शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

क्रूर नियतीला सवाल, ‘मासूमों का क्या कसूर था?’, ‘फादर्स डे’च्या दिवशी मृत चिमुकल्यांच्या वडिलांचा टाहो

By योगेश पांडे | Updated: June 19, 2023 11:20 IST

रेतीचा कचरा फेकायले गेले अन् त्यानंतर सगळेच संपले

योगेश पांडे

नागपूर : अंगाखांद्यावर खेळणाऱ्या ज्या मुलांच्या बाललीला पाहिल्या त्यांचे निपचित पडलेले मृतदेह पाहून सर्वांच्या नजरा रविवारी रात्री पाणावलेल्या होत्या. दिवसभर चिवचिव करणारी तौफिक आणि आलियाला गमावल्यानंतर आई अफसाना आणि वडील फिरोज यांचा आक्रोश थांबता थांबत नव्हता. तर आफरीनच्या वडिलांची नजर तिच्या आठवणींमध्ये शून्यात हरविली होती. खेळता खेळता झालेल्या तीन चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर पाचपावलीतील फारूखनगरमधील प्रत्येक घरात शोकाकुल वातावरण होते. नियतीने केलेल्या क्रूर थट्टेसमोर सर्वच हतबल होते आणि सर्वांचा एकच सवाल होता, ‘इन मासूमों का क्या कसूर था?’

पाचपावलीतील फारूखनगरमध्ये रविवारी रात्री शोककळा पसरली होती. शनिवारपासून गायब झालेल्या तौफिक, आलिया व आफरीन यांचे मृतदेहच आढळल्याने विविध प्रश्नांना ऊत आला होता. मात्र त्याहून महत्त्वाचे आईवडिलांना आधार देणे जास्त गरजेचे होते. तेच काम प्रत्येक जण आपापल्या परीने करत होता.

नागपूर हादरले, बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे कारमध्येच आढळले मृतदेह

अन् ते पोटच्या गोळ्यांसोबतचे अखेरचेच जेवण ठरले

तौफिक आणि आलियाचे आजोबा मुस्तफा खान यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड ते दोन वाजता दोघेही त्यांच्या आईसोबत जेवले व घरासमोरच खेळत होते. त्यांनी समोरील रेती उचलून आणली व गच्चीवर खेळत होते. रेतीचा कचरा टाकायला म्हणून ते खाली गेले आणि त्यानंतर बेपत्ताच झाले. त्यांचे ते अखेरचे जेवण ठरले. हे सांगताना मुस्तफा यांचे अश्रू अनावर होत होते. तौफिक व आलियाचा मोठा भाऊ नऊ वर्षांचा आहे, तर एक बहीण वर्षाचीदेखील झालेली नाही.

शहरातील ८० ‘स्क्रॅप’वाल्यांकडून रात्रभर शोध

तीनही मृतक चिमुकल्यांचे वडील हे मूळचे उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील असून ते ‘स्क्रॅप’ विक्रीचे काम करतात. मुले हरविल्याची माहिती मिळाली तेव्हा फिरोज खान व ईरशाद खान हे दोन्ही वडील कामावर होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी आजूबाजूच्या बगीच्यांमध्येदेखील शोध घेतला. पोलिसांचा शोध सुरूच होता. मात्र हातगाडीवर ‘स्क्रॅप’ विकत घेणाऱ्या सुमारे ८० जणांकडून रात्रभर शहरातील विविध भागात शोधमोहीम सुरू होती. प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात होता. रविवारी दुपारीदेखील मुलांचे फोटो घेऊन शोध घेतला, अशी माहिती फिरोज खान यांचे बंधू शाहबाज खान यांनी दिली.

अगोदर लहान बहीण, आई गेली अन् आता आफरीनदेखील हिरावली

आफरीनचे वडील इर्शाद खान हे तर पोलिसांचा पंचनामा शून्यातच पाहत उभे होते. त्यांची पत्नी रिझवाना हिचा तीन वर्षांअगोदर क्षयरोगामुळे मृत्यू झाला होता, तर आफरीनची लहान बहीणदेखील सात महिन्यांची असताना दगावली होती. त्यानंतर इर्शाद यांनी दुसरा विवाह केला असला तरी त्यांचा जीव आफरीनमध्येच होता. तिला ते या वर्षीपासून शाळेतदेखील पाठविणार होते. शनिवारी तिला निरोप देऊन ते कामावर गेले. घरी परत आल्यावर त्यांना आफरीन दिसली नाही व त्यानंतर तीनही मुले गायब झाल्याची बाब समोर आली. माझी आफरीन कधीच परत येणार नाही हा विचारच सहन होत नसल्याचे ते वारंवार म्हणत होते.

कार्यक्रमामुळेकार ठेवली आणि तीच काळ ठरली

ज्या कारमध्ये तीनही चिमुकल्यांचा मृतदेह आढळला ती कार एका गॅरेजमधील असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. संबंधित गॅरेजच्या मालकाच्या घरी एक कार्यक्रम होता व त्यामुळे ती कार घराच्या समोर पार्क न करता मागे आणून ठेवण्यात आली होती. शनिवारी लोकांनी कारमध्ये टॉर्च मारून पाहिला होता. मात्र काच काळी असल्यामुळे फारसे काही दिसले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे जिथे कार उभी होती त्याच्या जवळच चहाची टपरी आहे व ती दिवसभर उघडी असते. तर संबंधित गल्लीमध्ये रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. अशा स्थितीत कुणालाही मुले दिसली नाहीत किंवा कारच्या काचा ठोठावल्याचा आवाज कसा आला नाही, असा प्रश्न नातेवाईक उपस्थित करत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरcarकार