शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालय : काटोल पोटनिवडणुकीवरील स्थगिती हटविण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:21 IST

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विधानसभेच्या काटोल मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरील अंतरिम स्थगिती हटविण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोग व भिष्णूर (ता. नरखेड) येथील सरपंच दिनेश टुले यांनी अंतरिम स्थगितीविरुद्धच्या विशेष अनुमती याचिका मागे घेतल्या.

ठळक मुद्देभारतीय निवडणूक आयोग व दिनेश टुले यांनी याचिका मागे घेतल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विधानसभेच्या काटोल मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरील अंतरिम स्थगिती हटविण्यास नकार दिला. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोग व भिष्णूर (ता. नरखेड) येथील सरपंच दिनेश टुले यांनी अंतरिम स्थगितीविरुद्धच्या विशेष अनुमती याचिका मागे घेतल्या.काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांच्या रिट याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गत १९ मार्च रोजी या पोटनिवडणुकीवर अंतरिम स्थगिती दिली. त्यावर भारतीय निवडणूक आयोग व दिनेश टुले यांचा आक्षेप होता. उच्च न्यायालय निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीवरील अंतरिम स्थगिती अवैध आहे. उच्च न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द करून पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यात यावा असे त्यांचे म्हणणे होते. प्रकरणावर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. संजीव खन्ना यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी व प्रकरणातील तथ्ये लक्षात घेता पोटनिवडणुकीवरील अंतरिम स्थगिती रद्द करण्यास नकार दिला व दोन्ही विशेष अनुमती याचिका फेटाळण्याचे संकेत दिले. त्यामुळे आयोग व टुले यांनी न्यायालयाच्या परवानगीने याचिका मागे घेतल्या. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता राकेश द्विवेदी, अ‍ॅड. तनवीर अहमद मिर तर, सरोदे व इतर प्रतिवादींतर्फे वरिष्ठ अधिवक्ता महाबीर सिंग, अ‍ॅड. किशोर लांबट व इतरांनी कामकाज पाहिले.हायकोर्टात मंगळवारी सुनावणीउच्च न्यायालयात प्रलंबित सरोदे यांच्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेची सर्वसाधारण निवडणूक ऑक्टोबर-२०१९ मध्ये घ्यायची असल्यामुळे सप्टेंबर-२०१९ मध्ये आदर्श आचारसंहिता लागू होऊ शकते. अशा परिस्थितीत पोटनिवडणूक घेतल्यास निर्वाचित सदस्याला केवळ तीन महिन्याचा कार्यकाळ मिळेल. दरम्यान, त्याला मतदारसंघासाठी आर्थिक निर्णयही घेता येणार नाही. तसेच, ही पोटनिवडणूक घेतल्यास भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन हाईल. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेऊन मनुष्यबळ, वेळ, ऊर्जा व सरकारी निधी व्यर्थ घालवू नये असे सरोदे यांचे म्हणणे आहे. आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूक