शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

राज्यभरात ४३६ नक्षल्यांचे आत्मसमर्पण

By admin | Updated: May 18, 2014 01:04 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ४२० नक्षलवाद्यांसह राज्यातील गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ४२० नक्षलवाद्यांसह राज्यातील गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. गृह विभागाने २९ आॅगस्ट २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली. गडचिरोलीतील ४२० समर्पितांपैकी ३६७ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव असून यापैकी १७० प्रस्ताव मंजूर आहेत, तर उर्वरीत प्रस्ताव मंजूरीची कार्यवाही सुरू आहे. नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केल्यापासून आत्तापर्यंत एकूण ९ टप्प्यात ४२० नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आतापर्यंत नक्षल चळवळीत पती-पत्नी म्हणून काम करणार्‍या ३० जोडप्यांनीही या योजनेंतर्गत आत्मसमर्पण केले. अल्पशिक्षीत १५ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खाजगी वाहन प्रशिक्षण संस्थेमधून वाहन चालकाचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन चालविण्याचे परवाने देण्यात आले आहेत. सहा आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनाही शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून एका आत्मसर्पित नक्षलवाद्याला इलेक्ट्रीक फिटींगचे आणि ५ सदस्यांना खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून नळ फिटींग (प्लम्बिंग) चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. २० सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणाच्या आधारावर विविध कंपन्यांमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे. काही सदस्य पोलिस विभागामध्ये विशेष पोलिस अधिकारी म्हणून, तर काही पोलिस विभागात रोजंदारीची कामे करीत आहेत. आत्मसमर्पण करणार्‍या नक्षलवाद्यांना २ कोटी ७२ लाख ८० हजार ३०५ रुपये, तर केंद्र शासनाच्या सुरक्षाविषयक खर्च योजनेतून ४२ लाख ५० हजार रुपए असे एकूण ३ कोटी १५ लाख ३० हजार ३०५ रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. आत्मसमर्पण योजना राबवून अहिंसा मार्गाचा स्वीकार करण्यासाठी पुनर्वसन करण्याची हमी शासनाने घेतली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)