शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

चहावाल्यांच्या चहाचा गोडवा हरवला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:34 IST

जुना बाबूलखेडा येथे राहणार शुभम चंदू कुंभारे. चार वर्षांपासून एनआयटी गार्डनजवळ चहा विकण्याचे काम करतो. याच भरवशावर म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी तो सांभाळत होता. कोरोना रोखण्यासाठी लागलेल्या ताळेबंदीत त्याचा रोजगारच हिरावला आहे. त्यामुळे आता कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेकडोंचा गेला रोजगारआर्थिक अडचणींनी पछाडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुना बाबूलखेडा येथे राहणार शुभम चंदू कुंभारे. चार वर्षांपासून एनआयटी गार्डनजवळ चहा विकण्याचे काम करतो. याच भरवशावर म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी तो सांभाळत होता. कोरोना रोखण्यासाठी लागलेल्या ताळेबंदीत त्याचा रोजगारच हिरावला आहे. त्यामुळे आता कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.शुभम कुंभारे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. टाळेबंदीने लाखो कामगार आणि लहानमोठ्या व्यवसायिकांचा रोजगार गेला आहे आणि शहरातील शेकडो चहा विक्रेते हे त्यातीलच आहेत. शहरातील गलोगल्लीत कधी मोठ्या दुकानात तर कधी लहान लहान दुकाने लावून चहा विक्री केली जाते आणि यातून शेकडोंना रोजगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळाला आहे. शुभम फार जास्त शिकलेला नाही. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. वडील टेलर आहेत आणि महाल येथे एका मोठ्या दुकानात ते कामाला जात होते. अल्प शिक्षित असल्याने रोजगाराची चिंता त्याला आणि आईवडिलांनाही होती. त्यावेळी शुभमने एनआयटी गार्डनजवळ चहाचे दुकान थाटले. त्यामुळे कुटुंबाला आधार तर मिळालाच पण वडिलांनाही आराम मिळाला होता. शुभम सांगतो, रोज ७००-८०० रुपयांची विक्री व्हायची. चांगलं दुकान चालायचं. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमणाची कारवाई झाली आणि महिनाभर दुकान बंद ठेवावे लागले. १० दिवसांपूर्वी त्याने पुन्हा दुकान सुरू केले होते पण आता पुन्हा कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीने त्याचा रोजगार पुन्हा हिरावला गेला आहे. एका महिन्यापासून दुकान बंद आहे आणि आता कुटुंबासमोर संकट उ•ो झाले आहे. विशेष म्हणजे यात वडिलांचाही रोजगार बंद झाला आहे.शुभमसारखे शेकडो चहा विक्रेते आहेत ज्यांच्यावर टाळेबंदीने संकट ओढवले आहे. काही अतिशय लहान विक्रेते थोड्याफार व्यवसायातून किडुकमिडुक जमा करून आपला प्रपंच भागवत होते. मात्र कोरोनाने त्या सर्वांना अडचणीत टाकले आहे. शहरात रस्त्यारस्त्यावर अशी चहाची अनेक दुकाने लागली होती, ती बंद झाली आहेत. घरी आवश्यक तेवढे पैसे नाहीत आणि अन्नधान्यही नाही. त्यामुळे कुटुंबाची गरज पूर्ण करण्याचा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे.काही वळले दुसऱ्या व्यवसायाकडेचहाटपरी बंद झाल्याने स्वत: शुभम एका टरबूज विक्रेत्याकडे काम करीत आहे. १००-१५० रोजी मिळाली तीच खूप आहे, असे तो म्हणतो. अनेक चहा विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री किंवा फळे विक्रीचे काम सुरू केले आहे. घराचा प्रपंच चालविण्यासाठी काही पर्यायच नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस