शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सुर्याने आग ओकली, पारा पोहोचला ४६.७ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:59 IST

नवतपाच्या पाचव्या दिवशी रखरखत्या उन्हामुळे नागपुरकरांचे हाल झाले. मंगळवारी सुर्याचा प्रकोप वाढुन तापमान ४६.७ अंशावर पोहोचले. २४ तासात पारा २.३ अंशाने वाढल्यामुळे नागरिकांची लाहीलाही झाली. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत होते. दुपारी तर उन्हाच्या भितीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.

ठळक मुद्देविदर्भाचे काही जिल्हे ‘रेड अलर्ट’वर : चंद्रपूर ४७.८, वर्धा ४७

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपाच्या पाचव्या दिवशी रखरखत्या उन्हामुळे नागपुरकरांचे हाल झाले. मंगळवारी सुर्याचा प्रकोप वाढुन तापमान ४६.७ अंशावर पोहोचले. २४ तासात पारा २.३ अंशाने वाढल्यामुळे नागरिकांची लाहीलाही झाली. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत होते. दुपारी तर उन्हाच्या भितीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.मंगळवारची उन्हाळ्यातील सर्वात गरम दिवस म्हणून नोंद करण्यात आली. आगामी २४ तास नागपुरकरांसोबतच विदर्भातील काही जिल्ह्यात हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे पारा सामान्य पेक्षा पाच अंश वर जाऊ शकतो. मंगळवारी शहराचे तापमान सामान्यपेक्षा ३.५ अंश वर राहिले. नागपुरात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. नवतपाच्या राहिलेल्या दिवसातही उन्हापासून दिलासा मिळण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही. सातत्याने उन्हाचा प्रकोप सुरुच राहणार आहे. नागपुरात सकाळी ९ वाजेपासूनच गरम हवा सुरु झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. दुपारी १२ पासून ४.३० पर्यंत रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. इतर दिवसांपेक्षा दुपारी रस्त्यावर कमीत कमी वाहने पाहावयास मिळाली. हिट अ‍ॅक्शन प्लॉन नुसार शहराच्या अनेक चौकात ग्रीन नेट लावण्यात आल्या होत्या. परंतु यावेळी महापालिकेच्या वतीने हिट अ‍ॅक्शन प्लॉनच्या नावावर काहीच करण्यात आले नाही. सामाजिक संस्थांनी प्याऊची व्यवस्था केली. उद्याने खुले ठेवण्याचे निर्देश होते. परंतु बहुतांश उद्यानांच्या प्रवेशद्वारावर कुलुप लावलेले दिसले. ट्राफिक सिग्नलवर थांबण्याची वेळ आली तेंव्हा नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. दुपारच्या वेळी वाहतुक कमी राहत असल्यामुळे सिग्नल बंद ठेवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.४८ तासात ७.९ अंशाने तापमानात वाढनागपूर शहराच्या कमाल तापमानात मागील ४८ तासात ७.९ अंशाने वाढीची नोंद करण्यात आली. वादळ आणि पावसामुळे २७ मे रोजी कमाल तापमान ३८.८ अंशावर पोहोचले होते. परंतु दोन दिवसात पाऱ्याने उन्हाळ्यातील उच्चांक गाठून ४६.७ वर पोहोचला.भरपूर पाणी प्या, शरीराला झाकाडॉक्टरांनी सल्ला दिला आहे की दुपारी घरातून बाहेर पडण्याचे टाळा. जर बाहेर पडायचे असल्यास भरपूर पाणी प्यावे. शरीराला पूर्णपणे झाकुन घ्यावे. सुती कपडे घालावेत. डोके पुर्णपणे झाकलेले असणे आवश्यक आहे. हेल्मेटच्या वापरामुळे उन्हाच्या संपर्कात येण्यापासून वाचता येऊ शकते. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नये. निंबु पाण्याचे सेवन करणेही फायद्याचे आहे.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर