शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

‘राफेल’ चौकशी दाबण्यासाठीच ‘सीबीआय’चे महाभारत : यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:15 IST

‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देदेशाची अवस्था ‘बनाना रिपब्लिक’सारखी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.यावेळी भाजपाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा, ‘आप’चे खा.संजय सिंह, माजी आमदार आशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. ‘सीबीआय’मध्ये झालेल्या खेळखंडोब्याने हे दाखवून दिले आहे की देशात कायद्याचे राज्य राहिलेलेच नाही. पंतप्रधान किंवा कॅबिनेट सीबीआय प्रमुखांना पदावरून काढू शकत नाही. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. केंद्र सरकारच्या अशा भूमिकांमुळे ‘सीबीआय’सारख्या संस्थांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. देशाला केंद्र सरकारने ‘बनाना रिपब्लिक’ बनविण्याचेच प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी लावला.‘राफेल’ प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात अरुण शौरी, प्रशांत भूषण आणि इतर काही लोकांनी कागदोपत्री पुराव्यांसह सीबीआयकडे तक्रार दिली होती. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी ती तक्रार स्वीकारली. तसेच तक्रारीसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना पुरावा म्हणून ग्राह्य धरायचे का याबाबत मत मागण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना विचारणा केली. यामुळेच सरकारची नाराजी त्यांना झेलावी लागली, असे यशवंत सिन्हा म्हणाले.राकेश अस्थाना हे कठपुतळीयावेळी खा.संजय सिंह यांनी राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी राकेश अस्थाना हे पंतप्रधान आणि अमित शाह यांच्या गोतावळ्यातील आहेत. ‘सीबीआय’मधील प्रकरणे आपल्या पद्धतीने हाताळणे आणि काही प्रकरणे दाबण्यासाठी अस्थाना यांची नियुक्ती करण्यात आली होती. संचालकपदाची प्रभारी जबाबदारी नागेश्वर राव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र ते भ्रष्ट अधिकारी आहेत, असा दावा त्यांनी केला.अजित डोवाल यांना इतके अधिकार का ?यावेळी यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरदेखील टीका केली. अजित डोवाल यांच्यासारख्या प्रशासकीय व्यवस्थेतील व्यक्तीला इतके अधिकार देणे हे लोकशाहीसाठी योग्य नाही. त्यांना केंद्राने ‘सुपर इंटेलिजन्ट स्टार’ बनविले आहे, असे सिन्हा म्हणाले.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाRafale Dealराफेल डील