शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘राफेल’ चौकशी दाबण्यासाठीच ‘सीबीआय’चे महाभारत : यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:15 IST

‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देदेशाची अवस्था ‘बनाना रिपब्लिक’सारखी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीबीआय’मध्ये सुरू असलेले महाभारत नियोजनबद्ध पद्धतीने घडविण्यात आले आहे. ‘राफेल’ कराराबाबतची तक्रार स्वीकारल्यामुळे ‘सीबीआय’च्या संचालकांवर सरकारची नाराजी होतीच. या प्रकरणातील पुढील चौकशी टाळण्यासाठीच नियमांना बगल देत संचालकांना दीर्घकालीन सुटीवर पाठविण्यात आले व मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.यावेळी भाजपाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा, ‘आप’चे खा.संजय सिंह, माजी आमदार आशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. ‘सीबीआय’मध्ये झालेल्या खेळखंडोब्याने हे दाखवून दिले आहे की देशात कायद्याचे राज्य राहिलेलेच नाही. पंतप्रधान किंवा कॅबिनेट सीबीआय प्रमुखांना पदावरून काढू शकत नाही. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. केंद्र सरकारच्या अशा भूमिकांमुळे ‘सीबीआय’सारख्या संस्थांची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. देशाला केंद्र सरकारने ‘बनाना रिपब्लिक’ बनविण्याचेच प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी लावला.‘राफेल’ प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात अरुण शौरी, प्रशांत भूषण आणि इतर काही लोकांनी कागदोपत्री पुराव्यांसह सीबीआयकडे तक्रार दिली होती. सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांनी ती तक्रार स्वीकारली. तसेच तक्रारीसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांना पुरावा म्हणून ग्राह्य धरायचे का याबाबत मत मागण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना विचारणा केली. यामुळेच सरकारची नाराजी त्यांना झेलावी लागली, असे यशवंत सिन्हा म्हणाले.राकेश अस्थाना हे कठपुतळीयावेळी खा.संजय सिंह यांनी राकेश अस्थाना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला. गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी राकेश अस्थाना हे पंतप्रधान आणि अमित शाह यांच्या गोतावळ्यातील आहेत. ‘सीबीआय’मधील प्रकरणे आपल्या पद्धतीने हाताळणे आणि काही प्रकरणे दाबण्यासाठी अस्थाना यांची नियुक्ती करण्यात आली होती. संचालकपदाची प्रभारी जबाबदारी नागेश्वर राव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र ते भ्रष्ट अधिकारी आहेत, असा दावा त्यांनी केला.अजित डोवाल यांना इतके अधिकार का ?यावेळी यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरदेखील टीका केली. अजित डोवाल यांच्यासारख्या प्रशासकीय व्यवस्थेतील व्यक्तीला इतके अधिकार देणे हे लोकशाहीसाठी योग्य नाही. त्यांना केंद्राने ‘सुपर इंटेलिजन्ट स्टार’ बनविले आहे, असे सिन्हा म्हणाले.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाRafale Dealराफेल डील