्या सातबारावरून मालगुजारी तलाव व गुरांना पाणी पिण्याची जागा या बाबी काढून टाकणे तसेच दोषपूर्ण फेरफार करणे, सावकारांची अवैध सावकारी व कर्जमाफी अशा अनेक घटना व प्रकरणात तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. पाण्याची मशीन बनले शो-पीसशहरी भागापासून तर आदिवासी भागातील शेकडो विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार वर्ग विविध कामानिमित्त तहसील कार्यालयात येतात. परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय तहसील कार्यालयात नाही. येथे असलेली शुद्ध पिण्याच्या पाण्याची मशीन शो-पीस ठरली आहे. एकूणच या कार्यालयात बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी असताना वरिष्ठ अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी यांना या बाबी कशा दिसत नाहीत, सर्वसामान्यांची गैरसोय होणार नाही यासाठी यात सुधारणा केव्हा होणार असे अनेक प्रश्न नागरिकांत चर्चिले जात आहेत.