शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘राफेल’ चौकशी दाबण्यासाठीच ‘सीबीआय’चे महाभारत : यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:15 IST

‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देदेशाची अवस्था ‘बनाना रिपब्लिक’सारखी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.यावेळी भाजपाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा, ‘आप’चे खा.संजय सिंह, माजी आमदार आशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. ‘सीबीआय’मध्ये झालेल्या खेळखंडोब्याने हे दाखवून दिले आहे की देशात कायद्याचे राज्य राहिलेलेच नाही. पंतप्रधान किंवा कॅबिनेट सीबीआय प्रमुखांना पदावरून काढू शकत नाही. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. केंद्र सरकारच्या अशा भूमिकांमुळे ‘सीबीआय’सारख्या संस्थांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. देशाला केंद्र सरकारने ‘बनाना रिपब्लिक’ बनविण्याचेच प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी लावला.‘राफेल’ प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात अरुण शौरी, प्रशांत भूषण आणि इतर काही लोकांनी कागदोपत्री पुराव्यांसह सीबीआयकडे तक्रार दिली होती. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी ती तक्रार स्वीकारली. तसेच तक्रारीसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना पुरावा म्हणून ग्राह्य धरायचे का याबाबत मत मागण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना विचारणा केली. यामुळेच सरकारची नाराजी त्यांना झेलावी लागली, असे यशवंत सिन्हा म्हणाले.राकेश अस्थाना हे कठपुतळीयावेळी खा.संजय सिंह यांनी राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी राकेश अस्थाना हे पंतप्रधान आणि अमित शाह यांच्या गोतावळ्यातील आहेत. ‘सीबीआय’मधील प्रकरणे आपल्या पद्धतीने हाताळणे आणि काही प्रकरणे दाबण्यासाठी अस्थाना यांची नियुक्ती करण्यात आली होती. संचालकपदाची प्रभारी जबाबदारी नागेश्वर राव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र ते भ्रष्ट अधिकारी आहेत, असा दावा त्यांनी केला.अजित डोवाल यांना इतके अधिकार का ?यावेळी यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरदेखील टीका केली. अजित डोवाल यांच्यासारख्या प्रशासकीय व्यवस्थेतील व्यक्तीला इतके अधिकार देणे हे लोकशाहीसाठी योग्य नाही. त्यांना केंद्राने ‘सुपर इंटेलिजन्ट स्टार’ बनविले आहे, असे सिन्हा म्हणाले.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाRafale Dealराफेल डील