शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

स्वामीनाथन आयोगाची जगात दखल

By admin | Updated: November 18, 2015 03:14 IST

आज पर्यावरण, कुपोषण व दहशतवाद यासारख्या मुद्यांवर जग एकजूट झाले असतांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुद्धा संपूर्ण जग एकत्र होत आहे. यासाठी निमित्त ठरत आहे, ...

‘जनमंच’चे आंदोलन : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जग एकजूट नागपूर : आज पर्यावरण, कुपोषण व दहशतवाद यासारख्या मुद्यांवर जग एकजूट झाले असतांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुद्धा संपूर्ण जग एकत्र होत आहे. यासाठी निमित्त ठरत आहे, तो स्वामीनाथन आयोग. ‘जनमंच’ने नुकत्याच ३० आॅक्टोबर रोजी केलेल्या आंदोलनाची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. शिवाय जगाचे शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांकडे लक्ष वेधले आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जगापुढे जाताच सर्व देशांना आपल्या येथील शेतकऱ्यांचे सुद्धा हेच प्रश्न व समस्या असल्याची जाणीव झाली आहे. शिवाय त्यातून जागतिक चर्चा घडविण्याचा विचार पुढे आला आहे. अशाप्रकारे केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण जगातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्या, अशी मागणी ‘जनमंच’ आणि विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’ च्या मंचावर केली.विशेष म्हणजे, जनमंच, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’ व ‘अलग अँगल’ या वेगवेगळ्या संस्था व संघटनांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकजूट होउन स्वामीनाथन आयोगासाठी संघर्ष सुरू केला आहे. शिवाय ३० नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान यूएनतर्फे पॅरिस येथे हवामान परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात जगभरातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर विचार - मंथन होणार आहे. त्यातच ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’च्या संचालिका श्वेता भट्टड यांना कलाविष्काराच्या सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार भट्टड या ७ डिसेंबर रोजी ‘फेथ इन पॅरिस’ यावर कलाविष्काराचे सादरीकरण करणार आहेत. या कलाविष्कारामध्ये भट्टड या भारतमातेच्या वेषात स्वत: ला जमिनीमध्ये गाडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधतील. शिवाय या कलेचे प्रात्यक्षिक सुरू असताना जगभरातील शेतकरी स्वामीनाथन आयोगाबद्दल आपआपली मते व्यक्त करणार आहे. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून भट्टड यांचा हा कलाविष्कार आणि जगभरातील विचारवंतांची मते जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतील. या चर्चेत ‘जनमंच’चे अध्यक्ष अ‍ॅड़ अनिल किलोर, ‘जनमंच’चे सल्लागार प्रा. शरद पाटील,भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे अभिताभ पावडे, ग्राम आर्ट प्रोजेक्टच्या संचालिका श्वेता भट्टड व अलग अँगलचे ललित विकमशी यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)