शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

स्वाभिमानीची कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:25 IST

दुष्काळाची केवळ घोषणा न करता हेक्टरी ५० हजार द्या, शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे व्याजासकट पैसे द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे ‘कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात’ काढण्यात आली. पोलिसांनी विधानभवन चौकाजवळ आंदोलनकर्त्यांना अडवून धरले. अखेर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत स्वाभिमानीचे नेते, पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देविधानभवनाजवळ अडविले : पालकमंत्र्यांनी दिले बैठकीचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुष्काळाची केवळ घोषणा न करता हेक्टरी ५० हजार द्या, शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करा, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभऱ्याचे व्याजासकट पैसे द्या आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे ‘कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात’ काढण्यात आली. पोलिसांनी विधानभवन चौकाजवळ आंदोलनकर्त्यांना अडवून धरले. अखेर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. त्यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत स्वाभिमानीचे नेते, पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षातर्फे शनिवारी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम येथून कर्जाची वरात, मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलनाला सुरुवात झाली. पंचशील चौक, झांशी राणी चौक, व्हेरायटी चौक, मॉरेस टी पॉईंट या मार्गाने संविधान चौक, विधानभवन चौकात आंदोलनकर्ते पोहोचले. विधानभवन चौकाजवळ पोलिसांनी कडक बंदोबस्त लावून आंदोलनकर्त्यांना अडवून धरले. वरातीत आंदोलनकर्त्यांनी ‘दीडपट हमी भावाचे काय झाले ? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात’ अशा घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी बोलताना स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, भाजपा सरकारला सत्तेत आणण्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी खूप आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शासन ३४ हजार कोटींचे कर्ज माफ केल्याचा डंका पिटवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुबोध मोहिते यांनी शासनाने शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. यावेळी विधानभवन चौकात स्वाभिमानीच्या शेतकºयांनी प्रतिकात्मक लग्न लावून वरात रामगिरीवर नेण्याचा मानस व्यक्त केला. अखेर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. पुढील आठवड्यात स्वाभिमानीचे नेते, पदाधिकाऱ्यांची नागपुरात मुख्यमंत्र्यांशी बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन आठवडाभरासाठी मागे घेण्यात येत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. यावेळी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार, नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत, अकोला जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, काटोलचे तालुकाध्यक्ष अजय घाडगे, प्रकाश पोपडे, दामोधर इंगोले, विशाल गोटे, सुनील जोगदंड, ओम पाटील, गजानन देशमुख, अमोल गोटे यांच्यासह विदर्भातून आलेले स्वाभिमानीचे कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलन