शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

स्वच्छ भारत मिशनचा नुसता बोलबाला; जिल्ह्यातील सव्वालाख कुटुंबाकडे शौचालयच नाही

By गणेश हुड | Updated: November 9, 2023 16:01 IST

उपलब्ध आकडेवारीचा विचार करता स्वच्छ भारत मिशनचा बोजवारा उडालेला दिसतो. 

नागपूर : देशातील ग्रामीण भागात स्वच्छतेची स्थिती व व्याप्ती लोकसहभागाच्या माध्यमातून वाढावी  हेतुने केंद्र शासनाव्दारे ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम राबविला जातो. याचा मोठा गाजावाजा सुरू आहे. परंतु नागपूर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची आकडे बघता जिल्ह्यातील तब्बल १ लाख २३ हजार कुटुंबाकडे शौचालय नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आकडेवारीमुळे स्वच्छ भारत मिशनचा नुसता बोलबाला असून वास्तवात परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे. 

ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांत स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्या, उघड्यावरील मलमूत्र विर्सजनाच्या पद्धतीला पूर्णपणे आळा बसावा, आरोग्य सुदृढ व संपन्नतेसह शाश्वत विकास करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. परंतु उपलब्ध आकडेवारीचा विचार करता स्वच्छ भारत मिशनचा बोजवारा उडालेला दिसतो. स्वच्छ भारत कार्यक्रमातील महत्वाचा  घटक

वैयक्तिक शौचालय : स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाचा हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत राज संस्थांमध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालयाची सुविधा उपलब्ध नसलेल्या सर्व ग्रामस्थांकडे सुविधा निर्माण करणे आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनान्वये सदरील मिशन कार्यक्रमामध्ये लाभार्थींना १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. असे असूनही एक लाखाहून अधिक कुटुंबाकडे शौचालय नसेल तर लोकांचे आरोग्य कसे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जि.प.च्या वेबसाईटवर उपलब्ध  शौचालयाची आकडेवारी 

पंचायत समितींचे नाव - एकूण ग्रामपंचायत संख्या - कुटुंब संख्या शौचालय नसलेली कुटुंब संख्या - एकूण

  • भिवापूर    ५५    ५९६२        १४३३८
  • हिंगणा    ५३    १८७८१        २८११९
  • कळमेश्वर    ५१    १०४१२        १७७७६
  • कामठी    ४७    ११९६५        १७२२१
  • काटोल    ८३    १३४५१        २५२६३
  • कुही    ५९    ९९००        २१५९३
  • मौदा    ६२    १३९५३        २४४६३
  • नरखेड    ७०    १२४८१        २२७६३
  • नागपूर (ग्रा.)    ६८    १९८३०        २६८१६
  • पारशिवनी    ५१    ९७२२        १८३१५
  • रामटेक    ४५    १२५६६        २३१०८
  • सावनेर    ७५    १७४६८        २८२१८
  • उमरेड    ४७    ११५६९        २०६८९
  • एकूण    ७६६    १६८०६५        २९१०८२                                                                                                              
टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर