शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नागपूरच्या इमामवाड्यातील तरुणाचा अकोला जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:59 IST

अचानक बेपत्ता झालेल्या ईमामवाड्यातील तरुणाचा बाळापूर (जि. अकोला) जवळ पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह सरळ इमामवाडा पोलीस ठाण्यात नेला. या घटनेमुळे इमामवाडा ठाण्यासमोर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते.

ठळक मुद्देसंतप्त नातेवाईकांचा आक्रोश : मृतदेह पोलीस ठाण्यावर नेला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अचानक बेपत्ता झालेल्या ईमामवाड्यातील तरुणाचा बाळापूर (जि. अकोला) जवळ पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह सरळ इमामवाडा पोलीस ठाण्यात नेला. या घटनेमुळे इमामवाडा ठाण्यासमोर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते.गौरव विनोद गाडवे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव असून तो इमामवाड्यात राहत होता. पत्नी सोडून निघून गेल्याने तो हवालदिल झाला होता. अशात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने विमनस्क अवस्थेत तो मंगळवारी,७ एप्रिलला तो घरून निघून गेला. त्याचा ईकडे तिकडे शोध घेतल्यानंतर त्याच्या पालकांनी इमामवाडा पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी मिसिंगची नोंद करून त्याचा शोध सुरू केला. बुधवारी, १० एप्रिलला त्याच्या आईला शेगाव पोलीस ठाण्यातून फोन आला. शेगावमधील नागरिकांशी वाद घातल्याने संतप्त जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले. चौकशीत तो वेडसरसारखा वागत असल्याने त्याच्याकडून तुमचा संपर्क क्रमांक मिळवून तुम्हाला फोन केला,असे त्यावेळी शेगाव पोलिसांनी गौरवची आई रेखा यांना सांगितल्याचे समजते. यावेळी गौरवने त्याच्या आईसोबत बोलताना तिला शेगावला घ्यायला येण्यास सांगितले होते. त्यामुळे गौरवचे आईवडील शेगावला जाण्यास निघाले. गुरुवारी ११ एप्रिलला सकाळी ते शेगावला पोहचले. त्यावेळी आम्ही गौरवला सोडून दिल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे त्या नागपूरकडे परत येण्यास निघाल्या. वाटेत असताना त्यांच्या मोबाईलवर बाळापूर पोलिसांचा फोन आला. त्यामुळे त्या तिकडे गेल्या आणि त्यांना गौरवचा मृतदेहच पाहायला मिळाला.बाळापूर (अकोला) पोलिसांनी गौरवचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे गाडवे कुटुंबीयांना कळविले. रात्री उशिरात गौरव गाडवेचा मृतदेह घेऊन ते इमामवाडा ठाण्यासमोर धडकले. गौरवच्या मृत्यूला पोलिसांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप करून त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आक्रोश सुरू केला. वर्दळीच्या मार्गावर पोलीस ठाणे असल्याने अल्पावधीतच वस्तीतील मंडळींसह रस्त्याने जाणारे-येणारेही तेथे गोळा झाले. काहींनी नारेबाजी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. पीएसआय अमोल जाधव आणि त्यांच्या सहका-यांनी संतप्त जमावाची समजूत काढली. ही घटना बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने इमामवाडा पोलिसांचा त्यासोबत काही संबंध नसल्याचे समजावून सांगितले. त्यामुळे मध्यरात्री तणाव निवळला.शेगाव पोलिसांचा हलगर्जीपणागौरवच्या संशयास्पद मृत्यूला शेगाव पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गौरवची आई रेखा हिने केला आहे. ज्यावेळी त्यांना शेगाव पोलिसांचा फोन आला त्यावेळी आई रेखा यांनी पोलिसांना गौरवला तुमच्या ताब्यात ठेवा, आम्ही घ्यायला येतो, असे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी त्याला कसे काय सोडून दिले, हा संशयाचा मुद्दा ठरला आहे. तो बाळापूरला कसा पोहचला, तेथे तो पाण्यात बुडून कसा मेला, हे सर्व प्रश्न संशय वाढवणारे आहेत. त्यामुळे विमनस्क अवस्थेतील गौरवला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली असावी आणि त्याचा मृतदेह पाण्यात फेकून देण्यात आला असावा, असा संशय रेखा यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गौरवच्या खिशात नागपूरच्या परतीचे तिकीट आढळल्याने हे प्रकरण जास्तच संशयास्पद झाले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPolice Stationपोलीस ठाणे