शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा - आशिष देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 00:20 IST

उशिरा तिकीटवाटप करणे ही काँग्रेस नेतृत्वाची चूक

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मजबूत चेहरा द्यायला हवा होता. असे झाले असते तर निकालांचे चित्र वेगळे असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ करायला हवे होते, असे मत काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार व माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. सोमवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

निवडणुकांना सामोरे जायच्या वेळी आघाडीला प्रभावी चेहरा आवश्यक होता. दुर्दैवाने तसे झाले नाही. यासंदर्भात वेळीच पुढाकार अपेक्षित होता. नागपूर शहरात मुख्यमंत्री लढत असतानादेखील काँग्रेसने वेळेवर उमेदवार घोषित केले. भाजपच्या बालेकिल्ल्यात तरीदेखील काँग्रेस उमेदवारांनी जोरदार टक्कर दिली व सहापैकी दोन जागांवर विजय मिळविला. आम्हाला प्रचार करायला १० ते १२ दिवसच मिळाले. जर दीड महिना अगोदर नाव जाहीर केले असते तर आम्ही मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहोचू शकलो असतो व मोठा फरक पडला असता. यावेळी झालेली चूक काँग्रेस नेतृत्वाकडून पुढील वेळी सुधारली जाईल अशी अपेक्षा आहे. आम्ही ही चूक सुधारण्यासाठी भाग पाडू, असे प्रतिपादनदेखील आशिष देशमुख यांनी केले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आणखी मोठे पद देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. मी कधीही सत्तेच्या मागे नव्हतो व पुढील निवडणुकीत मी परत मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात उभा राहील, असेदेखील ते म्हणाले. यावेळी दक्षिण नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव हेदेखील उपस्थित होते.गटबाजीत ऊर्जा वाया गेलीदरम्यान, आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे एक पत्रकदेखील जारी केले. यातदेखील त्यांनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभेचा कौल हा सत्ताधीशांच्या विरोधातील आहे. परंतु काँग्रेस पक्ष विखुरलेला व नेते सैरभैर झालेले होते. त्यामुळे याअगोर व आतादेखील सत्ता मिळवू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक मुद्यांवर आपले दुर्लक्ष झाले. गटबाजीत ऊर्जा वाया घालवली. केवळ निवडणूक ते निवडणूक मतदारांना भेटल्याने फारसे काही हाताला लागत नाही. मतदारांनी यावेळी आपल्यावर विश्वास टाकला आहे व यात आपण चुकलो तर भविष्यात अडचणीत येऊ, असे यात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस