शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

कल्चरल मार्क्सवादासारखी गोंडस नावे देऊन दुराचाराचे समर्थन घातक - सरसंघचालक 

By योगेश पांडे | Updated: September 5, 2023 20:32 IST

मागील काही काळापासून भौतिक सुखाकडे मर्यादेच्या बाहेर ओढा वाढला आहे.

नागपूर: मागील काही काळापासून भौतिक सुखाकडे मर्यादेच्या बाहेर ओढा वाढला आहे. त्यापुढे बाकी सर्वच गौण असल्याचा प्रचार करून त्याला तत्वज्ञानाचा मुलामा देऊन हेच बरोबर आहे असा दावा समाजातील काही स्वार्थी मंडळी करतात. त्याला कल्चरल मार्क्सवाद वगैरे गोंडस नावे देऊन दुराचाराचे समर्थन केले जाते. ही बाब समाजाच्या दृष्टीने घातक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भातर्फे आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमादरम्यान ते मंगळवारी बोलत होते.कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.देशपांडे व सचिव ॲड.अविनाश तेलंग उपस्थित होते. नकारात्मक तत्वज्ञान समाजावर थोपविण्याचा प्रयत्न जाणुनबुजून काही लोकांकडून करण्यात येतो. दुराचार, अराजकता समाजात वाढले की अशा मंडळींना समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करता येते. निरनिराळे तत्वज्ञान यांचा हवाला देत मनुष्यमधील सकारात्मक व चांगले गुण उद्ध्वस्त करण्यावर त्यांचा भर असतो. अशा प्रयत्नांमुळेच अनेक देशांमध्ये कुटुंबसंस्था उध्वस्त होत आहे. आपल्या देशाची मूल्ये अद्यापही कायम आहे. परंतु देशाची संस्कृती उलथवून टाकण्यासाठी आजवर अनेक अस्मानी, सुल्तानी प्रयत्न झाले, असे सरसंघचालक म्हणाले.

ज्येष्ठ शब्दाला असहायतेचा भाव का चिकटला आहे हे कोडेच आहे. ज्येष्ठांचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात अढळ आहे. म्हातारे शब्दाचा मुळ शब्द महत्त्व हा आहे. मात्र त्याला परावलंबित्वाची झालर उगाचच चिकटली असते. आपल्या परंपरेत ज्येष्ठांच्या पराक्रमाची उदाहरणे आहेत. ज्येष्ठांच्या अनुभवाच्या आधाराने नवीन पिढी आयुष्यातील संघर्षाचा सामना करते. आपली संस्कृती व आयुष्याची सार्थकता ज्येष्ठांकडूनच पुढील पिढीकडे जाते. पुढील पिढीकडे शाश्वत विचार गेले पाहिजे. केवळ जनुकेच नव्हे तर माणुसपणाने जगण्याची कलादेखील ट्रान्सफर करण्याचे काम ज्येष्ठ मंडळी करतात, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी ८० वर्षांहून अधिक वय झालेल्या शिक्षकांचा सत्कारदेखील करण्यात आला.

सेवानिवृत्त नव्हे सेवाप्रवृत्त व्हायावेळी सेवानिवृत्त मंडळींबाबत सरसंघचालकांनी भाष्य केले. सेवानिवृत्त नाही तर सेवाप्रवृत्त झालो असे ज्येष्ठांनी म्हटले पाहिजे. लोकांना भेटणे, पुस्तके देणे, त्यांना घरी बोलविणे, त्यांच्या घरी जाणे या माध्यमातून संस्कृती व आपुलकीचा प्रसार झाला पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ