शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा - आशिष देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 00:20 IST

उशिरा तिकीटवाटप करणे ही काँग्रेस नेतृत्वाची चूक

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मजबूत चेहरा द्यायला हवा होता. असे झाले असते तर निकालांचे चित्र वेगळे असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ करायला हवे होते, असे मत काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार व माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. सोमवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

निवडणुकांना सामोरे जायच्या वेळी आघाडीला प्रभावी चेहरा आवश्यक होता. दुर्दैवाने तसे झाले नाही. यासंदर्भात वेळीच पुढाकार अपेक्षित होता. नागपूर शहरात मुख्यमंत्री लढत असतानादेखील काँग्रेसने वेळेवर उमेदवार घोषित केले. भाजपच्या बालेकिल्ल्यात तरीदेखील काँग्रेस उमेदवारांनी जोरदार टक्कर दिली व सहापैकी दोन जागांवर विजय मिळविला. आम्हाला प्रचार करायला १० ते १२ दिवसच मिळाले. जर दीड महिना अगोदर नाव जाहीर केले असते तर आम्ही मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहोचू शकलो असतो व मोठा फरक पडला असता. यावेळी झालेली चूक काँग्रेस नेतृत्वाकडून पुढील वेळी सुधारली जाईल अशी अपेक्षा आहे. आम्ही ही चूक सुधारण्यासाठी भाग पाडू, असे प्रतिपादनदेखील आशिष देशमुख यांनी केले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आणखी मोठे पद देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता बावनकुळे यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. मी कधीही सत्तेच्या मागे नव्हतो व पुढील निवडणुकीत मी परत मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात उभा राहील, असेदेखील ते म्हणाले. यावेळी दक्षिण नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव हेदेखील उपस्थित होते.गटबाजीत ऊर्जा वाया गेलीदरम्यान, आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे एक पत्रकदेखील जारी केले. यातदेखील त्यांनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभेचा कौल हा सत्ताधीशांच्या विरोधातील आहे. परंतु काँग्रेस पक्ष विखुरलेला व नेते सैरभैर झालेले होते. त्यामुळे याअगोर व आतादेखील सत्ता मिळवू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक मुद्यांवर आपले दुर्लक्ष झाले. गटबाजीत ऊर्जा वाया घालवली. केवळ निवडणूक ते निवडणूक मतदारांना भेटल्याने फारसे काही हाताला लागत नाही. मतदारांनी यावेळी आपल्यावर विश्वास टाकला आहे व यात आपण चुकलो तर भविष्यात अडचणीत येऊ, असे यात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस