शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

नवतपामध्ये सूर्य आग ओकणार : शनिवारपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:01 IST

शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देतापमान ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.शहरात शुक्रवारी ४६ डिग्री तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत तापमान ०.२ डिग्रीने घटले, पण ही अत्यल्प घसरण दिलासादायक ठरली नाही. विदर्भातील तापमानात ४६.६ डिग्रीसह चंद्रपूर पहिल्या तर, नागपूर दुसऱ्या स्थानावर राहिले. ब्रह्मपुरीत ४५.८, वर्धेत ४५, गडचिरोलीत ४४.८, अकोल्यात ४४.४, गोंदियात ४४, अमरावतीत ४३.६, यवतमाळात ४३.५, वाशिम येथे ४३ तर, बुलडाणामध्ये ४१ डिग्री तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात बुधवारी ४६ तर, गुरुवारी ४६.२ डिग्री तापमान होते. गेल्या ३० एप्रिल रोजी सर्वाधिक ४६.३ डिग्री तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाने नवतपामुळे रेड अलर्ट जारी करून चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती व यवतमाळ येथे अचानक पारा चढेल असा इशारा दिला आहे. महिन्याच्या शेवटी सर्वाधिक तापमान राहील व जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल असे बोलले जात आहे.एसी, कुलर बिनकामाचेसध्या एसी व कुलर बिनकामाचे झाले आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा काहीच परिणाम जाणवत नाही. उकाड्यामुळे कुलरमध्ये वारंवार पाणी भरावे लागते. एसीची क्षमताही कमी पडत आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत.रेड अलर्टचा अर्थतापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ डिग्रीने जास्त राहण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट जारी केला जातो. या काळात चार-पाच दिवस समान परिस्थिती कायम राहते. ऑरेंज अलर्टमध्ये पारा सामान्यपेक्षा ३ ते ४ डिग्री जास्त असतो.दुपारी बाहेर पडू नकाउन्हात जायचे असल्यास पूर्ण अंग झाकल्या जाईल असे सुती कपडे घाला. डोके व चेहऱ्याला सुती कपडा बांधा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, त्यांनी दुपारी १२ ते ४.३० पर्यंत घराबाहेर पडण्यास मनाई केली व ताक, लिंबू सरबतसह भरपूर पाणी पिण्यास सांगितले.

 

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात