शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

सुर्याने आग ओकली, पारा पोहोचला ४६.७ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:59 IST

नवतपाच्या पाचव्या दिवशी रखरखत्या उन्हामुळे नागपुरकरांचे हाल झाले. मंगळवारी सुर्याचा प्रकोप वाढुन तापमान ४६.७ अंशावर पोहोचले. २४ तासात पारा २.३ अंशाने वाढल्यामुळे नागरिकांची लाहीलाही झाली. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत होते. दुपारी तर उन्हाच्या भितीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.

ठळक मुद्देविदर्भाचे काही जिल्हे ‘रेड अलर्ट’वर : चंद्रपूर ४७.८, वर्धा ४७

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपाच्या पाचव्या दिवशी रखरखत्या उन्हामुळे नागपुरकरांचे हाल झाले. मंगळवारी सुर्याचा प्रकोप वाढुन तापमान ४६.७ अंशावर पोहोचले. २४ तासात पारा २.३ अंशाने वाढल्यामुळे नागरिकांची लाहीलाही झाली. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत होते. दुपारी तर उन्हाच्या भितीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.मंगळवारची उन्हाळ्यातील सर्वात गरम दिवस म्हणून नोंद करण्यात आली. आगामी २४ तास नागपुरकरांसोबतच विदर्भातील काही जिल्ह्यात हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे पारा सामान्य पेक्षा पाच अंश वर जाऊ शकतो. मंगळवारी शहराचे तापमान सामान्यपेक्षा ३.५ अंश वर राहिले. नागपुरात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. नवतपाच्या राहिलेल्या दिवसातही उन्हापासून दिलासा मिळण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही. सातत्याने उन्हाचा प्रकोप सुरुच राहणार आहे. नागपुरात सकाळी ९ वाजेपासूनच गरम हवा सुरु झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले. दुपारी १२ पासून ४.३० पर्यंत रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. इतर दिवसांपेक्षा दुपारी रस्त्यावर कमीत कमी वाहने पाहावयास मिळाली. हिट अ‍ॅक्शन प्लॉन नुसार शहराच्या अनेक चौकात ग्रीन नेट लावण्यात आल्या होत्या. परंतु यावेळी महापालिकेच्या वतीने हिट अ‍ॅक्शन प्लॉनच्या नावावर काहीच करण्यात आले नाही. सामाजिक संस्थांनी प्याऊची व्यवस्था केली. उद्याने खुले ठेवण्याचे निर्देश होते. परंतु बहुतांश उद्यानांच्या प्रवेशद्वारावर कुलुप लावलेले दिसले. ट्राफिक सिग्नलवर थांबण्याची वेळ आली तेंव्हा नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. दुपारच्या वेळी वाहतुक कमी राहत असल्यामुळे सिग्नल बंद ठेवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.४८ तासात ७.९ अंशाने तापमानात वाढनागपूर शहराच्या कमाल तापमानात मागील ४८ तासात ७.९ अंशाने वाढीची नोंद करण्यात आली. वादळ आणि पावसामुळे २७ मे रोजी कमाल तापमान ३८.८ अंशावर पोहोचले होते. परंतु दोन दिवसात पाऱ्याने उन्हाळ्यातील उच्चांक गाठून ४६.७ वर पोहोचला.भरपूर पाणी प्या, शरीराला झाकाडॉक्टरांनी सल्ला दिला आहे की दुपारी घरातून बाहेर पडण्याचे टाळा. जर बाहेर पडायचे असल्यास भरपूर पाणी प्यावे. शरीराला पूर्णपणे झाकुन घ्यावे. सुती कपडे घालावेत. डोके पुर्णपणे झाकलेले असणे आवश्यक आहे. हेल्मेटच्या वापरामुळे उन्हाच्या संपर्कात येण्यापासून वाचता येऊ शकते. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नये. निंबु पाण्याचे सेवन करणेही फायद्याचे आहे.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर