शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

सुप्रीम कोर्ट रद्द करू शकते केंद्राचा कायदा : न्या. के.जे. रोही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 23:27 IST

भारतीय संविधानाने देशाच्या न्यायव्यवस्थेला इतर देशाच्या तुलनेत भक्कमपणे मजबूत केले आहे. सरकारने कोणताही संविधान विरोधी कायदा केला तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. त्यामुळे जनतेला सरकारच्या कोणत्याही कायद्याची भीती बाळगण्याची गरज नाही, असे प्रतिपादन न्यायमूर्ती के.जे. रोही यांनी केले.

ठळक मुद्देसंविधान सन्मान सोहळा उत्साहात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय संविधानाने देशाच्या न्यायव्यवस्थेला इतर देशाच्या तुलनेत भक्कमपणे मजबूत केले आहे. सरकारने कोणताही संविधान विरोधी कायदा केला तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. त्यामुळे जनतेला सरकारच्या कोणत्याही कायद्याची भीती बाळगण्याची गरज नाही, असे प्रतिपादन न्यायमूर्ती के.जे. रोही यांनी केले.७० व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान संरक्षण मंचच्यावतीने संविधान चौक येथे संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्या. रोही बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून अ‍ॅड. मुकुंद खैरे उपस्थित होते. अ‍ॅड. खैरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे निर्माण केलेली कायदे व्यवस्था आपल्याला मजबूत करावी लागेल. संविधानाच्या सुरक्षेसाठी बंद पाळणे, जाळपोळ करणे, रस्ते अडविणे, हिंसक आंदोलन करणे थांबवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. अशा असनदशीर आंदोलनामुळे बेबंदशाही वाढेल आणि राज्यघटनेवरील लोकांचा विश्वास कमी होईल, असा इशारा त्यांनी दिला. केंद्र शासनाने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर संविधानाच्याच विरोधात असल्याची टीका त्यांनी केली. हा कायदा धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्त्वाच्या विरोधात असल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला समर्थन देण्यासाठी सदर कायद्याच्या विरोधात न्यायालयाला पत्र पाठविण्याचे आवाहन अ‍ॅड. खैरे यांनी केले.प्रास्ताविक सारथीकुमार सोनटक्के यांनी व संचालन सुनील जांभुळकर यांनी केले. प्रदीप फुलझेले यांनी आभार मानले. आयोजनात अ‍ॅड. शताब्दी खैरे, लालचंद लव्हात्रे, माणिक सूर्यवंशी, धनराज धोपटे, चंद्रभागा पानतावणे, चांगो बोरकर, अजय डंभारे, भीमराव नंदेश्वर, अशोक मेश्राम, विक्रमादित्य वाघमारे, मधुकर मेश्राम, महेश वाघमारे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय