शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

राज्यभरात ४३६ नक्षल्यांचे आत्मसमर्पण

By admin | Updated: May 18, 2014 01:04 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ४२० नक्षलवाद्यांसह राज्यातील गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ४२० नक्षलवाद्यांसह राज्यातील गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. गृह विभागाने २९ आॅगस्ट २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली. गडचिरोलीतील ४२० समर्पितांपैकी ३६७ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव असून यापैकी १७० प्रस्ताव मंजूर आहेत, तर उर्वरीत प्रस्ताव मंजूरीची कार्यवाही सुरू आहे. नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केल्यापासून आत्तापर्यंत एकूण ९ टप्प्यात ४२० नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आतापर्यंत नक्षल चळवळीत पती-पत्नी म्हणून काम करणार्‍या ३० जोडप्यांनीही या योजनेंतर्गत आत्मसमर्पण केले. अल्पशिक्षीत १५ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खाजगी वाहन प्रशिक्षण संस्थेमधून वाहन चालकाचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन चालविण्याचे परवाने देण्यात आले आहेत. सहा आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनाही शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून एका आत्मसर्पित नक्षलवाद्याला इलेक्ट्रीक फिटींगचे आणि ५ सदस्यांना खाजगी यंत्रणेच्या माध्यमातून नळ फिटींग (प्लम्बिंग) चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. २० सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणाच्या आधारावर विविध कंपन्यांमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे. काही सदस्य पोलिस विभागामध्ये विशेष पोलिस अधिकारी म्हणून, तर काही पोलिस विभागात रोजंदारीची कामे करीत आहेत. आत्मसमर्पण करणार्‍या नक्षलवाद्यांना २ कोटी ७२ लाख ८० हजार ३०५ रुपये, तर केंद्र शासनाच्या सुरक्षाविषयक खर्च योजनेतून ४२ लाख ५० हजार रुपए असे एकूण ३ कोटी १५ लाख ३० हजार ३०५ रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. आत्मसमर्पण योजना राबवून अहिंसा मार्गाचा स्वीकार करण्यासाठी पुनर्वसन करण्याची हमी शासनाने घेतली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)