शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू; घातपाताची शक्यता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 19:48 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातल्या पाटणसावंगी येथे तीन मुलींपैकी दोघींची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी एकीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर दुसरीला नागपूरला नेत असताना तिचा मृत्यू झाला.

नागपूर : तीनपैकी दाेन लहान मुलींची प्रकृती अचानक खराब झाल्याने आईने दाेघींनाही मंगळवारी (दि. ५) सकाळी स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती एकीला मृत घाेषित केले, तर दुसरीवर प्रथमाेपचार करून नागपूरला रेफर केले. मात्र, तिचाही वाटेत मृत्यू झाला. या दाेन्ही चिमुकल्या सख्या बहिणींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्यांचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याला पाेलीस अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे.

साक्षी फुलसिंग मीना (६) व राधिका फुलसिंग मीना (३) अशी मृत बहिणींची नावे आहेत. साक्षी व राधिकाची आई माधुरी फुलसिंग मीना ही मूळची बरबटेकडी, ता. कोंढा, जिल्हा बारा, राजस्थान येथील रहिवासी असून, पाटणसावंगी तिचे माहेर आहे. माधुरीचे फुलसिंग मीनासाेबत ११ वर्षांपूर्वी लग्न झाले. तिला साक्षी व राधिकासह पूनम (९) ही माेठी मुलगी आहे. आजाेबाचे (माधुरीच्या आईचे वडील) निधन झाल्याने ती तिन्ही मुलींना घेऊन पाटणसावंगी (ता. सावनेर)ला आई गंगाबाई भैयाजी काळे हिच्याकडे दाेन महिन्यांपूर्वी राहायला आली.

साक्षी व राधिकाची प्रकृती खराब झाल्याने तिच्या आईने दाेघींनाही सकाळी ७ वाजताच्या सुमारास स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्नेहा कापटे यांनी तपासणीअंती राधिकाला मृत घाेषित केले, तर साक्षीवर प्रथमाेपचार करून नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात रेफर केले. मात्र, गावापासून दाेन किमीपर्यंत जाताच वाटेत साक्षीचाही मृत्यू झाला. त्यामुळे तिला नागपूरला नेण्याऐवजी घरी परत आणले. दाेघींचाही एकाच वेळी मृत्यू झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. उपविभागीय पाेलीस अधिकारी अजय चांदखेडे, ठाणेदार मारुती मुळूक, सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर व दिलीप नागवे यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

पाेस्टमार्टम रिपाेर्टची प्रतीक्षा

राधिकाचा मृत्यू तिला दवाखान्यात नेण्याच्या किमान तीन तास आधी झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली, तर साक्षीचा मृत्यू सकाळी ७.३०च्या सुमारास झाला. दाेघींना जेवणातून विषबाधा झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. मात्र, पूनम, माधुरी व गंगाबाईला ठणठणीत असल्याचे दिसून आले. त्यांच्या शरीरावर मारल्याच्या अथवा विषारी सरपटणाऱ्या प्राण्याच्या दंशाच्या खुणाही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण पाेस्टमार्टम रिपाेर्टमध्येच स्पष्ट हाेणार असल्याचे सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यू