शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू; घातपाताची शक्यता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 19:48 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातल्या पाटणसावंगी येथे तीन मुलींपैकी दोघींची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी एकीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर दुसरीला नागपूरला नेत असताना तिचा मृत्यू झाला.

नागपूर : तीनपैकी दाेन लहान मुलींची प्रकृती अचानक खराब झाल्याने आईने दाेघींनाही मंगळवारी (दि. ५) सकाळी स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती एकीला मृत घाेषित केले, तर दुसरीवर प्रथमाेपचार करून नागपूरला रेफर केले. मात्र, तिचाही वाटेत मृत्यू झाला. या दाेन्ही चिमुकल्या सख्या बहिणींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्यांचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याला पाेलीस अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे.

साक्षी फुलसिंग मीना (६) व राधिका फुलसिंग मीना (३) अशी मृत बहिणींची नावे आहेत. साक्षी व राधिकाची आई माधुरी फुलसिंग मीना ही मूळची बरबटेकडी, ता. कोंढा, जिल्हा बारा, राजस्थान येथील रहिवासी असून, पाटणसावंगी तिचे माहेर आहे. माधुरीचे फुलसिंग मीनासाेबत ११ वर्षांपूर्वी लग्न झाले. तिला साक्षी व राधिकासह पूनम (९) ही माेठी मुलगी आहे. आजाेबाचे (माधुरीच्या आईचे वडील) निधन झाल्याने ती तिन्ही मुलींना घेऊन पाटणसावंगी (ता. सावनेर)ला आई गंगाबाई भैयाजी काळे हिच्याकडे दाेन महिन्यांपूर्वी राहायला आली.

साक्षी व राधिकाची प्रकृती खराब झाल्याने तिच्या आईने दाेघींनाही सकाळी ७ वाजताच्या सुमारास स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्नेहा कापटे यांनी तपासणीअंती राधिकाला मृत घाेषित केले, तर साक्षीवर प्रथमाेपचार करून नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात रेफर केले. मात्र, गावापासून दाेन किमीपर्यंत जाताच वाटेत साक्षीचाही मृत्यू झाला. त्यामुळे तिला नागपूरला नेण्याऐवजी घरी परत आणले. दाेघींचाही एकाच वेळी मृत्यू झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. उपविभागीय पाेलीस अधिकारी अजय चांदखेडे, ठाणेदार मारुती मुळूक, सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर व दिलीप नागवे यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

पाेस्टमार्टम रिपाेर्टची प्रतीक्षा

राधिकाचा मृत्यू तिला दवाखान्यात नेण्याच्या किमान तीन तास आधी झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली, तर साक्षीचा मृत्यू सकाळी ७.३०च्या सुमारास झाला. दाेघींना जेवणातून विषबाधा झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. मात्र, पूनम, माधुरी व गंगाबाईला ठणठणीत असल्याचे दिसून आले. त्यांच्या शरीरावर मारल्याच्या अथवा विषारी सरपटणाऱ्या प्राण्याच्या दंशाच्या खुणाही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण पाेस्टमार्टम रिपाेर्टमध्येच स्पष्ट हाेणार असल्याचे सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यू