शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

चहावाल्यांच्या चहाचा गोडवा हरवला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:34 IST

जुना बाबूलखेडा येथे राहणार शुभम चंदू कुंभारे. चार वर्षांपासून एनआयटी गार्डनजवळ चहा विकण्याचे काम करतो. याच भरवशावर म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी तो सांभाळत होता. कोरोना रोखण्यासाठी लागलेल्या ताळेबंदीत त्याचा रोजगारच हिरावला आहे. त्यामुळे आता कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेकडोंचा गेला रोजगारआर्थिक अडचणींनी पछाडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुना बाबूलखेडा येथे राहणार शुभम चंदू कुंभारे. चार वर्षांपासून एनआयटी गार्डनजवळ चहा विकण्याचे काम करतो. याच भरवशावर म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी तो सांभाळत होता. कोरोना रोखण्यासाठी लागलेल्या ताळेबंदीत त्याचा रोजगारच हिरावला आहे. त्यामुळे आता कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.शुभम कुंभारे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. टाळेबंदीने लाखो कामगार आणि लहानमोठ्या व्यवसायिकांचा रोजगार गेला आहे आणि शहरातील शेकडो चहा विक्रेते हे त्यातीलच आहेत. शहरातील गलोगल्लीत कधी मोठ्या दुकानात तर कधी लहान लहान दुकाने लावून चहा विक्री केली जाते आणि यातून शेकडोंना रोजगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळाला आहे. शुभम फार जास्त शिकलेला नाही. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. वडील टेलर आहेत आणि महाल येथे एका मोठ्या दुकानात ते कामाला जात होते. अल्प शिक्षित असल्याने रोजगाराची चिंता त्याला आणि आईवडिलांनाही होती. त्यावेळी शुभमने एनआयटी गार्डनजवळ चहाचे दुकान थाटले. त्यामुळे कुटुंबाला आधार तर मिळालाच पण वडिलांनाही आराम मिळाला होता. शुभम सांगतो, रोज ७००-८०० रुपयांची विक्री व्हायची. चांगलं दुकान चालायचं. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमणाची कारवाई झाली आणि महिनाभर दुकान बंद ठेवावे लागले. १० दिवसांपूर्वी त्याने पुन्हा दुकान सुरू केले होते पण आता पुन्हा कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीने त्याचा रोजगार पुन्हा हिरावला गेला आहे. एका महिन्यापासून दुकान बंद आहे आणि आता कुटुंबासमोर संकट उ•ो झाले आहे. विशेष म्हणजे यात वडिलांचाही रोजगार बंद झाला आहे.शुभमसारखे शेकडो चहा विक्रेते आहेत ज्यांच्यावर टाळेबंदीने संकट ओढवले आहे. काही अतिशय लहान विक्रेते थोड्याफार व्यवसायातून किडुकमिडुक जमा करून आपला प्रपंच भागवत होते. मात्र कोरोनाने त्या सर्वांना अडचणीत टाकले आहे. शहरात रस्त्यारस्त्यावर अशी चहाची अनेक दुकाने लागली होती, ती बंद झाली आहेत. घरी आवश्यक तेवढे पैसे नाहीत आणि अन्नधान्यही नाही. त्यामुळे कुटुंबाची गरज पूर्ण करण्याचा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे.काही वळले दुसऱ्या व्यवसायाकडेचहाटपरी बंद झाल्याने स्वत: शुभम एका टरबूज विक्रेत्याकडे काम करीत आहे. १००-१५० रोजी मिळाली तीच खूप आहे, असे तो म्हणतो. अनेक चहा विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री किंवा फळे विक्रीचे काम सुरू केले आहे. घराचा प्रपंच चालविण्यासाठी काही पर्यायच नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस