शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नवतपामध्ये सूर्य आग ओकणार : शनिवारपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:01 IST

शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देतापमान ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.शहरात शुक्रवारी ४६ डिग्री तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत तापमान ०.२ डिग्रीने घटले, पण ही अत्यल्प घसरण दिलासादायक ठरली नाही. विदर्भातील तापमानात ४६.६ डिग्रीसह चंद्रपूर पहिल्या तर, नागपूर दुसऱ्या स्थानावर राहिले. ब्रह्मपुरीत ४५.८, वर्धेत ४५, गडचिरोलीत ४४.८, अकोल्यात ४४.४, गोंदियात ४४, अमरावतीत ४३.६, यवतमाळात ४३.५, वाशिम येथे ४३ तर, बुलडाणामध्ये ४१ डिग्री तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात बुधवारी ४६ तर, गुरुवारी ४६.२ डिग्री तापमान होते. गेल्या ३० एप्रिल रोजी सर्वाधिक ४६.३ डिग्री तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाने नवतपामुळे रेड अलर्ट जारी करून चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती व यवतमाळ येथे अचानक पारा चढेल असा इशारा दिला आहे. महिन्याच्या शेवटी सर्वाधिक तापमान राहील व जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल असे बोलले जात आहे.एसी, कुलर बिनकामाचेसध्या एसी व कुलर बिनकामाचे झाले आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा काहीच परिणाम जाणवत नाही. उकाड्यामुळे कुलरमध्ये वारंवार पाणी भरावे लागते. एसीची क्षमताही कमी पडत आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत.रेड अलर्टचा अर्थतापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ डिग्रीने जास्त राहण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट जारी केला जातो. या काळात चार-पाच दिवस समान परिस्थिती कायम राहते. ऑरेंज अलर्टमध्ये पारा सामान्यपेक्षा ३ ते ४ डिग्री जास्त असतो.दुपारी बाहेर पडू नकाउन्हात जायचे असल्यास पूर्ण अंग झाकल्या जाईल असे सुती कपडे घाला. डोके व चेहऱ्याला सुती कपडा बांधा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, त्यांनी दुपारी १२ ते ४.३० पर्यंत घराबाहेर पडण्यास मनाई केली व ताक, लिंबू सरबतसह भरपूर पाणी पिण्यास सांगितले.

 

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात