शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कल्चरल मार्क्सवादासारखी गोंडस नावे देऊन दुराचाराचे समर्थन घातक - सरसंघचालक 

By योगेश पांडे | Updated: September 5, 2023 20:32 IST

मागील काही काळापासून भौतिक सुखाकडे मर्यादेच्या बाहेर ओढा वाढला आहे.

नागपूर: मागील काही काळापासून भौतिक सुखाकडे मर्यादेच्या बाहेर ओढा वाढला आहे. त्यापुढे बाकी सर्वच गौण असल्याचा प्रचार करून त्याला तत्वज्ञानाचा मुलामा देऊन हेच बरोबर आहे असा दावा समाजातील काही स्वार्थी मंडळी करतात. त्याला कल्चरल मार्क्सवाद वगैरे गोंडस नावे देऊन दुराचाराचे समर्थन केले जाते. ही बाब समाजाच्या दृष्टीने घातक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भातर्फे आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमादरम्यान ते मंगळवारी बोलत होते.कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.देशपांडे व सचिव ॲड.अविनाश तेलंग उपस्थित होते. नकारात्मक तत्वज्ञान समाजावर थोपविण्याचा प्रयत्न जाणुनबुजून काही लोकांकडून करण्यात येतो. दुराचार, अराजकता समाजात वाढले की अशा मंडळींना समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करता येते. निरनिराळे तत्वज्ञान यांचा हवाला देत मनुष्यमधील सकारात्मक व चांगले गुण उद्ध्वस्त करण्यावर त्यांचा भर असतो. अशा प्रयत्नांमुळेच अनेक देशांमध्ये कुटुंबसंस्था उध्वस्त होत आहे. आपल्या देशाची मूल्ये अद्यापही कायम आहे. परंतु देशाची संस्कृती उलथवून टाकण्यासाठी आजवर अनेक अस्मानी, सुल्तानी प्रयत्न झाले, असे सरसंघचालक म्हणाले.

ज्येष्ठ शब्दाला असहायतेचा भाव का चिकटला आहे हे कोडेच आहे. ज्येष्ठांचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात अढळ आहे. म्हातारे शब्दाचा मुळ शब्द महत्त्व हा आहे. मात्र त्याला परावलंबित्वाची झालर उगाचच चिकटली असते. आपल्या परंपरेत ज्येष्ठांच्या पराक्रमाची उदाहरणे आहेत. ज्येष्ठांच्या अनुभवाच्या आधाराने नवीन पिढी आयुष्यातील संघर्षाचा सामना करते. आपली संस्कृती व आयुष्याची सार्थकता ज्येष्ठांकडूनच पुढील पिढीकडे जाते. पुढील पिढीकडे शाश्वत विचार गेले पाहिजे. केवळ जनुकेच नव्हे तर माणुसपणाने जगण्याची कलादेखील ट्रान्सफर करण्याचे काम ज्येष्ठ मंडळी करतात, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी ८० वर्षांहून अधिक वय झालेल्या शिक्षकांचा सत्कारदेखील करण्यात आला.

सेवानिवृत्त नव्हे सेवाप्रवृत्त व्हायावेळी सेवानिवृत्त मंडळींबाबत सरसंघचालकांनी भाष्य केले. सेवानिवृत्त नाही तर सेवाप्रवृत्त झालो असे ज्येष्ठांनी म्हटले पाहिजे. लोकांना भेटणे, पुस्तके देणे, त्यांना घरी बोलविणे, त्यांच्या घरी जाणे या माध्यमातून संस्कृती व आपुलकीचा प्रसार झाला पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ