शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

सुप्रीम कोर्ट रद्द करू शकते केंद्राचा कायदा : न्या. के.जे. रोही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 23:27 IST

भारतीय संविधानाने देशाच्या न्यायव्यवस्थेला इतर देशाच्या तुलनेत भक्कमपणे मजबूत केले आहे. सरकारने कोणताही संविधान विरोधी कायदा केला तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. त्यामुळे जनतेला सरकारच्या कोणत्याही कायद्याची भीती बाळगण्याची गरज नाही, असे प्रतिपादन न्यायमूर्ती के.जे. रोही यांनी केले.

ठळक मुद्देसंविधान सन्मान सोहळा उत्साहात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय संविधानाने देशाच्या न्यायव्यवस्थेला इतर देशाच्या तुलनेत भक्कमपणे मजबूत केले आहे. सरकारने कोणताही संविधान विरोधी कायदा केला तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. त्यामुळे जनतेला सरकारच्या कोणत्याही कायद्याची भीती बाळगण्याची गरज नाही, असे प्रतिपादन न्यायमूर्ती के.जे. रोही यांनी केले.७० व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान संरक्षण मंचच्यावतीने संविधान चौक येथे संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्या. रोही बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून अ‍ॅड. मुकुंद खैरे उपस्थित होते. अ‍ॅड. खैरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे निर्माण केलेली कायदे व्यवस्था आपल्याला मजबूत करावी लागेल. संविधानाच्या सुरक्षेसाठी बंद पाळणे, जाळपोळ करणे, रस्ते अडविणे, हिंसक आंदोलन करणे थांबवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. अशा असनदशीर आंदोलनामुळे बेबंदशाही वाढेल आणि राज्यघटनेवरील लोकांचा विश्वास कमी होईल, असा इशारा त्यांनी दिला. केंद्र शासनाने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर संविधानाच्याच विरोधात असल्याची टीका त्यांनी केली. हा कायदा धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्त्वाच्या विरोधात असल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला समर्थन देण्यासाठी सदर कायद्याच्या विरोधात न्यायालयाला पत्र पाठविण्याचे आवाहन अ‍ॅड. खैरे यांनी केले.प्रास्ताविक सारथीकुमार सोनटक्के यांनी व संचालन सुनील जांभुळकर यांनी केले. प्रदीप फुलझेले यांनी आभार मानले. आयोजनात अ‍ॅड. शताब्दी खैरे, लालचंद लव्हात्रे, माणिक सूर्यवंशी, धनराज धोपटे, चंद्रभागा पानतावणे, चांगो बोरकर, अजय डंभारे, भीमराव नंदेश्वर, अशोक मेश्राम, विक्रमादित्य वाघमारे, मधुकर मेश्राम, महेश वाघमारे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय