शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गोड स्वप्न कडू झाले!

By admin | Updated: September 13, 2015 02:34 IST

गरिबीशी झुंजत, तिखट मिठाचा घास खात जगणाऱ्या होतकरू अमितने पोळ्याचा सण गोड करण्याचे स्वप्न रंगविले होते.

ऐन पोळ्याच्या दिवशी अमितने मृत्यूला कवटाळले : लकडगंजमध्ये शोककळा नरेश डोंगरे नागपूरगरिबीशी झुंजत, तिखट मिठाचा घास खात जगणाऱ्या होतकरू अमितने पोळ्याचा सण गोड करण्याचे स्वप्न रंगविले होते. आई अन् छोट्या बहिण भावालाही त्याने हेच गोड स्वप्न दाखवले होते. मात्र, आडमुठ्या प्रवृत्तीने त्याचा घात केला. आई, बहिण आणि छोट्या भावाला छान कपडे घेऊन घरात गोडधोड करण्याचे स्वप्न भंगल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला. असंख्य आशा अपेक्षांसोबत आपल्याकडे नजर लावून बसलेल्या घरच्यांना आता घरी जाऊन काय सांगू, असा प्रश्न त्याला अस्वस्थ करून गेला. या अस्वस्थतेनेच त्याला गांधीसागर तलावावर नेले. अन्... ऐन पोळ्याच्या दिवशी एका गरिब कुटुंबाच्या वाट्याला आक्रोश आला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना उघड झाल्यानंतर लकडगंजमधील अनेकांच्या तोंडचा घास कडू झाला. अमित दिलीप सिडाम (वय २०) हा तरुण लकडगंज, शांतिनगरात राहात होता. त्याला अंजली (वय १८) आणि सुमीत (वय १६) हे बहीणभाऊ. घरची स्थिती अतिशय बेताची. त्यात तीन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यामुळे अमितची आई सुलोचनाबाई (वय ४५) सुपारी कारखान्यात काम करून कसाबसा कुटुंबाचा गाडा रेटण्याचा प्रयत्न करते. आईची होणारी ओढाताण आणि गरिबीमुळे स्वत:सोबतच बहीण-भावाची होणारी होरपळ ध्यानात घेऊन अमितने तीन महिन्यापासून एका ट्रेडिंग कंपनीत काम धरले. ४ हजार रुपये महिना त्याला पगार ठरला. बीकॉमच्या प्रथम वर्षाचे वर्ग करून तो कामावरही जाऊ लागला. मालकाने काम काढून घेण्यासोबतच अमितने काम सोडू नये म्हणून पगार अडवून ठेवण्याचे तंत्र अवलंबले. परिणामी अमितच्या मूळ उद्देशालाच तडा गेला. अस्वस्थतेतच काढले दिवस

गोड स्वप्न कडू झाले!नागपूर : दोन महिन्यांचा पगार रोखून ठेवणाऱ्या मालकाची आर्जव करीत तो अस्वस्थतेच दिवस काढू लागला. पोळा जवळ आला. यावेळी एकदम दोन महिन्यांच्या पगाराचे पैसे मिळेल. त्यातून आई, बहीण अन् भावाला नवीन कपडे घेऊ, घरात छान गोडधोड पदार्थ करू, असे मनोमन ठरवत अमितने आपल्या आईला आश्वस्त केले. पोळा २४ तासावर आला तरी मालक थकीत पगार द्यायला तयार नसल्याने तो रडकुंडीला आला होता. मात्र, स्वत:ची अवस्था लपवत तो त्याच्याकडे आशेने बघणाऱ्या आईला आश्वस्त करीत होता. शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडताना अमितने ‘आज सर्व बरोबर करू‘,असे स्वप्न आईला दाखवले. ट्रेडिंग कंपनीत गेल्यानंतर मालकाला घरची स्थिती सांगून पोळ्यासाठी पैशाची गरज असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या पदरी निराशाच नव्हे तर अपमानही आला. त्यामुळे अमित कमालीचा व्यथित झाला. आपल्या पगाराकडे आशा लावून बसलेल्या आईला, बहिणीला अन् छोट्या भावाला आता काय सांगू, पोळ्याचा सण कसा साजरा करू, असे प्रश्न त्याला सतावू लागले. या प्रश्नांचे वादळ त्याला गांधीसागर तलावाच्या काठावर घेऊन गेले कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त पोळा साजरा करण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या सुलोचनाबाईजवळ अमितच्या अंत्यसंस्कारालाही पैसे नव्हते. शेजाऱ्यांना अमितच्या आत्महत्यामागचे कारण कळले अन् सुलोचनाबाईची अवस्था पाहून अनेक मायमाऊल्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अनेकांनी सण साजरा करण्याचे टाळले. अमितच्या रूपात असहाय मातेचा आधार गेला. बहीण अंजली (वय १८) आणि सुमितच्या पाठीवर वडिलाच्या रूपातील छाया धरणारा दूर झाला. गरीब सिडाम कुटुंबांचे स्वप्नच उद््ध्वस्त झाले. गणेशपेठ पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली. एका कुटुंबाला कधीही भरून न निघणारी जखम देणाऱ्या या प्रकरणात पोलीस आता काय भूमिका घेतात, त्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.