शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपूरच्या संविधान चौकात काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:10 IST

देशातील सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा जपावा, शांतता कायम राहावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या सूचनेवरून आज सोमवारी देशभरात राज्य व जिल्हा पातळीवर एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देसामाजिक ऐक्य व जातीय सलोखा जपण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - देशातील सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा जपावा, शांतता कायम राहावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या सूचनेवरून आज सोमवारी देशभरात राज्य व जिल्हा पातळीवर एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहर (जिल्हा)काँग्रेस कमिटीतर्फे संविधान चौकात सकाळी १० वाजेपासून लाक्षणिक उपोषणाला सुरूवात करण्यात आली. शहर अध्यक्ष विकास ठाकरे व नागपूर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत.भाजप सरकारने देशात चुकीचे निर्णय घेतले आहेत. देशात दंगली घडत आहेत. त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण सुरू असल्याचे विकास ठाकरे आणि राजेंद्र मुळक यांनी यावेळी सांगितले. या उपोषणाच्या माध्यमातून देशातील जनतेला सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम राहण्याचे आवाहन करीत आहोत, असेही या उपोषणात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार,माजी मंत्री, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय आणि शहर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मात्र काँग्रेसमधील विलास मुत्तेमवार विरोधी गटाचे नेते या कार्यक्रमात सहभागी झालेले नाही. या कर्यक्रमातही पक्षातील गटबाजी दिसून आली.

टॅग्स :congressकाँग्रेस