शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

नागपुरात शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया थांबल्या, सामान्यांनी जावे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 10:55 IST

नागपुरात तातडीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. सामान्यांनी जावे कुठे?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देईएनटी, सर्जरी, नेत्र व ऑर्थाेपेडिकसाठी एकच शस्त्रक्रिया गृह

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) ६०० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्स डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आल्याने याचा सर्वाधिक फटका शस्त्रक्रियेच्या रुग्णांना बसला आहे. एकाच शस्त्रक्रियागृहात ईएनटी, जनरल सर्जरी, नेत्र व ऑर्थाेपेडिक विभागाच्या शस्त्रक्रिया होत असल्याने मर्यादित शस्त्रक्रिया होत आहेत. तातडीच्या व महत्त्वाच्या शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. सामान्यांनी जावे कुठे?, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमधील रुग्णांच्या सोयीसाठी सुमारे ५४ कोटी रुपये खर्चून ५५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्स उभारण्यात आले. या कॉम्प्लेक्समध्ये शल्यचिकित्सा (सर्जरी) विभाग, अस्थिव्यंगोपचार (ऑर्थाेपेडिक) विभाग, कान, नाक व घसा (ईएनटी) विभाग आणि नेत्ररोग विभागाच्या प्रत्येकी तीन-तीन शस्त्रक्रियागृह, रिकव्हरी वॉर्ड व सामान्य वॉर्ड आहे. यात प्रत्येक विभागाच्या एका शस्त्रक्रियागृहाला ‘मॉड्युलर ओटी’चे स्वरूप देण्यात आले. याचा फायदा रुग्णांना होऊ लागला होता. परंतु मे महिन्यात सर्जिकल कॉम्प्लेक्सला कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आले. यामुळे हे विभाग दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. या चारही विभागांच्या शस्त्रक्रियेसाठी आता एकच शस्त्रक्रियागृह उपलब्ध आहे.

रुग्ण मेडिकलला रेफरलॉकडाऊनच्या काळात मेयोची अडीच हजाराची रोजची ओपीडी ५०० वर आली होती. अनलॉक होताच हीच ओपीडी पुन्हा आता हजारावर गेली आहे. इतर आजारांची रुग्णसंख्या वाढत असताना सोयीच उपलब्ध नसल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. विशेषत: ईएनटी, सर्जरी, आर्थाे व नेत्र विभागासाठी एकच शस्त्रक्रियागृह असल्याने मोजक्याच शस्त्रक्रिया होत आहेत. पूर्वी २० ते ३० मेजर सर्जरी तर ३५ ते ४० मायनर सर्जरी व्हायच्या. आता एक ते दोन मेजर सर्जरी तर पाच ते १० मायनर सर्जरी होत असल्याची माहिती आहे. महत्त्वाच्या व तातडीच्या शस्त्रक्रियेच्या रुग्णांना मेडिकलकडे रेफर केले जात आहे. यात सामान्य व गरीब रुग्ण अडचणीत आले आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये जनआरोग्य योजना सुरू व्हावीशहरात २० वर मोठी खासगी हॉस्पिटल आहेत. प्रत्येकांच्या खाटांची संख्या १०० वर आहे. या रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केल्यास लाभार्थ्यांना उपचार मिळतील. मेयो, मेडिकलवर वाढलेला रुग्णांचा भार काही प्रमाणात कमी होईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Healthआरोग्य