शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नागपुरातून बेपत्ता मुलींच्या अपहरणाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:00 IST

सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या  संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून बेपत्ता : पालक आणि पोलिसांची शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या  संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे. पायल सुधीर टेंभुर्णे (वय १३) आणि तनिशा चरणदास टेंभुर्णे (वय १४) अशी बेपत्ता मुलींची नावे आहेत. या दोघी चुलत बहिणी असून, सदरमध्ये मोहननगर, खलाशी लाईनमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. दुकानातून रिबीन घेऊन येतो असे सांगून या दोघी १६ फेब्रुवारीला घराबाहेर गेल्या. रात्र झाली तरी त्या परतल्या नाही, त्यामुळे पालकांनी त्यांची शोधाशोध केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. अभ्यासात हुशार असलेल्या या दोघी सोबत घरून निघून जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांचे कुणीतरी पूर्वनियोजित पद्धतीने अपहरणच केले असावे, असा दाट संशय आहे. पालकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यात अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. सदरचे ठाणेदार सुनील बोंडे आणि त्यांच्या सहकाºयांनी या मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. मुलींच्या मैत्रिणी आणि ओळखीच्यांकडून काही धागेदोरे मिळाल्याचे समजते. या दोघींना गुंगीचे औषध देऊन कुणीतरी पळवून नेल्याचा संशय दाट झाला आहे.सायबर सेलचीही मदतपायल आणि तनिशा तसेच त्यांना पळवून नेणाºयांचा पोलीस शोध घेत आहेत. सायबर सेलचीही यासाठी मदत घेतली जात आहे. या संबंधाने सदर पोलिसांकडे विचारणा केली असता, प्रकरण संवेदनशील असून, त्याबद्दल काही बोलणे योग्य होणार नसल्याचे पोलीस सांगत आहेत. बेपत्ता मुलींचा शोध घेतला जात आहे, एवढेच पोलीस सांगत आहेत. दरम्यान, महिनाभरापासून मुली बेपत्ता असल्याने मुलींच्या आईची प्रकृती ढासळली आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर